सांडपाण्यामुळे कुंडलिका नदीचे पाणी प्रदूषित

रोहा : रोहा परिसरातील जीवनरेखा मानली जाणाऱ्या कुंडलिका नदीत धाटाव एमआयडीसी परिसरातून सोडल्या जाणाऱ्या रासायनिक आणि दूषित पाण्यामुळे नदीचे नैसर्गिक स्वरूप नष्ट होऊ लागले आहे. त्यामुळे ही नदी प्रदूषित झाल्याने शेतकऱ्यांसह मच्छिमारांच्या उपजीविकेवर मोठा परिणाम होत आहे.


एमआयडीसी परिसरातील अनेक रासायनिक कारखान्यांकडून उपचार न केलेले दूषित पाणी थेट नदी पात्रात सोडले जाते. या रसायनांमुळे नदीचे पाणी काळवंडण्याबरोबरच नदीच्या पाण्याला दुर्गंधी सुटली आहे. त्यातच भरती-ओहोटीच्या काळात हेच पाणी भातशेतीत येऊन परिणामी पिके सुकतात व शेतीचे उत्पादन घटते. नदीचे पाणी प्रदूषित झाल्याने नदीतील माशांचे प्रमाणही गेल्या काही वर्षांत झपाट्याने कमी झाले आहे. “पूर्वी आमच्या जाळ्यात दिवसाला बरेचसे मासे यायचे, आता मात्र नदीत जीवच उरलेला नाही. उरलेले मासेही विषारी झाल्याची माहिती स्थानिक मच्छिमारांनी `दैनिक प्रहार’शी बोलताना दिली.


दुसरीकडे हवेत सोडल्या जाणाऱ्या रसायनी गॅसमुळे परिसरात श्वसनाचे, दम्याचे, डोळ्यांच्या जळजळीचे आजार वाढले आहेत. मुलांपासून ते वयोवृद्धांपर्यंत सर्वांना या प्रदूषणाचा फटका बसत आहे. धाटाव एमआयडीसीकडून रोजगार, ठेके किंवा इतर कोणत्याही स्वरूपात स्थानिकांना प्राधान्य दिले जात नाही, मात्र त्याच एमआयडीसीच्या दूषित पाण्याचा फटका मात्र या भागातील लोकांना सहन करावा लागतो आहे. दरम्यान कोळी समाजाचे काही नेत्यांसह लोकप्रतिनिधीही या गंभीर प्रश्नावर मौन बाळगत असल्याची चर्चा रोह्यात आहे. प्रदूषण नियंत्रण मंडळाने नियमित तपासणी करून दोषी कारखान्यांवर कडक कारवाई करावी, तसेच नदी शुद्धीकरणासाठी ठोस पावले उचलावीत अशी मागणी जोर धरू लागली आहे.

Comments
Add Comment

Nashik : संतापजनक ! समाजकंटकांकडून एक एकर उभी कारल्याची बाग उद्ध्वस्त ! शेतकऱ्याचे लाखो रुपयांचे नुकसान

Nashik : नाशिकच्या येवला तालुक्यातील धुळगाव येथे संतापजनक प्रकार समोर आला आहे. धुळगाव येथील एका कष्टकरी

Kalidas Maharaj : कालीदास महाराजांचे अपघाती निधन, ४० वर्षांत उच्चारला नव्हता एकही शब्द

परभणी : मराठवाड्यातील एक अध्यात्मिक गुरु अशी ख्याती असलेल्या आणि मागील चार दशकांपासून एकही शब्द न बोलता केवळ

Nashik : कोथिंबिरीच्या जुडीला तब्बल २८५ रुपये; पालेभाज्यांचे भाव गगनाला

Nashik : पावसाने ओढ दिल्यामुळे भाजीपाल्याची आवक घटली असून त्याचा थेट परिणाम पालेभाज्यांच्या दरावर झाला आहे. नाशिक

Morning Routine : सकाळी उठल्यावर कधीही करू नका या ८ सवयी; आरोग्यावर होऊ शकतो परिणाम

सकाळच्या छोट्या सवयी तुमच्या आरोग्यावर मोठा परिणाम करू शकतात. चला जाणून घेऊ दिवसाची सुरुवात कशी करावी.  ( Morning

‘ Samarth Marathi Movie : समर्थ’ चित्रपटाचा टीझर प्रदर्शित

समर्थ रामदास स्वामींच्या प्रेरणादायी विचारांना आजच्या काळाशी जोडणाऱ्या ‘समर्थ’ या आगामी मराठी चित्रपटाचा

Ramayana Movie : 'रामायण'च्या ट्रेलरला सेन्सॉर बोर्डाची मंजुरी

मुंबई : रणबीर कपूरची मुख्य भूमिका असलेल्या आणि अत्यंत बहुप्रतिक्षित अशा 'रामायण: पार्ट १' ( Ramayana Movie) या पौराणिक