वसई-विरारमध्ये ५२ हजार दुबार मतदार

मतदारांकडून लिहून घेणार हमीपत्र


विरार : वसई-विरार महापालिकेच्या निवडणुकीसाठी प्रारूप मतदार याद्या प्रसिद्ध करण्यात आल्या आहेत. पालिका क्षेत्रातील २९ प्रभागात सुमारे ५२ हजार ३७८ इतक्या मतदारांची नावे मतदार यादीत दुबार आहेत. त्यामुळे या मतदारांचा शोध घेऊन त्यांच्याकडून हमी पत्र लिहून घेण्याकरिता पालिका प्रशासनाने पथकांची निर्मिती केली आहे.


महापालिका क्षेत्रात २९ प्रभाग आहेत. २८ प्रभागांमध्ये प्रत्येकी ४ नगरसेवक यावेळी निवडून द्यावयाचे आहेत. तर २९ व्या प्रभागातून तीन नगरसेवक निवडले जाणार आहेत. अशा प्रकारे एकूण ११५ जागांसाठी निवडणूक होणार आहे. या निवडणुकीसाठी निवडणुकीची आरक्षण सोडत प्रक्रिया ११ नोव्हेंबरला पार पडली. त्यानंतर प्रभागातील प्रभाग निहाय प्रारुप मतदार याद्या पालिकेने २० नोव्हेंबरला प्रसिद्ध केल्या आहेत. संपूर्ण पालिका क्षेत्रात एकूण ११ लाख २७ हजार ६४० इतक्या मतदारांचा समावेश आहे. दरम्यान, गेल्या काही महिन्यांपासून देशभरात दुबार मतदार यांचा मुद्दा चांगलाच गाजत आहे.


वसई-विरार महापालिकेने जाहीर केलेल्या मतदार याद्यामध्ये विविध प्रभागात ५२ हजार ३७८ मतदारांची नावे ही दुबार आहेत. त्यामुळे दुबार नावं असलेल्या मतदारांचा शोध घेण्यासाठी पालिकेने प्रभाग निहाय पथके नियुक्त केली आहे. नऊ प्रभागात नऊ पथके असून एका पथकात सहा कर्मचाऱ्यांचा समावेश करण्यात आला आहे. दुबार नाव असलेल्या मतदारांकडून मतदान कुठे करणार आहे.याबाबत हमीपत्र लिहून घेतले जाणार आहे असे महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी सांगितले आहे.


एकूण मतदार - ११,२७,६३७
एकूण पुरुष मतदार -  ६,०१,७४१
एकूण महिला मतदार -  ५,२५,७५०
एकूण इतर मतदार -  १४६


हरकती नोंदविण्यासाठी ३ डिसेंबरपर्यंत मुदतवाढ
राज्यातील २९ पालिकांच्या आगामी निवडणुकीसाठी असलेल्या प्रारूप मतदार याद्यांबाबत हरकती नोंदवण्यासाठी राज्य निवडणूक आयोगाने ३ डिसेंबरपर्यंत मुदतवाढ दिली आहे. यापूर्वी हरकती नोंदवण्याची अंतिम मुदत २७ नोव्हेंबर होती; परंतु निवडणूक आयोगाने या कार्यक्रमात सुधारणा केली आहे. या सुधारित कार्यक्रमानुसार, दाखल झालेल्या हरकतींवर निर्णय घेऊन प्रभागनिहाय अंतिम मतदार याद्या प्रसिद्ध करण्याची तारीख १० डिसेंबर करण्यात आली आहे. तसेच, अंतिम मतदार यादी प्रसिद्ध करण्याची तारीख २२ डिसेंबर असणार आहे.

Comments
Add Comment

वनजमिनीच्या तांत्रिक पेचात अडकली आदिवासींची घरे

विवेक पंडित यांनी मंत्रालयाचे वेधले लक्ष वसई  : राज्यातील बेघर आदिवासी, विशेषतः आदिम कातकरी समाजाच्या गावठाण

तारापूर औद्योगिक वसाहतीत वायू गळती

बोईसर : पालघर जिल्ह्यातील बोईसरमधील तारापूर औद्योगिक वसाहतीतल्या भघेरिया केमिकल्समध्ये (जुने नाव : झेनित

पालघरमध्ये बंद दगड खाणीत दुर्घटना; दोन अल्पवयीन मुलांचा बुडून मृत्यू

पालघर : पाण्याचा अंदाज न ओळखता आल्याने दोन मुलांचा जीव गेल्याची दुर्दैवी घटना पालघरमध्ये घडली आहे. मनोरजवळील

औद्योगिक क्षेत्रातील समस्यांवर आमदारांनी वेधले लक्ष

विजेच्या अडचणींसह जमिनीचा लीज प्रश्न सोडवा वसई  : वसई-विरार औद्योगिक क्षेत्रातील छोटे मोठे उद्योजक विविध

वसई-विरारचा अर्थसंकल्प ‘वेटिंग’वर!

स्थायी समिती सभापतींची निवड लांबल्याने मार्चचा मुहूर्त विरार : महापौर, उपमहापौर निवडणूक उशिरा होऊनही मुंबई

ई-गव्हर्नन्स मूल्यमापनात वसई–विरार पालिकेचा ‘नववा क्रमांक’ कायम

पालघर :  राज्यातील महानगरपालिकांच्या ई-गव्हर्नन्स कामकाजाच्या मूल्यमापनात वसई–विरार महानगरपालिकाने यंदाही