कौटुंबिक कथेमुळे प्रसिद्ध झालेलं एक अनोख मंदिर

राजस्थान : भारतातील मंदिरांची ओळख साधारणपणे त्या मंदिरातील देवतेवरून होती असते. मात्र राजस्थानात एक अशी ऐतिहासिक धार्मिक वास्तू आहे, जी देवतेपेक्षा तिच्या मागील कौटुंबिक कथेमुळे अधिक परिचित झाली आहे. ‘देवरानी-जेठानी मंदिर’ नावाने ओळखली जाणारी ही दोन मंदिरे प्रत्यक्षात दोन भावजयांनी उभारली आहेत.


शेकडो वर्षे जुन्या या मंदिरांची निर्मिती भारताच्या स्वातंत्र्यपूर्व काळात झाली होती. दोन्ही मंदिरं भगवान कृष्णाला समर्पित असली तरी इथली खासीयत म्हणजे शिवलिंगांची अनोखी रचना. एका मंदिरात तब्बल ११ शिवलिंगांची स्थापना करण्यात आली असून या भागात शिवपूजेचा खोलवर प्रभाव असल्याने या शिवलिंगांना विशेष धार्मिक महत्त्व दिले जाते. स्थानिक भाविकांचा असा विश्वास आहे की या शिवलिंगांवर पाणी अर्पण केल्यास घरात शांतता, समाधान आणि समृद्धी नांदते.


मंदिर परिसरात खास हवन छत्रही आहे, जिथे वेळोवेळी यज्ञ-विधी पार पडतात. भगवान कृष्णाच्या मनोहर मूर्ती तसेच भिंतीवरील आकर्षक नक्षीकाम आजही दशकांपूर्वीच्या कलेची साक्ष देतात. मजबूत बांधकाम व पारंपरिक राजस्थानी शैलीमुळे हे मंदिर स्थानिकांसह पर्यटकांसाठीही केंद्रबिंदू ठरते.


या मंदिरामागे एक रंजक कौटुंबिक कथा सांगितली जाते. बयानी कुटुंबातील दोन भावजयी भगवान श्रीकृष्णाच्या परमभक्त होत्या. त्या दररोज सिकरमधील मदन मोहन मंदिरात पूजेला जात असत. एके दिवशी मोठी भावजय आधी पोहोचली आणि तिने मंदिराचा दरवाजा बंद केला. छोटी भावजय आत येण्यासाठी विनंती करत असताना तिला उत्तर मिळाले—“पूजा करायची असेल तर स्वतःचं मंदिर बांध.” या घटनेनंतर, १९४९ मध्ये छोट्या भावजयीने स्वतःचं मंदिर उभारलं, जे आज देवरानी मंदिर म्हणून ओळखलं जातं. समोरच असलेलं दुसरं मंदिर जेठानीचे, म्हणूनच या दोन्ही मंदिरांना 'देवरानी-जेठानी मंदिर' अशी ओळख मिळाली.


ही मंदिरे राजस्थानातील सीकर जिल्ह्यातील सीकर शहरातील चांदपोल गेटजवळ एकमेकांसमोर उभी आहेत. त्यामुळे त्यांना ‘आमनेसामने मंदिर’ असंही म्हटलं जातं. ऐतिहासिक वास्तू, सांस्कृतिक वारसा आणि भक्तीचा अनोखा संगम पाहायचा असेल तर या मंदिरांना भेट देण्यास हरकत नाही.

Comments
Add Comment

January : भारतीय मॅन्युफॅक्चरिंग क्षेत्राची गरुडझेप; जानेवारीत 'PMI' मध्ये सुधारणा, पण उद्योजकांच्या मनात धाकधूक!

भारतीय अर्थव्यवस्था आणि उत्पादन क्षेत्रासाठी जानेवारी २०२६ हा महिना संमिश्र पण काहीसा दिलासादायक ठरला आहे.

Gold-Silver Rate: आठवड्याच्या पहिल्याच दिवशी सोनं- चांदीच्या दरात घसरण; जाणून घ्या नवे दर

मुंबई: रविवार १ फेब्रुवारी रोजी भारताचा अर्थसंकल्प जाहीर झाला. यावेळी सोने आणि चांदीबाबत कोणतीही मोठी थेट घोषणा

‘आशियामध्ये शांततेसाठी अरब राष्ट्राची भूमिका कौतुकास्पद’

नवी दिल्ली : अरब देशाच्या परराष्ट्रमंत्र्यांनी शनिवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली. यावेळी

भारताचे आतापर्यंतचे सर्वात मोठे संरक्षण बजेट

नवी दिल्ली : यंदाच्या बजेटमध्ये संरक्षण विभागासाठी ७.८ लाख कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. संरक्षणासाठी

भूतान, नेपाळ, श्रीलंका याविश्वासू मित्रांसाठी मदतीचा हात, संबंधातील कडवटपणामुळे बांगलादेशला आर्थिक झटका

नवी दिल्ली  : केंद्रातील मोदी सरकारने २०२६-२७ या आर्थिक वर्षाचा अर्थसंकल्प सादर करताना आपल्या परराष्ट्र धोरणाचे

इतर देशांच्या तुलनेत किती मोठे आहे देशाचे संरक्षण बजेट

नवी दिल्ली: केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी संसदेत बजेट सादर केले. यंदाच्या बजेटमध्ये भारताच्या