वाढवण बंदरातील रोजगारात भूमिपुत्रांना प्राधान्य : मुख्यमंत्री

पालघर : पालघर जिल्ह्यातील मासेमारी करणारे मच्छीमार बांधव आणि स्थानिक भूमिपुत्र यांच्यावर कोणतीही गदा येऊ नये, या बाबीचा विचार करूनच वाढवण बंदराचे काम सुरू करण्यात आले होते. तसेच तेथील रोजगाराच्या संधीत सुद्धा स्थानिक भूमिपुत्रांना प्रथम प्राधान्य देण्यात येणार असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले. पालघर येथे नगरपरिषद निवडणुक उमेदवारांच्या प्रचारार्थ बुधवारी आयोजित सभेत ते बोलत होते


पालघर नगर परिषद निवडणुकीच्या अनुषंगाने भारतीय जनता पक्षाच्या नगराध्यक्ष पदाचे उमेदवार कैलास म्हात्रे व इतर उमेदवारांच्या प्रचारार्थ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची सभा आयोजित करण्यात आली होती. या सभेला प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण, वनमंत्री तथा पालकमंत्री गणेश नाईक, खासदार डॉ. हेमंत सवरा, आमदार स्नेहा दुबे-पंडित, आमदार राजन नाईक, आमदार हरिश्चंद्र भोये, पालघर जिल्हाध्यक्ष भरत राजपूत,वसई-विरार जिल्हाध्यक्ष प्रज्ञा पाटील आदी मान्यवर उपस्थित होते.


पालघर जिल्ह्यात नवीन प्रकल्पाची विविध कामे हाती घेतली आहेत. विकसित जिल्हा म्हणून या जिल्ह्याची नवी ओळख तयार होत आहे. असे मत मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केले. पंतप्रधानांच्या विकासाचा संदेश घेऊन आपण विकासाची वाटचाल करण्याकरिता येथे आलो असल्याचे यावेळी मुख्यमंत्र्यांनी यांनी स्पष्ट केले.

Comments
Add Comment

वनजमिनीच्या तांत्रिक पेचात अडकली आदिवासींची घरे

विवेक पंडित यांनी मंत्रालयाचे वेधले लक्ष वसई  : राज्यातील बेघर आदिवासी, विशेषतः आदिम कातकरी समाजाच्या गावठाण

तारापूर औद्योगिक वसाहतीत वायू गळती

बोईसर : पालघर जिल्ह्यातील बोईसरमधील तारापूर औद्योगिक वसाहतीतल्या भघेरिया केमिकल्समध्ये (जुने नाव : झेनित

पालघरमध्ये बंद दगड खाणीत दुर्घटना; दोन अल्पवयीन मुलांचा बुडून मृत्यू

पालघर : पाण्याचा अंदाज न ओळखता आल्याने दोन मुलांचा जीव गेल्याची दुर्दैवी घटना पालघरमध्ये घडली आहे. मनोरजवळील

औद्योगिक क्षेत्रातील समस्यांवर आमदारांनी वेधले लक्ष

विजेच्या अडचणींसह जमिनीचा लीज प्रश्न सोडवा वसई  : वसई-विरार औद्योगिक क्षेत्रातील छोटे मोठे उद्योजक विविध

वसई-विरारचा अर्थसंकल्प ‘वेटिंग’वर!

स्थायी समिती सभापतींची निवड लांबल्याने मार्चचा मुहूर्त विरार : महापौर, उपमहापौर निवडणूक उशिरा होऊनही मुंबई

ई-गव्हर्नन्स मूल्यमापनात वसई–विरार पालिकेचा ‘नववा क्रमांक’ कायम

पालघर :  राज्यातील महानगरपालिकांच्या ई-गव्हर्नन्स कामकाजाच्या मूल्यमापनात वसई–विरार महानगरपालिकाने यंदाही