नगरपालिका आणि नगरपंचायतींच्या निवडणुकीच्या प्रचारात महायुतीची आघाडी तर मविआची पिछाडी

मुंबई : महाराष्ट्रात २४६ नगरपालिका आणि ४२ नगरपंचायतींसाठी २ डिसेंबर रोजी मतदान आणि ३ डिसेंबर रोजी मतमोजणी होईल, असे निवडणूक आयोगाने जाहीर केले आहे. या निवडणुकीसाठी उमेदवारांना सोमवार १ डिसेंबर २०२५ रोजी रात्री दहा वाजेपर्यंत प्रचार करता येणार आहे. निवडणूक आयोगाच्या या नव्या निर्देशामुळे राज्यात ठिकठिकाणी प्रचाराचा धुरळा उडाला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार या महायुतीच्या नेत्यांनी प्रचारसभांमध्ये आघाडी घेतली आहे. प्रचारसभांच्या बाबतीत उद्धव ठाकरे, राज ठाकरे आणि सुप्रिया सुळे मागे पडले आहेत.


राज्याचे मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री प्रचाराकरिता पायाला चाकं लावल्याप्रमाणे वेगाने फिरत आहेत तर मविआच्या नेत्यांनी कार्यकर्त्यांना वाऱ्यावर सोडले आहे. यामुळे शिउबाठा, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार आणि काँग्रेस या तिन्ही पक्षांचे कार्यकर्ते हवालदील झाले आहेत. स्थानिक स्तरावरच्या निवडणुकीत फार लक्ष देण्याची गरज नाही, असे उद्धव ठाकरे बोलले. उद्धव यांची मविआच्या इतर नेत्यांनीही री ओढल्याचे दिसते. याउलट महायुतीचे नेते प्रचारसभा घेत फिरत असल्यामुळे त्यांच्या कार्यकर्त्यांमध्ये उत्साह दिसून येत आहे.




  1. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतलेल्या सभा : २५

  2. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घेतलेल्या सभा : ३९

  3. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी घेतलेल्या सभा : २७


उद्धव ठाकरे, राज ठाकरे आणि सुप्रिया सुळे यांनी घेतलेल्या सभा


नगरपालिका आणि नगरपंचायतींच्या निवडणुकीसाठी उद्धव ठाकरे, राज ठाकरे आणि सुप्रिया सुळे यांनी एकही सभा घेतलेली नाही. नेत्यांच्या प्रचारसभा होत नसल्यामुळे मविआतील घटक पक्षांच्या उमेदवारांच्या प्रचारासाठी कार्यकर्तेच धावपळ करताना दिसत आहेत.

Comments
Add Comment

ड्रग्ज तस्करी रोखण्यासाठी कारवाईची वयोमर्यादा १८ वरून १६ वर्षे करणार

मुंबई : अमली पदार्थांच्या तस्करीसाठी मोठ्या प्रमाणात अल्पवयीन मुलांचा उपयोग केला जात आहे. त्यामुळे याला पायबंद

रब्बी हंगामातील 'ई-पीक पाहणी'ला ३१ मार्चपर्यंत मुदतवाढ

- ४५ टक्के शेतकरी अजूनही प्रक्रियेबाहेर; महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांची घोषणा मुंबई : राज्यातील रब्बी

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी घेतली पंतप्रधान मोदींची भेट; देशस्थिती, महाराष्ट्रातील प्रश्नांवर सखोल चर्चा

नवी दिल्ली : राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज म्हणजेच मंगळवार १७ मार्च रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी

थकबाकीदार शेतकऱ्यांना दिलासा; सप्टेंबर २०२५ पर्यंतच्या कर्जाला मिळणार माफी!

सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांचे विधान परिषदेत आश्वासन मुंबई : जळगाव जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या कर्ज

भारताकडून कठोर शब्दांत पाकिस्तानच्या हवाई हल्ल्याचा निषेध

- गुन्हेगारी कृत्याच्या दोषींविरुद्ध कारवाई करण्याची मागणी पाकिस्तानकडून काबुलमध्ये झालेल्या हवाई हल्ल्यात

छत्रपती शिवरायांच्या अपमानावर संजय राऊत गप्प का ?

मुंबई : धर्मांध आक्रमकांचा उदोउदो करण्याची सवय जडलेल्या आणि मुस्लीमांचे तुष्टीकरण करणा-या संजय राऊतांनी