'विकास आणि संस्कृतीला समान महत्त्व देत कार्य करणार'

त्र्यंबकेश्वर (प्रतिनिधी) : कुंभमेळ्यासाठी जगभरातून लाखो-कोट्यवधी भाविक नाशिक आणि त्र्यंबकेश्वरमध्ये येणार आहेत. त्यामुळे ही नगरी स्वच्छ, सुव्यवस्थित आणि पवित्र वाटेल अशी करणे हे आमचे उद्दिष्ट आहे. मी येथे कोणावर टीका करायला आलेलो नाही. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा ‘विकास भी और विरासत भी’ हा मंत्र आम्हाला मार्गदर्शक आहे. विकास आणि संस्कृती या दोन्हीला समान महत्त्व देत आम्ही काम करणार असल्याचे आश्वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले.


कुंभमेळा पूर्वतयारी आणि त्र्यंबकेश्वर नगरपरिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर त्र्यंबकेश्वर येथे झालेल्या सभेत मुख्यमंत्री फडणवीस बोलत होते. यावेळी व्यासपीठावर पालकमंत्री गिरीश महाजन, ज्येष्ठ नेते लक्ष्मण सावजी, बाळासाहेब सानप, माजी आमदार बबनराव घोलप, वैभव पिचड, माजी राज्यमंत्री भारती पवार, जिल्हाध्यक्ष सुनील बच्छाव, भाजपा ओबीसी जिल्हाध्यक्ष कैलास पाटील, त्र्यंबकेश्वर नगराध्यक्ष पदाचे भाजप उमेदवार कैलास घुले यांच्यासह त्र्यंबक व इगतपुरी येथील उमेदवार उपस्थित होते.


फडणवीस म्हणाले की, गोदावरी, त्र्यंबकेश्वर आणि सनातन संस्कृतीच्या वैभवाची आठवण करून देत मतदारांनी विकासाच्या ध्येयाने एकत्र येण्याची गरज आहे. पाणीपुरवठा, कचरा व्यवस्थापन, सांडपाणी प्रकल्प, आरोग्य आणि शिक्षण अशा मूलभूत सुविधा मजबूत करण्यावर भर देणार असल्याचे त्यांनी सांगितले. कुंभमेळ्याच्या निमित्ताने सुरू केलेल्या प्रकल्पांचा लाभ नागरिकांना संपूर्ण वर्षभर मिळणार आहे.


आखाडा परिषदेचे महंत शंकरानंद सरस्वती, पालकमंत्री गिरीश महाजन, लक्ष्मण सावजी, माजी आमदार बबनराव घोलप, वैभव पिचड आणि माजी राज्यमंत्री भारती पवार यांनीही मनोगत व्यक्त केले.त्र्यंबकेश्वरमधील महंत गोरक्षनाथ, आखाड्याचे पीठाधीश्वर गणेशनाथ महाराज, निरंजनी आखाड्याचे धनंजयगिरी महाराज, भाजपा आध्यात्मिक आखाड्याचे महंत सिद्धेश्वरानंद सरस्वती, निळपर्वतावरील महंत सचिव दीपक गिरी, पंचायती महानिर्वाण आखाड्याचे सचिव रमेशगिरी महाराज, श्रीराम शक्तीपीठाचे महंत सोमेश्वरानंद सरस्वती महाराज, तेजस ढेरगे, सुयोग वाडेकर, शिखरे बंधू, पंकज धारणे यांचीही उपस्थिती होती. सभा स्थळी पोलिसांनी चौख बंदोबस्त ठेवला होता.


कोणाचेही घर किंवा दुकान तोडणार नाही


त्र्यंबकेश्वरमध्ये २४ तास स्वच्छ पाणी उपलब्ध करून देणार असून उत्तम रस्ते आणि आरोग्यसेवा निर्माण करणार असल्याचे मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले. विस्थापनाबाबत अफवा पसरवल्याचा आरोप करत त्यांनी सांगितले, “कुंभ किंवा विकास प्रकल्पांच्या नावाखाली कोणाचेही घर किंवा दुकान तोडले जाणार नाही. सर्वांना सोबत घेऊनच काम करणे हेच आमचे ब्रीदवाक्य आहे




Comments
Add Comment

लातूरमध्ये नगरपंचायत निवडणुकीत शिउबाठाला मोठा धक्का; ११ उमेदवारांनी घेतली माघार

लातूर : राज्यातील नगरपरिषद आणि नगरपंचायत निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर लातूर जिल्ह्यातील राजकीय वातावरण गोंधळले

भारताच्या मुलींनी सलग दुसर्‍यांदा जिंकला कबड्डी वर्ल्डकप

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : नोव्हेंबरचा महिना भारतीय महिला खेळाडू गाजवताना दिसत आहेत. २ नोव्हेंबर रोजी हरमनप्रीत

पाकिस्तानच्या शेजाऱ्याने दिली गोल्डन ऑफर

नवी दिल्ली : अफगाणिस्तानचे उद्योग आणि वाणिज्य मंत्री अलहाज नूरुद्दीन अजीजी सहा दिवसांच्या भारत दौऱ्यावर आहेत.

आम्ही लाखो मशिदी उभारू, MIM चे असदुद्दीन ओवैसी फुत्कारले

नवी दिल्ली : जोपर्यंत हे जग आहे, जगाचं अस्तित्व आहे. तोपर्यंत मुसलमान राहणार. आम्ही लढत राहू. आम्ही लाखो मशिदी

१२ वर्षांचा दुरावा संपला; दानवे–लोणीकर पुन्हा एकत्र, कार्यकर्त्यांमध्ये उत्साह

जालना : स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांची धामधूम वाढत असताना जालना जिल्ह्यातील एक मोठी राजकीय घडामोड

भाजपचा मोठा निर्णय; स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी तरुणांना प्राधान्य

मुंबई : राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचे वारे जोरदार वाहू लागले आहे. याच पार्श्वभूमीवर राजकीय