पुण्यातील सायकल स्पर्धेनिमित्त सिंहगड किल्ल्यावर जाणारी वाहतूक पुढील ३ दिवस बंद, पर्यटकांना पायी मार्ग वापरण्याचा पर्याय

पुणे: पुण्यातील सिंहगड किल्ला नेहमीच पर्यटकांचे आकर्षण केंद्र राहिला आहे. मात्र आजपासून पुढील ३ दिवस सिंहगड किल्ला बंद राहणार आहे. कारण, जानेवारी २०२६ मध्ये पुण्यात 'पुणे ग्रँड चॅलेंज टूर २०२६' ही सायकल स्पर्धा आयोजित करण्यात येणार आहे. या स्पर्धेच्या पार्श्वभूमीवर रस्ते सुधारण्याचे काम महापालिकेने हाती घेतल्यामुळे सिंहगड मार्ग बंद ठेवण्यात आला आहे. तसेच सिंहगड घाटमार्गावरील वाहतुकीत देखील बदल करण्यात आले आहेत. त्यामुळे या मार्गाने प्रवास करणाऱ्यांना पर्यायी मार्गाचा वापर करावा लागणार आहे.


'पुणे ग्रँड चॅलेंज टूर २०२६' या सायकल स्पर्धेमध्ये अनेक देशांचा सहभाग असणार आहे. त्यामुळे स्पर्धा ज्या मार्गाने सुरू होणार आणि संपणार त्या मार्गावर रस्ते डांबरीकरण, चेंबर दुरुस्ती, पादचारी मार्ग दुरुस्ती यासह अन्य सुधारणांसाठी महापालिकेच्या वतीने १४५ कोटी ७५ लाख ८० हजार रुपयांचा खर्च केला जाणार आहे. या दुरूस्ती कामासाठी सिंहगड किल्ल्यावरील वाहतूक २४ नोव्हेंबर ते २६ नोव्हेंबर या काळात बंद राहणार आहे.


सार्वजनिक बांधकाम विभागाने दिलेल्या माहितीनुसार, डोणजे गोळेवाडी टोलनाका ते सिंहगड घाटातील कोंढणपूर टोलनाका आणि अवसरेवाडीच्या दिशेने जाणारा रस्ता बंद राहणार आहे. या कालावधीत रस्त्यावर डांबरीकरणाचे काम होणार असल्याने, वाहनधारकांना पर्यायी मार्ग वापरण्याचा सल्ला देण्यात आला आहे. यामध्ये सिंहगड किल्ल्यावर पर्यटनासाठी येणारी वाहतूक पूर्णपणे बंद ठेवण्यात येणार असून पर्यटकांना आतकरवाडीतून पायी मार्गाने किल्ल्यावर जाता येणार आहे.



पानशेत, खानापूर, डोणजे आणि आतकरवाडी मार्गे सिंहगड घाटमार्गाने खेड-शिवापूरकडे जाणारी वाहतूक आता डोणजे चौकापासून खडकवासला, किरकटवाडी, नांदेडसिटी आणि वडगाव धायरी मार्गे पुणे-बंगळुरू महामार्गावर वळवण्यात येईल. जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितले की, गोळेवाडी चौक ते सिंहगड पाट (कोंढणपूर बाजूकडून) या मार्गावर वाहनांना जाण्याची परवानगी दिली जाणार नाही.

Comments
Add Comment

नागपूर येथील भारतीय व्यवस्थापन संस्थेला इन्क्यूबेशन सेंटर म्हणून मान्यता

मुंबई: विदर्भातील नवउद्योग (स्टार्टअप) परिसंस्था अधिक सक्षम करण्याच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण पाऊल उचलत,

नमो शेतकरी महासन्मान निधीचा ८ वा हप्ता पुढील आठवड्यात शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार; कृषीमंत्र्यांनी दिली माहिती

मुंबई: राज्यातील लाखो शेतकऱ्यांना आर्थिक दिलासा देणारा महत्त्वपूर्ण निर्णय राज्य शासनाने घेतला असून, नमो

‘महाराष्ट्र धर्मस्वातंत्र्य विधेयक’ विधानपरिषदेत मंजूर

मुंबई: महाराष्ट्रात गेल्या काही काळापासून चर्चेत असलेले आणि अत्यंत कडक तरतुदी असलेले ‘महाराष्ट्र

सिंधुदुर्गच्या विकासाला बुस्टर; राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत १०० टक्के 'व्हिजीएफ'ला मंजुरी

मुंबई: सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या पर्यटनाला आणि अर्थव्यवस्थेला मोठी गती देणारा निर्णय मंगळवारी राज्य

नंदूरबार,छत्रपती संभाजीनगरमधील गैरव्यवहारासाठी 'एसआयटी स्थापन; महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांची विधान परिषदेत घोषणा

​मुंबई: नंदूरबार जिल्ह्यातील नवापूर येथील भूसंपादन गैरव्यवहार आणि छत्रपती संभाजीनगरमधील ब्रिजवाडी येथील ५४

रब्बी हंगामातील 'ई-पीक पाहणी'ला ३१ मार्चपर्यंत मुदतवाढ

- ४५ टक्के शेतकरी अजूनही प्रक्रियेबाहेर; महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांची घोषणा मुंबई : राज्यातील रब्बी