भारतातून अफगाणिस्तानला ७३ टन मदत रवाना

नवी दिल्ली : पाकिस्तान वारंवार अफगाणिस्तानवर हल्ले करत आहे. या पार्श्वभूमीवर भारताने अफगाणिस्तानला ७३ टन मदत विशेष विमानाने रवाना केली आहे. या मदतीत औषधांचा साठा, लसचा साठा, अनेक अत्यावश्यक पदार्थ आहेत. ही मदत अफगाणिस्तान सरकारच्या आरोग्य विभागाला सुपूर्द करण्यात आली आहे. भारताकडून मिळालेल्या मदतीसाठी अफगाणिस्तानने मोदी सरकारचे आभार मानले आहेत.



भारत आणि अफगाणिस्तान यांच्यातील मैत्री अधिकाधिक घट्ट होत असल्याचे पाहून पाकिस्तानची झोप उडाली आहे. पाकिस्तान हल्ले करत असताना भारताकडून मिळालेली मदत हा अफगाणिस्तानसाठी मोठा आधार आहे. पण पाकिस्तानच्या सरकारमध्ये भारत करत असलेल्या मदतीमुळे प्रचंड अस्वस्थता आहे.

पाकिस्तानने केलेल्या एका हल्ल्यात अफगाणिस्तानमध्ये एक महिला आणि नऊ मुलांचा मृत्यू झाला आहे. यानंतर अफगाणिस्तानने पाकिस्तानला कडक शब्दांत इशारा दिला आहे. पाकिस्तानच्या हल्ल्याला योग्य पद्धतीने आणि योग्य वेळी उत्तर देऊ असे अफगाणिस्तानने जाहीर केले आहे. पाकिस्तान आणि अफगाणिस्तान यांच्यातील तणाव वाढत असतानाच भारताने अफगाणिस्तानला ७३ टन मदत विमानातून पाठवली आहे. याआधी ऑक्टोबर २०२५ मध्ये भारताने अफगाणिस्तानला औषधांचा मोठा साठा, लसचा साठा आणि वीस सुसज्ज रुग्णवाहिकांचा ताफा ही मदत पाठवली होती. भारताने अफगाणी नागरिकांसाठी सहा कल्याणकारी वैद्यकीय योजना सुरू केल्या आहेत. या योजनांसाठीही अफगाणिस्तानने मोदी सरकारचे आभार मानले आहेत.
Comments
Add Comment

Indian Flag : पाण्याखाली फडकवला जगातील सर्वात मोठा भारतीय तिरंगा

अंदमान - निकोबार बेटे : अंदमान आणि निकोबार बेटांनी शनिवारी ऐतिहासिक कामगिरी करत 'गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड'मध्ये

Workers Day : कामगार दिनानिमित्त महापालिका सफाई कामगारांचा गौरव महापालिकेचा डी विभागाने घेतला पुढाकार

मुंबई : महाराष्ट्र दिन व आंतरराष्ट्रीय कामगार दिनाच्या निमित्ताने मुंबई महानगरपालिकेच्या डी विभाग, घन कचरा

Chhattisgarh Soldier News : छत्तीसगडमधील जवान शहीद; सुरुंग निकामी करण्याच्या कामादरम्यान मोठा स्फोट

छत्तीसगड : एकेकाळी नक्षलवाद्यांचा परिसर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या भागात सुरुंग निकामी करण्याचे काम सुरू असताना

LPG Gas Price Hike : महागाईचा भडका! व्यावसायिक नंतर आता घरगुती सिलेंडरच्या किंमतीतही वाढ

मुंबई : गेल्या १५ वर्षांत घरगुती गॅस (LPG Gas) सिलेंडरच्या किंमतींमध्ये मोठी वाढ झाली असून त्या दुपटीहून अधिक झाल्या

West Bengal Election 2026 : ईव्हीएम वाद पेटला! बंगालमध्ये १५ केंद्रांवर फेरमतदान सुरू; टेप लावून बटणे झाकल्याचा आरोप

मुंबई : पश्चिम बंगालमध्ये ईव्हीएममध्ये फेरफार केल्याच्या आरोपांमुळे राजकीय वातावरण तापले आहे. परगणा

25 वर्षांच्या संसारात मिठाचा खडा , 7 लेकरांची आईने चारित्र्याच्या संशयाने जीव गमावला ; काय घडलं ?

Bihar Crime : बिहारमध्ये एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. २५ वर्षाच्या संसारात मिठाचा खडा पडला. 25 वर्षांपूर्वी ज्या