पुण्यातील सायकल स्पर्धेनिमित्त सिंहगड किल्ल्यावर जाणारी वाहतूक पुढील ३ दिवस बंद, पर्यटकांना पायी मार्ग वापरण्याचा पर्याय

पुणे: पुण्यातील सिंहगड किल्ला नेहमीच पर्यटकांचे आकर्षण केंद्र राहिला आहे. मात्र आजपासून पुढील ३ दिवस सिंहगड किल्ला बंद राहणार आहे. कारण, जानेवारी २०२६ मध्ये पुण्यात 'पुणे ग्रँड चॅलेंज टूर २०२६' ही सायकल स्पर्धा आयोजित करण्यात येणार आहे. या स्पर्धेच्या पार्श्वभूमीवर रस्ते सुधारण्याचे काम महापालिकेने हाती घेतल्यामुळे सिंहगड मार्ग बंद ठेवण्यात आला आहे. तसेच सिंहगड घाटमार्गावरील वाहतुकीत देखील बदल करण्यात आले आहेत. त्यामुळे या मार्गाने प्रवास करणाऱ्यांना पर्यायी मार्गाचा वापर करावा लागणार आहे.


'पुणे ग्रँड चॅलेंज टूर २०२६' या सायकल स्पर्धेमध्ये अनेक देशांचा सहभाग असणार आहे. त्यामुळे स्पर्धा ज्या मार्गाने सुरू होणार आणि संपणार त्या मार्गावर रस्ते डांबरीकरण, चेंबर दुरुस्ती, पादचारी मार्ग दुरुस्ती यासह अन्य सुधारणांसाठी महापालिकेच्या वतीने १४५ कोटी ७५ लाख ८० हजार रुपयांचा खर्च केला जाणार आहे. या दुरूस्ती कामासाठी सिंहगड किल्ल्यावरील वाहतूक २४ नोव्हेंबर ते २६ नोव्हेंबर या काळात बंद राहणार आहे.


सार्वजनिक बांधकाम विभागाने दिलेल्या माहितीनुसार, डोणजे गोळेवाडी टोलनाका ते सिंहगड घाटातील कोंढणपूर टोलनाका आणि अवसरेवाडीच्या दिशेने जाणारा रस्ता बंद राहणार आहे. या कालावधीत रस्त्यावर डांबरीकरणाचे काम होणार असल्याने, वाहनधारकांना पर्यायी मार्ग वापरण्याचा सल्ला देण्यात आला आहे. यामध्ये सिंहगड किल्ल्यावर पर्यटनासाठी येणारी वाहतूक पूर्णपणे बंद ठेवण्यात येणार असून पर्यटकांना आतकरवाडीतून पायी मार्गाने किल्ल्यावर जाता येणार आहे.



पानशेत, खानापूर, डोणजे आणि आतकरवाडी मार्गे सिंहगड घाटमार्गाने खेड-शिवापूरकडे जाणारी वाहतूक आता डोणजे चौकापासून खडकवासला, किरकटवाडी, नांदेडसिटी आणि वडगाव धायरी मार्गे पुणे-बंगळुरू महामार्गावर वळवण्यात येईल. जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितले की, गोळेवाडी चौक ते सिंहगड पाट (कोंढणपूर बाजूकडून) या मार्गावर वाहनांना जाण्याची परवानगी दिली जाणार नाही.

Comments
Add Comment

महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळाकडून ४२ मौलिक ग्रंथांचे प्रकाशन

मुंबई : मराठी भाषा गौरव दिनानिमित्त महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळातर्फे यंदा ४२ मौलिक ग्रंथांचे

मालेगाव महापालिकेत नमाजपठण कशाला? हे तर ‘जिहाद’चेच रूप - नितेश राणे

- राज्यातील सर्व मदरसे बंद करण्याची मुख्यमंत्र्यांकडे मागणी करणार - नितेश राणे मुंबई : निवडणुकीच्या पूर्वी ‘जय

'हवाई वाहतूक ही अत्यंत महत्त्वाची आणि गांभीर्यची बाब'; खासदार सुप्रियाताई सुळेंचे वक्तव्य

नवी दिल्ली: मी विमान वाहतूक मंत्रालय यांचे आभार मानते. रोहित पवार यांनी हा विषय मुद्देसूद मांडला. आमच्या घरातील

'रोहयो' मजुरांना केंद्राकडून निधी मिळत नसेल तर राज्य सरकारने द्यावा; काँग्रेस विधिमंडळ नेते विजय वडेट्टीवार यांची विधानसभेत मागणी

मुंबई: राज्यातील ग्रामीण अर्थव्यवस्थेचा कणा असलेल्या महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेचे

एसटी कर्मचाऱ्यांचा वेतन वाढीचा थकीत हप्ता त्यांच्या बँक खात्यात जमा; परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी दिलेला शब्द पाळला

मुंबई: राज्याच्या कानाकोपऱ्यात धावणाऱ्या ‘लालपरी’ला आपल्या घामाने आणि कष्टाने जिवंत ठेवणाऱ्या सुमारे ८६ हजार

Rajya Sabha Election 2026: राज्यसभा निवडणुकीचा अर्ज भरायला फक्त सहा दिवस उरले, शरद पवार राज्यसभा लढवणार की नाही?

मुंबई: येत्या १६ मार्चला राज्यसभेच्या रिक्त होणाऱ्या ३७ जागांसाठी निवडणूक होणार आहे. यामध्ये महाराष्ट्रातील