मिनी मंत्रालयाच्या निवडणुका लांबणार? जिल्हा परिषद निवडणुकीवर अजित पवारांचे भाकीत

मुंबई : राज्यात स्थानिक स्वराज्य निवडणुकांचा धुरळा पुन्हा एकदा रंगणार असतानाच जिल्हा परिषद निवडणुकीवर टांगती तलवार आहे . नगरपालिका आणि नगरपरिषद निवडणुकांची तयारी सुरू असताना महापालिका व जिल्हा परिषदेच्या निवडणुकांबाबत चर्चेला वेग आला आहे. मात्र, जिल्हा परिषद निवडणूक आणखी पुढे ढकलली जाऊ शकते, असा अंदाज उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी व्यक्त केला आहे.


धाराशिव येथे बोलताना अजित पवार यांनी, जिल्हा परिषद निवडणुका स्थगित होण्याची शक्यता असल्याची माहिती वकिलांकडून मिळाल्याचे सांगितले. हे प्रकरण सध्या सर्वोच्च न्यायालयात प्रलंबित आहे आणि मंगळवारी होणाऱ्या सुनावणीत महत्त्वाचा निर्णय अपेक्षित आहे. त्यामुळे निवडणुका लांबणीवर जाण्याची चिन्हे स्पष्ट झाल्याचे त्यांनी सूचित केले. ओबीसी आरक्षणावरील पेचामुळे जिल्हा परिषद निवडणुकीची प्रक्रिया अडकली आहे आणि अंतिम निर्णयानंतरच पुढील दिशा निश्चित होणार आहे.


सर्वोच्च न्यायालयाच्या सुनावणीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. राज्यातील आरक्षण मर्यादा ओलांडल्याच्या आरोपांवर विविध याचिका दाखल झाल्या असून न्यायालयाने यावरील सीमा स्पष्ट ठेवण्याचा पूर्वीच निर्देश दिला होता. न्यायालयाने राज्य निवडणूक आयोगाला जानेवारी २०२६ पर्यंत स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका पूर्ण करण्याचे आदेश दिल्यानंतर प्रक्रिया सुरू झाली. मात्र, ५० टक्के आरक्षण मर्यादा ओलांडल्याचे मुद्दे समोर आल्यानंतर निवडणूक वेळापत्रक पुन्हा अनिश्चित झालं आहे.


आता सर्वोच्च न्यायालयाचा निकाल निर्णायक ठरणार असून जिल्हा परिषद निवडणुका होणार की पुढे ढकलल्या जाणार यावर चित्र स्पष्ट होईल. तोपर्यंत इच्छुकांच्या उत्साहावर विर्जन पडल्याचे स्पष्टपणे जाणवत आहे.

Comments
Add Comment

न्यूझीलंडने दिलेल्या आव्हानाचा पाठलाग करताना श्रीलंकेची निराशाजनक सुरुवात

कोलंबो : आर. प्रेमदासा स्टेडियम येथे आयसीसी पुरुष टी ट्वेंटी वर्ल्डकपमधील सुपर ८ फेरीतला श्रीलंका विरुद्ध

मुंबई-गोवा महामार्गावर भीषण अपघात; तिघे जखमी, दोन्ही वाहनांचे मोठे नुकसान

रायगड : माणगाव पोलीस ठाणे हद्दीत मुंबई-गोवा महामार्गावर झालेल्या भीषण अपघातात तिघे जखमी झाले असून दोन्ही

ई-गव्हर्नन्स मूल्यमापनात वसई–विरार पालिकेचा ‘नववा क्रमांक’ कायम

पालघर :  राज्यातील महानगरपालिकांच्या ई-गव्हर्नन्स कामकाजाच्या मूल्यमापनात वसई–विरार महानगरपालिकाने यंदाही

अनिल अंबानींचे मुंबईतील करोडो रुपयांचे निवासस्थान ईडीकडून जप्त

मुंबई : रिलायन्स अनिल धीरूभाई अंबानी ग्रुपचे (रिलायन्स एडीए ग्रुप) चेअरमन अनिल अंबानी यांचे "अ‍ॅबोड" निवासस्थान

...तरच भारत सेमी फायनल खेळू शकेल

मुंबई : आयसीसी पुरुष टी ट्वेंटी वर्ल्डकपमध्ये सुपर ८ फेरीचे सामने सुरू आहेत. ग्रुप एक मध्ये वेस्ट इंडिज (धावगती

सिंधुदुर्ग किनारपट्टी सुरक्षेसाठी सीसीटीव्ही प्रकल्पाची तातडीने अंमलबजावणी करा - मत्स्य व्यवसाय मंत्री नितेश राणे यांचे निर्देश

मुंबई : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील विजयदुर्ग, आचरा, निवती, वेंगुर्ला, मालवण आणि देवगड पोलीस ठाण्यांच्या हद्दीतील