वातानुकूलित लोकलमध्ये बनावट तिकिटावर प्रवास करणाऱ्या महिलेस अटक

मुंबई  : रेल्वे तिकीट तपासनिसाच्या सतर्कतेमुळे एका महिला प्रवाशाकडून बनावट तिकीट कल्याण-दादर वातानुकूलित लोकलमधून ताब्यात घेण्यात आले. या प्रकरणी संबंधित महिलेला अटक करण्यात आली. नियमित तपासणीदरम्यान आज उजेडात आले. मुंबई विभागाचे तिकीट निरीक्षक विशाल नवले यांनी १०.०२ च्या कल्याण–दादर वातानुकूलित लोकलमध्ये नियमित तपासणीदरम्यान एका महिला प्रवाशाला थांबवले. त्यांनी वातानुकूलित लोकलमध्ये अंबरनाथ –दादर मार्गावर प्रवासासाठी ११ डिसेंबर २०२५ पर्यंत वैध असलेले युटीसद्वारे निर्मित सीझन तिकीट दाखवले. सखोल तपासणी केल्यावर नवले यांना तिकीट संशयास्पद वाटले आणि त्यांनी तत्काळ त्याची पुष्टी मागितली. पडताळणीनंतर हे तिकीट मागील कालबाह्य तिकीटावरून बनवलेले बनावट तिकीट असल्याचे स्पष्ट झाले. महिला प्रवासी गुडिया शर्मा यांना कारवाईसाठी कल्याण रेल्वे पोलीस ठाण्याकडे सुपूर्द करण्यात आले.


त्यानंतरच्या तपासात असे दिसून आले की, बनावट सीझन तिकीट तिचे पती ओंकार शर्मा यांनी तयार केले होते आणि ते तिला वापरण्यासाठी देण्यात आले होते. भारतीय न्याय संहिता कायदा २०२३ (BNS) कलम ३१८/४, ३३६/२, ३३६/३, ३४० आणि ३/५ अंतर्गत फसव्या तिकीट पद्धतींमध्ये सहभागी असल्याबद्दल दोन्ही व्यक्तींविरुद्ध एफआयआर दाखल करण्यात आला आहे. विशाल नवले यांच्या सतर्कतेमुळे बनावट तिकीट रॅकेटचा पर्दाफाश झाला. त्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे .


अधिकृत विक्रेत्यांकडून, रेल्वे स्थानकावरील बुकिंग काऊंटरमधून किंवा एटीव्हीएमद्वारे जारी केलेले वैध तिकिटे घेऊनच प्रवास करावा, असे आवाहन मध्य रेल्वे प्रवाशांना केले आहे. प्रवासी त्यांच्या मोबाईल फोनवर युटीस ॲप डाउनलोड करू शकतात आणि मोबाईल युटीस ॲपद्वारे तिकिटे बुक करू शकतात. प्रवाशांना इशारा देण्यात येतो की, बनावट तिकिटे तयार करणे / मिळवणे किंवा त्यावरून प्रवास करणे यांसारख्या फसवणूक करणाऱ्या मार्गांचा वापर करू नये. अशी कृत्ये भारतीय न्याय संहिता २०२३ अंतर्गत दंडनीय असून, दंड अथवा कमाल ७ वर्षांपर्यंतची कैद किंवा दोन्ही शिक्षा होऊ शकतात.

Comments
Add Comment

शाई पुसून पुन्हा मतदान करणे शक्य नाही!

राज्य निवडणूक आयुक्तांचे स्पष्टीकरण; मतदारांमध्ये संभ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न मुंबई : महापालिका

Ashish Shelar : मेंदूत केमिकल लोचा अन् हातावर...'रडके' म्हणत आशिष शेलारांनी ठाकरे बंधूना काढला चिमटा

मुंबई : राज्यातील २९ महानगरपालिकांच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी आज उत्साहात मतदान पार पडत असतानाच, शाईच्या

मतदानानंतर बोटावर शाई का लावली जाते? हात किंवा बोट नसल्यास काय असते नियम?

मुंबई : राज्यातील अनेक महापालिकांमध्ये आज मतदान प्रक्रिया सुरू असून नागरिक उत्साहाने आपला मतदानाचा हक्क बजावत

'मशिदीवर पुन्हा भोंगे लावण्याचे उबाठाचे वचन'

मुंबई :मशिदीवरील भोंगे पुन्हा लावण्याचे वचन देत उद्धव ठाकरेंनी निवडणूक प्रचार केला, असा गंभीर आरोप मुख्यमंत्री

मुंबईत दुपारी दीड वाजेपर्यंत २९.९६ टक्के मतदान

मुंबई : देशाची आर्थिक राजधानी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मुंबईसह राज्यातील २९ महापालिकांसाठी मतदान सुरू आहे.

मुंबईच्या इस्लामीकरणाचे षडयंत्र ‘टीस’च्या अहवालातून उघड

मुंबई  : २०५१ पर्यंत मुंबईतील हिंदू लोकसंख्या केवळ ५४ टक्के उरेल, अशी धक्कादायक माहिती देशातील अग्रगण्य टाटा