अलिबाग-मुरुड बस सेवा ठप्प ; प्रवाशांचा खोळंबा

नांदगाव मुरुड ( वार्ताहर): अलिबाग आगारातून मुरुडकडे जाणाऱ्या एसटी बस सेवेत मंगळवारी गंभीर गफलत पाहायला मिळाली. दुपारी तीन ते सव्वा सहा दरम्यान मुरुडसाठी एकही बस न सुटल्याने या मार्गावरुन प्रवास करणार्या प्रवाशांना तीन साडेतीन तास खोळंबून रहावे लागले. या ताणतणावामुळे प्रवाशांचा गोंधळ उडाला आणि त्यांनी वाहतूक प्रशासनाच्या या गलथान कारभारावर संतापासह नाराजी व्यक्त केली. प्रवाशांनी दिलेल्या माहितीनुसार मंगळवारी दुपारी तीन वाजल्यापासून सव्वा सहापर्यंत अलिबाग आगारात प्रवाशी बसची वाट पाहत उभे होते, परंतु मुरुडकडे जाणारी एकही बस फलाटावर आली नाही. अनेक प्रवाशांना कामावर, मुलांच्या शाळेत किंवा वैद्यकीय कारणास्तव मुरुडला जायचे होते. परंतु बस न सुटल्याने त्यांना त्रास सहन करावा लागला असे त्यांनी सांगितले.

मुरुड आगार प्रमुख राहुल शिंदे यांनी याबाबत विचारणा केली असता, 'अलिबाग आगारातून मुरुडला जाणारी बस पाच वाजता सुटली आहे,' असा दावा केला. मात्र, प्रवाशांचा अनुभव आणि आगारातील परिस्थिती यानुसार बस वेळेवर निघालेली नव्हती. अलिबाग आगारात चौकशी केली असता तेथील अधिकाऱ्यांच्या सांगण्यानुसार मुरुडकडे जाणाऱ्या बसेस मुख्यतः मुरुड आगारातून निघालेल्या असतात, अलिबाग आगाराची बस या मार्गावर नियमित निघत नाही. त्यामुळे प्रवाशांना वेळेवर मुरुडला पोहोचण्यासाठी अतिरिक्त व्यवस्था करावी लागते. स्थानिक नागरिक आणि प्रवाशांनी या परिस्थितीवर तातडीने उपाययोजना करण्याची मागणी केली. प्रवाशांना वेळेवर माहिती देणे आणि वाहतूक व्यवस्थापन मजबूत करण्याची आवश्यकता असल्याचेही मत व्यक्त केले जात आहे.यामुळे अलिबाग-मुरुड मार्गावर बस सेवा सुधारण्यासाठी प्रशासनाने तातडीने उपाययोजना करणे आवश्यक आहे.
Comments
Add Comment

Devendra Fadnavis : नवी मुंबई विमानतळावर शिवरायांचा कांस्य पुतळा

नवी मुंबई विमानतळ : महाराष्ट्राचे माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते नवी मुंबई आंतरराष्ट्रीय

Vladimir Putin : भारतावर निर्बंधांचा परिणाम होणार नाही, पुतिन यांचा मोदींवर विश्वास

मॉस्को : ‘भारत आणि रशिया यांच्यातील सहकार्य आणि व्यापारी भागीदारी अत्यंत मजबूत आहे. कोणत्याही देशाने दिलेल्या

Gautami Patil's new song : गौतमी पाटीलचं नवं गाणं होतंय तुफान व्हायरल, भाऊ कदम म्हणतोय 'हिल हिल पोरी हिला’

Gautami Patil's new song : गौतमी पाटीलला महाराष्ट्रात कोणी ओळखत नाही असं फार क्वचित वेळेत दिसून येईल. सबसे कातील गौतमी पाटील अशी

Chalisgaon : चाळीसगाव महावितरणाचा अजब कारभार: अधिकारी 'मस्तवाल', जनता 'बेहाल'!

Chalisgaon :  चाळीसगाव शहरासह परिसरात महावितरण विभागाचा मनमानी कारभार शिगेला पोहोचला असून, सध्या 'त्रस्त नागरिक आणि

BCCI SELECTION : BCCI कडून दोन मोठ्या स्पर्धांसाठी भारतीय संघांची घोषणा; श्रेयस अय्यरकडे नेतृत्व, तिलक वर्मा उपकर्णधार

MUMBAI : भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (BCCI) आगामी इंग्लंड दौरा 2026 आणि आशियाई क्रीडा स्पर्धा 2026 (जपान) यासाठी भारतीय पुरुष

BCCI SQUAD SELECTION : भारतीय क्रिकेट संघाच्या निवडीसाठी बीसीसीआयची बैठक सुरू; श्रेयस अय्यरकडे सोपवली जाणार धुरा?

BCCI : भारतीय क्रिकेट नियामक मंडळाची (BCCI) वरिष्ठ निवड समिती आज मुंबईतील मुख्यालयात महत्त्वाची बैठक घेत आहे. या बैठकीत