कौटुंबिक कथेमुळे प्रसिद्ध झालेलं एक अनोख मंदिर

राजस्थान : भारतातील मंदिरांची ओळख साधारणपणे त्या मंदिरातील देवतेवरून होती असते. मात्र राजस्थानात एक अशी ऐतिहासिक धार्मिक वास्तू आहे, जी देवतेपेक्षा तिच्या मागील कौटुंबिक कथेमुळे अधिक परिचित झाली आहे. ‘देवरानी-जेठानी मंदिर’ नावाने ओळखली जाणारी ही दोन मंदिरे प्रत्यक्षात दोन भावजयांनी उभारली आहेत.


शेकडो वर्षे जुन्या या मंदिरांची निर्मिती भारताच्या स्वातंत्र्यपूर्व काळात झाली होती. दोन्ही मंदिरं भगवान कृष्णाला समर्पित असली तरी इथली खासीयत म्हणजे शिवलिंगांची अनोखी रचना. एका मंदिरात तब्बल ११ शिवलिंगांची स्थापना करण्यात आली असून या भागात शिवपूजेचा खोलवर प्रभाव असल्याने या शिवलिंगांना विशेष धार्मिक महत्त्व दिले जाते. स्थानिक भाविकांचा असा विश्वास आहे की या शिवलिंगांवर पाणी अर्पण केल्यास घरात शांतता, समाधान आणि समृद्धी नांदते.


मंदिर परिसरात खास हवन छत्रही आहे, जिथे वेळोवेळी यज्ञ-विधी पार पडतात. भगवान कृष्णाच्या मनोहर मूर्ती तसेच भिंतीवरील आकर्षक नक्षीकाम आजही दशकांपूर्वीच्या कलेची साक्ष देतात. मजबूत बांधकाम व पारंपरिक राजस्थानी शैलीमुळे हे मंदिर स्थानिकांसह पर्यटकांसाठीही केंद्रबिंदू ठरते.


या मंदिरामागे एक रंजक कौटुंबिक कथा सांगितली जाते. बयानी कुटुंबातील दोन भावजयी भगवान श्रीकृष्णाच्या परमभक्त होत्या. त्या दररोज सिकरमधील मदन मोहन मंदिरात पूजेला जात असत. एके दिवशी मोठी भावजय आधी पोहोचली आणि तिने मंदिराचा दरवाजा बंद केला. छोटी भावजय आत येण्यासाठी विनंती करत असताना तिला उत्तर मिळाले—“पूजा करायची असेल तर स्वतःचं मंदिर बांध.” या घटनेनंतर, १९४९ मध्ये छोट्या भावजयीने स्वतःचं मंदिर उभारलं, जे आज देवरानी मंदिर म्हणून ओळखलं जातं. समोरच असलेलं दुसरं मंदिर जेठानीचे, म्हणूनच या दोन्ही मंदिरांना 'देवरानी-जेठानी मंदिर' अशी ओळख मिळाली.


ही मंदिरे राजस्थानातील सीकर जिल्ह्यातील सीकर शहरातील चांदपोल गेटजवळ एकमेकांसमोर उभी आहेत. त्यामुळे त्यांना ‘आमनेसामने मंदिर’ असंही म्हटलं जातं. ऐतिहासिक वास्तू, सांस्कृतिक वारसा आणि भक्तीचा अनोखा संगम पाहायचा असेल तर या मंदिरांना भेट देण्यास हरकत नाही.

Comments
Add Comment

'स्थानिक'च्या निवडणुकांबाबत काय म्हणाले सर्वोच्च न्यायालय ?

नवी दिल्ली : महाराष्ट्रातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत आरक्षणाची पन्नास टक्क्यांची कमाल मर्यादा

‘वनतारा’च्या उद्दिष्टांचे जागतिक स्तरावर पुनरुज्जीवन

सीआयटीईएसच्या बैठकीत भारताच्या भूमिकेला मान्यता जामनगर : उझबेकिस्तानमधील समरकंद येथे नुकतेच पार पडलेल्या

रेल्वेमध्ये ‘हलाल’ प्रमाणित अन्न विकण्याची अधिकृत तरतूद नाही

'एनएचआरसी'च्या नोटिसीला भारतीय रेल्वे बोर्डाचे स्पष्टीकरण नवी दिल्ली  : रेल्वे प्रवाशांना दिल्या जाणाऱ्या

नियामक रचनेत फेरफार करण्यासाठी वैद्यकीय महाविद्यालयाने आरोग्य अधिकाऱ्यांना दिली लाच! ईडीच्या छापेमारीत प्रकरण आले उजेडात

मुंबई: विशिष्ट अभ्यासक्रम सुरू करण्यासाठी केंद्रीय आरोग्य मंत्रालयातील अधिकाऱ्यांना तसेच, राष्ट्रीय वैद्यकीय

लाल किल्ला पर्यटकांसाठी १० दिवस बंद

नवी दिल्ली : दिल्लीचा ऐतिहासिक लाल किल्ला येत्या डिसेंबर महिन्यात १० दिवसांसाठी सर्वसामान्य पर्यटकांसाठी बंद

बलाढ्य भारताच्या तीन भूभागांवर टीचभर नेपाळचा दावा

१०० रुपयांच्या नोटेवर दाखवले भारताचे तीन भाग मुंबई : विशाल आणि बलाढ्य अशी जगाच्या नकाशावर ओळख असलेल्या