भाजपवर दबाव टाकण्यासाठी शिवसेनेची राजस्थानमध्ये नवी खेळी

जयपूर : महाराष्ट्रात २४६ नगरपालिका आणि ४२ नगरपंचायतींच्या निवडणुकीसाठी आचारसंहिता लागू झाली. यानंतर राज्यात भाजपने अनेक ठिकाणी स्वतःची ताकद वाढवण्यासाठी आक्रमक हालचाली सुरू केल्या. भाजपच्या हालचाली बघून उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे अस्वस्थ झाले. त्यांनी मुख्यमंत्री फडणवीस यांच्याशी चर्चा केली तसच दिल्ली गाठून केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यासमोर स्वतःची बाजू मांडली. एवढी धडपड करुनही हाती जास्त काही लागत नसल्याचे बघून शिवसेनेने दबावासाठी नवी खेळी केली आहे.

शिवसेनेच्या राजस्थानमधील नेत्यांनी तिथल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी जास्त जागांची मागणी केली आहे. आमची मागणी पूर्ण होणार नसल्यास राजस्थानमधील स्थानिकच्या सर्व जागांवर उमेदवार उभे करण्याचा विचार करू; असा इशारा शिवसेनेने दिला आहे.

मागच्या वर्षी राजस्थानमध्ये तीन आमदारांनी शिवसेनेत प्रवेश केला. यानंतर शिवसेना राजस्थानमध्ये मर्यादीत प्रमाणात सक्रीय झाली आहे. या पार्श्वभूमीवर राजस्थानमधील स्थानिकच्या सर्व जागा लढवण्याचा इशारा शिवसेनेने दिला आहे. शिवसेनेच्या या इशाऱ्यावर भाजपने अद्याप प्रतिक्रिया दिलेली नाही.
Comments
Add Comment

गुढीपाडवा का साजरा केला जातो? जाणून घ्या गुढीपाडव्याचे महत्त्व, पूजा विधी आणि परंपरा

मुंबई : महाराष्ट्रात गुढीपाडवा हा सण हिंदू नववर्षाची सुरुवात म्हणून मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. साडेतीन

पत्रकार आणि वृत्तपत्र विक्रेते महामंडळे पुढील अधिवेशनाच्या आत स्थापन करणार

-- मंत्री आशिष शेलार यांची ग्वाही; पत्रकारांच्या समस्यांवर व्यापक बैठक घेणार मुंबई : पत्रकार आणि वृत्तपत्र

हा फक्त राष्ट्रपतींचा नव्हे, तर संविधानाचा अपमान, पंतप्रधान मोदींचा ममता सरकारवर घणाघात

नवी दिल्ली : राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या कार्यक्रमात प्रोटोकॉलचे उल्लंघन झाल्याच्या मुद्द्यावरून

देशात पेट्रोल-डिझेलची कमतरता नाही, भारताकडे ४ हजार कोटी लिटर तेल; आठ आठवडे इतका पुरेसा साठा

नवी दिल्ली : अमेरिका-इस्रायल आणि इराण युद्धादरम्यान भारताला कच्च्या तेलाची कमतरता भासणार नाही. भारताकडे सध्या

भारताला पराभूत करत ऑस्ट्रेलियाचा एलिसा हेलीला विजयी निरोप

पर्थ : ऑस्ट्रेलियातील ऐतिहासिक पिंक बॉल कसोटी सामन्यात ऑस्ट्रेलियन महिला संघाने तिसऱ्या दिवशीच भारतीय महिला

कधी आहे पापमोचनी एकादशी ? काय आहे या दिवसाचे महत्त्व ? कशी करावी या दिवशी पूजा ?

मुंबई : हिंदू पंचांगाप्रमाणे प्रत्येक महिन्याच्या शुक्ल आणि कृष्ण पक्षातील अकरावी तिथी म्हणजे एकादशी. हा दिवस