विद्यार्थिनीच्या आत्महत्येप्रकरणी ब्लॅकमेलिंग करणारा तरुण अटकेत

मुंबई : एका तरुणाने मॉर्फ छायाचित्रे व्हायरल करण्याच्या दिलेल्या धमकीनंतर कुटुंबाची बदनामी होईल, या भीतीने नववीतील विद्यार्थिनीने गळफास घेत आत्महत्या केल्याची घटना नुकतीच गोरेगावमध्ये घडली. याप्रकरणी पोलिसांनी धमकी देत पैसे उकळणाऱ्या तरुणाला अटक केली.


पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, नववीतील तरुणीने ऑगस्ट महिन्यात घर सोडले होते. पालकांनी शोधाशोध केली असता ती चेन्नई येथे मैत्रीणीकडे असल्याचे समजले. तेथून मुंबईत आणल्यावर पालकांनी विचारपूस केली. तेव्हा आरोपी तरुणाकडून मानसिक छळ सुरू असल्याचे तिने सांगितले. पालकांनी संबंधित तरुणास खडसावले. दरम्यान, गेल्या आठवड्यात ही तरुणी मध्यरात्री फोनवर बोलत असल्याने, पालकांनी विचारणा केली. तेव्हा आरोपी तरुण मॉर्फ छायाचित्रे व्हायरल करण्याची धमकी देऊन पैसे मागत असल्याचे तरुणीने सांगितले. यापूर्वीही त्याने अनेकदा पैसे घेतले होते. या त्रासातून तिने आत्महत्येचा केली. गोरेगाव पोलिसांनी आरोपीला बोरिवली न्यायालयात हजर केले असता त्यास पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. दरम्यान, यासंदर्भात मानसोपचारतज्ज्ञ डॉ. सागर मुंदडा म्हणाले की, ब्लॅकमेलिंग आणि सततच्या धमक्या कोणत्याही व्यक्तीला गंभीर नैराश्यात ढकलू शकतात. यामुळे खोलवर आघात होऊ शकतो, विशेषतः तरुणांना अशा परिस्थितीत, कुटुंब आणि मित्रांचा पाठिंबा आणि वेळेवर मानसोपचार उपचार खूप महत्वाचे आहेत. जर यात विलंब झाला तर ती व्यक्ती आत्महत्येचे पाऊल उचलू शकते.

Comments
Add Comment

महापालिका सभागृहात दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांना वाहिली श्रध्दांजली

मुंबई: राज्याचे दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनानिमित्त महापालिका सभागृहात शोक प्रस्तावाद्वारे

Drink and Drive New Rules Maharashtra: दारू पिऊन वाहन चालवणाऱ्यांवर...; परिवहन मंत्र्यांचे निर्देश

मुंबई: राज्यातील महामार्गांवर होणारे अपघात रोखण्यासाठी परिवहन विभागाने आता कंबर कसली आहे. विशेषतः समृद्धी

आर्थिक बेशिस्तीला मुख्यमंत्री फडणवीसांचा लगाम

११ हजार ९९५ कोटींच्या पुरवणी मागण्या सादर; वित्तीय शिस्त राखताना अत्यावश्यक बाबींना दिले प्राधान्य मुंबई :

गरजूंपर्यंत गुणवत्तापूर्ण आरोग्यसेवा पोहचविणे हीच खरी देशसेवा

मुंबई : देशातील गरीब व्यक्तींपर्यंत विनासायास व गुणवत्तापूर्ण वैद्यकीय सेवा पोहोचविणे हे आपले प्रमुख ध्येय

अलमुरी रत्नमाला इन्स्टिट्यूटमधील गैरव्यवहाराची चौकशी होणार

मुंबई : अलमुरी रत्नमाला इन्स्टिट्यूट ऑफ इंजीनिअरिंग अँड टेक्नॉलॉजी, सापगाव (ता. शहापूर जि. ठाणे) मधील

मंत्री नितेश राणे यांच्या बंदरे खात्याची उल्लेखनीय कामगिरी

इंडिया मेरिटाईम वीक २०२५ मधील ५६ हजार कोटींचे करार राज्यासाठी ऐतिहासिक यश; आमदार प्रवीण दरेकर बंदरे विभागातील