कौटुंबिक कथेमुळे प्रसिद्ध झालेलं एक अनोख मंदिर

राजस्थान : भारतातील मंदिरांची ओळख साधारणपणे त्या मंदिरातील देवतेवरून होती असते. मात्र राजस्थानात एक अशी ऐतिहासिक धार्मिक वास्तू आहे, जी देवतेपेक्षा तिच्या मागील कौटुंबिक कथेमुळे अधिक परिचित झाली आहे. ‘देवरानी-जेठानी मंदिर’ नावाने ओळखली जाणारी ही दोन मंदिरे प्रत्यक्षात दोन भावजयांनी उभारली आहेत.


शेकडो वर्षे जुन्या या मंदिरांची निर्मिती भारताच्या स्वातंत्र्यपूर्व काळात झाली होती. दोन्ही मंदिरं भगवान कृष्णाला समर्पित असली तरी इथली खासीयत म्हणजे शिवलिंगांची अनोखी रचना. एका मंदिरात तब्बल ११ शिवलिंगांची स्थापना करण्यात आली असून या भागात शिवपूजेचा खोलवर प्रभाव असल्याने या शिवलिंगांना विशेष धार्मिक महत्त्व दिले जाते. स्थानिक भाविकांचा असा विश्वास आहे की या शिवलिंगांवर पाणी अर्पण केल्यास घरात शांतता, समाधान आणि समृद्धी नांदते.


मंदिर परिसरात खास हवन छत्रही आहे, जिथे वेळोवेळी यज्ञ-विधी पार पडतात. भगवान कृष्णाच्या मनोहर मूर्ती तसेच भिंतीवरील आकर्षक नक्षीकाम आजही दशकांपूर्वीच्या कलेची साक्ष देतात. मजबूत बांधकाम व पारंपरिक राजस्थानी शैलीमुळे हे मंदिर स्थानिकांसह पर्यटकांसाठीही केंद्रबिंदू ठरते.


या मंदिरामागे एक रंजक कौटुंबिक कथा सांगितली जाते. बयानी कुटुंबातील दोन भावजयी भगवान श्रीकृष्णाच्या परमभक्त होत्या. त्या दररोज सिकरमधील मदन मोहन मंदिरात पूजेला जात असत. एके दिवशी मोठी भावजय आधी पोहोचली आणि तिने मंदिराचा दरवाजा बंद केला. छोटी भावजय आत येण्यासाठी विनंती करत असताना तिला उत्तर मिळाले—“पूजा करायची असेल तर स्वतःचं मंदिर बांध.” या घटनेनंतर, १९४९ मध्ये छोट्या भावजयीने स्वतःचं मंदिर उभारलं, जे आज देवरानी मंदिर म्हणून ओळखलं जातं. समोरच असलेलं दुसरं मंदिर जेठानीचे, म्हणूनच या दोन्ही मंदिरांना 'देवरानी-जेठानी मंदिर' अशी ओळख मिळाली.


ही मंदिरे राजस्थानातील सीकर जिल्ह्यातील सीकर शहरातील चांदपोल गेटजवळ एकमेकांसमोर उभी आहेत. त्यामुळे त्यांना ‘आमनेसामने मंदिर’ असंही म्हटलं जातं. ऐतिहासिक वास्तू, सांस्कृतिक वारसा आणि भक्तीचा अनोखा संगम पाहायचा असेल तर या मंदिरांना भेट देण्यास हरकत नाही.

Comments
Add Comment

गोंदिया-जबलपूर मार्ग दुहेरीकरणाला केंद्रीय मंत्रिमंडळाकडून मंजुरी

महाराष्ट्रासह चार राज्यात मल्टी-ट्रॅकिंग प्रकल्प नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली

पोखरणमध्ये भारताचे हवाई दल करणार 'ऑपरेशन वायुशक्ती'

पोखरण : भारतीय हवाई दल राजस्थानमधील पोखरण येथे २७ फेब्रुवारी रोजी 'ऑपरेशन वायुशक्ती' अंतर्गत युद्धसराव अर्थात

संसदीय मुत्सद्देगिरीत डॉ. श्रीकांत शिंदेंची एन्ट्री; इंडोनेशियासोबतच्या संबंधांचे करणार सारथ्य

नवी दिल्ली : भारताची 'संसदीय मुत्सद्देगिरी' (Legislative Diplomacy) जागतिक स्तरावर अधिक बळकट करण्यासाठी लोकसभा अध्यक्ष मा. ओम

Kerala To Be Renamed : केरळचे नाव बदलून केरळम होणार? राज्य निवडणुकीपूर्वी मोठ्या निर्णयाची शक्यता

केरळचे नाव बदलून केरळम करण्याचे विधेयक आज केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत मंजूर होण्याची शक्यता आहे, जो

AI ​​Impact Summit मधील आंदोलन प्रकरणी युवक काँग्रेस अध्यक्षाला अटक

नवी दिल्ली : मागील आठवड्यात झालेल्या एआय इम्पॅक्ट समिटमधील भारतीय युवा काँग्रेसच्या आंदोलन प्रकरणात दिल्ली

US Tariff on India : अमेरिकेच्या टॅरिफ बदलांच्या परिणामांवर भाष्य करणे खूप घाईचे ठरेल - अर्थमंत्री निर्मला सीतारमण

अमेरिकेने केलेल्या शुल्कातील (टॅरिफ) बदलांच्या परिणामांबाबत भाष्य करणे खूप घाईचे ठरेल, असे केंद्रीय अर्थ आणि