नगरपालिका आणि नगरपंचायतींच्या निवडणुकीच्या प्रचारात महायुतीची आघाडी तर मविआची पिछाडी

मुंबई : महाराष्ट्रात २४६ नगरपालिका आणि ४२ नगरपंचायतींसाठी २ डिसेंबर रोजी मतदान आणि ३ डिसेंबर रोजी मतमोजणी होईल, असे निवडणूक आयोगाने जाहीर केले आहे. या निवडणुकीसाठी उमेदवारांना सोमवार १ डिसेंबर २०२५ रोजी रात्री दहा वाजेपर्यंत प्रचार करता येणार आहे. निवडणूक आयोगाच्या या नव्या निर्देशामुळे राज्यात ठिकठिकाणी प्रचाराचा धुरळा उडाला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार या महायुतीच्या नेत्यांनी प्रचारसभांमध्ये आघाडी घेतली आहे. प्रचारसभांच्या बाबतीत उद्धव ठाकरे, राज ठाकरे आणि सुप्रिया सुळे मागे पडले आहेत.


राज्याचे मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री प्रचाराकरिता पायाला चाकं लावल्याप्रमाणे वेगाने फिरत आहेत तर मविआच्या नेत्यांनी कार्यकर्त्यांना वाऱ्यावर सोडले आहे. यामुळे शिउबाठा, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार आणि काँग्रेस या तिन्ही पक्षांचे कार्यकर्ते हवालदील झाले आहेत. स्थानिक स्तरावरच्या निवडणुकीत फार लक्ष देण्याची गरज नाही, असे उद्धव ठाकरे बोलले. उद्धव यांची मविआच्या इतर नेत्यांनीही री ओढल्याचे दिसते. याउलट महायुतीचे नेते प्रचारसभा घेत फिरत असल्यामुळे त्यांच्या कार्यकर्त्यांमध्ये उत्साह दिसून येत आहे.




  1. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतलेल्या सभा : २५

  2. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घेतलेल्या सभा : ३९

  3. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी घेतलेल्या सभा : २७


उद्धव ठाकरे, राज ठाकरे आणि सुप्रिया सुळे यांनी घेतलेल्या सभा


नगरपालिका आणि नगरपंचायतींच्या निवडणुकीसाठी उद्धव ठाकरे, राज ठाकरे आणि सुप्रिया सुळे यांनी एकही सभा घेतलेली नाही. नेत्यांच्या प्रचारसभा होत नसल्यामुळे मविआतील घटक पक्षांच्या उमेदवारांच्या प्रचारासाठी कार्यकर्तेच धावपळ करताना दिसत आहेत.

Comments
Add Comment

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत कोयना महोत्सवाची यशस्वी सांगता

सातारा: राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय पर्यटन नकाशावर अग्रस्थानी नेण्याचा निर्धार व्यक्त करत पर्यटन, शेती आणि रोजगार

मुख्यमंत्र्यांच्या पाठबळामुळे ताडोबा व्याघ्र प्रकल्पातील पर्यावरणीय पुनरुज्जीवन प्रकल्पाला मिळाली चालना

मुंबई: जैवविविधतेने समृद्ध अशा ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्प परिसरातील जागेचे पर्यावरणीय पुनरुज्जीवन

‘पीएनजी’ क्षेत्रातील नागरिकांना ३० जूननंतर ‘एलपीजी’ गॅस पुरवठा बंद; पर्यायी इंधन म्हणून केरोसीनचे वाटप होणार

मुंबई: राज्यातील ज्या शहरी भागांमध्ये पाइपद्वारे गॅस (पीएनजी) जोडणीची सुविधा उपलब्ध आहे, तिथे नागरिकांनी पीएनजी

Ramdas Athawale: केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी राज्यसभा खासदार पदाची केली हॅट्ट्रिक

मुंबई: रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांची तिस-यांदा

Delhi: हातात पुष्पगुच्छ घेऊन थेट शिरला विधानसभेत, अध्यक्षांच्या गाडीजवळ फुलांचा गुच्छ ठेवला अन्...

नवी दिल्ली: दिल्ली विधानसभेत सुरक्षेचा मोठा भंग झाल्याचे वृत्त आहे. एका वाहनाने बॅरियर तोडून गेट क्रमांक २ मधून

Umpire Killed Over Run-Out Argument : विशाखापट्टणम हादरलं! रनआऊट दिलं म्हणून थेट अंपायरचीच केली हत्या

विशाखापट्टणम येथे घडलेल्या एका धक्कादायक घटनेने क्रीडा क्षेत्र हादरले आहे. स्थानिक स्तरावर सुरू असलेल्या