राममंदिरावर फडकवण्यात येणाऱ्या ध्वजाची रचना, महत्त्व आणि इतर तपशील, जाणून घ्या सविस्तर

अयोध्या : हिंदूंचे धार्मिक स्थळ असलेल्या राम मंदिरावर आज ध्वजारोहण समारंभ होणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते दुपारी १२:१० ते १२:३० या शुभ मुहूर्तावर राम मंदिराच्या शिखरावर ध्वजारोहण करण्यात येणार आहे. हा ध्वज वर्षातून दोनदा वासंतिक नवरात्र आणि शारदीय नवरात्र दरम्यान बदलला जाईल, अशी माहिती श्री राम जन्मभूमी तीर्थ क्षेत्राचे विश्वस्त आणि ध्वजारोहण समारंभाचे प्रमुख यजमान डॉ. अनिल मिश्रा यांनी दिली आहे.



धार्मिक ध्वजाचे महत्त्व


राम मंदिरावर फडकवण्यात येणाऱ्या ध्वजाच्या खांबाची उंची ३० फूट आहे. जो मंदिराच्या १६१ फूट उंच शिखरावर बसवला गेला आहे. या ध्वजामुळे मंदिराचे शिखर आणि ध्वज अशी एकूण १९१ फूट उंची होणार आहे. हा ध्वज ११ फूट लांब आणि २२ फूट रुंद आहे. ज्याचा रंग भगवा म्हणजेच हिंदूचे प्रतीक आहे. या ध्वजासाठी रेशमी कापड वापरले असून त्यावर पॅराशूट कापडाचा थर आहे. या ध्वजावर मध्यभागी सूर्य आणि त्यामध्ये ओमचे चिन्ह आहे. तर सूर्याच्या बाजूला कोविदार वृक्ष आहे. हा ध्वज सहा कारागिरांनी तयार केला आहे.



ध्वजावर असणाऱ्या चिन्हांचे अर्थ



भगवा रंग : प्रकाश, त्याग आणि तपाचे प्रतिक
सूर्य चिन्ह : प्रभू रामचंद्राच्या सूर्यवंशाचे प्रतिक
कोविदार वृक्ष : अयोध्याचे राजवंशीय चिन्ह
सूर्याच्या मध्यभागी असणारे ओम चिन्ह : परमात्म्याचे प्रथम अक्षर


ध्वजारोहण समारंभात सर्वप्रथम वैदिक स्तोत्रांसह ध्वजाची पूजा करणे आणि दैवी औषधी वनस्पतींनी स्नान घालणे समाविष्ट आहे. यानंतर ध्वज मुख्य यजमानांनी नियुक्त केलेल्या शुभ मुहूर्तावर फडकविण्यासाठी सुपूर्द केला जाईल. राम मंदिरावर फडकवण्यात येणारा हा ध्वज विजय, अध्यात्म आणि सहिष्णुतेचा संदेश देतो.


Comments
Add Comment

India T20 World Cup Squad Announcement : वर्ल्ड कप २०२६ साठी टीम इंडिया सज्ज! BCCIची आज महत्त्वाची बैठक; कोणाला मिळणार संधी अन् कोणाचा पत्ता कट?

मुंबई : आयसीसी पुरुष टी-२० वर्ल्ड कप २०२६ साठी संपूर्ण क्रिकेट विश्व ज्याची वाट पाहत आहे, त्या भारतीय संघाची घोषणा

Imran Khan : पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान यांना १७ वर्षांची जेल; भ्रष्टाचार प्रकरणात पत्नी बुशरा बीबीलाही मोठी शिक्षा

पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान आणि त्यांच्या पत्नी बुशरा बीबी यांना भ्रष्टाचाराच्या एका मोठ्या

Rajdhani Express Accident : आसाममध्ये काळजाचा थरकाप! राजधानी एक्सप्रेसची हत्तींच्या कळपाला धडक, ८ हत्तीचं जागीच दुर्दैवी मृत्यू

आसाममधील जमुनामुख जवळील सानरोजा भागात शुक्रवारी मध्यरात्री एक अत्यंत भीषण आणि दुर्दैवी रेल्वे अपघात झाला.

केदारनाथमधून बर्फ गायब; निसर्गाचा इशारा की हवामान बदलाचा परिणाम?

उत्तराखंड : ऋतुचक्र बदलत चाललंय या आधी आपण फक्त बोलतच होतो पण आता ते प्रत्यक्षात घडत जात आहे. कारण केदारनाथ

भारत-ओमानची मुक्त व्यापार करारावर स्वाक्षरी

करारामुळे द्विपक्षीय संबंधांना नवी ऊर्जा मस्कत : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सुलतान हैथम बिन तारिक यांच्याशी

IND vs SA : संजूचा नादच खुळा! १००० धावांचा टप्पा पार करत अभिषेक-सूर्याच्या पंगतीत पटकावले स्थान

भारतीय संघाचा धडाकेबाज सलामीवीर संजू सॅमसनने दक्षिण आफ्रिके विरुद्धच्या शेवटच्या टी-२० सामन्यात आपल्या