देशात पेट्रोल-डिझेलची कमतरता नाही, भारताकडे ४ हजार कोटी लिटर तेल; आठ आठवडे इतका पुरेसा साठा

नवी दिल्ली : अमेरिका-इस्रायल आणि इराण युद्धादरम्यान भारताला कच्च्या तेलाची कमतरता भासणार नाही. भारताकडे सध्या कच्च्या तेलाचा आणि रिफाइंड पेट्रोलियम उत्पादनांचा २५ कोटी बॅरल (सुमारे ४ हजार कोटी लिटर) पेक्षा जास्त साठा आहे.सरकारच्या अहवालानुसार, हा बॅकअप इतका आहे की, जर पुरवठा पूर्णपणे थांबला तरी, देशाची संपूर्ण पुरवठा साखळी ७ ते ८ आठवडे सहज चालू शकते. म्हणजेच, येत्या काळात पेट्रोल-डिझेल आणि इतर पेट्रोलियम उत्पादनांच्या कमतरतेची कोणतीही चिंता नाही.


भारताकडे केवळ २५ दिवसांचा साठा शिल्लक आहे,असा माध्यमातून केलेला दावा केंद्र सरकारने फेटाळून लावला आहे. भारताची ऊर्जा सुरक्षा आता कोणत्याही एका मार्गावर किंवा देशावर अवलंबून नाही. भारताची ऊर्जा खरेदी पूर्णपणे 'राष्ट्रहिता'वर आधारित आहे. गेल्या १० वर्षांत भारताने आपल्या तेल खरेदीचा आवाका लक्षणीयरीत्या वाढवला आहे. एक दशकापूर्वी भारत केवळ २७ देशांकडून तेल खरेदी करत होता, जी संख्या आता ४० झाली आहे. जागतिक स्तरावरील तणावामुळेही भारताने आपल्या गरजांसाठी नवीन मार्ग शोधले आहेत.


जगातील सर्वात संवेदनशील सागरी मार्गांपैकी एक असलेल्या 'स्ट्रेट ऑफ होर्मुज'बद्दल अनेकदा चिंता व्यक्त केली जाते, परंतु भारताने आपली रणनीती बदलली आहे. आता भारताचे केवळ ४० टक्के कच्चे तेल या मार्गाने येते.उर्वरित ६० टक्के तेल रशिया, पश्चिम आफ्रिका, अमेरिका आणि मध्य आशियासारख्या पर्यायी मार्गांनी येते. अहवालानुसार,भारताची ऊर्जा सुरक्षा एकाच सागरी मार्गावर अवलंबून होती, ते दिवस आता राहिले नाहीत.


सरकार परिस्थितीचा सामना करण्यास सक्षम: मुख्यमंत्र्यांची स्पष्टोक्ती : इराण विरुद्ध इस्त्रायल-अमेरिका युद्धामुळे राज्यात इंधन तुटवडा निर्माण झाल्याचा दावा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी फेटाळून लावला. राज्यात कुठेही इंधनाचा तुटवडा नाही. त्यामुळे पेट्रोल पंपांवर विनाकारण मोठ्या रांगा लागल्या आहेत, असे ते म्हणाले. प्रत्यक्षात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात सरकार भविष्यातील स्थितीचा सामना करण्यास सक्षम आहे, असे ते म्हणाले. मुख्यमंत्री म्हणाले, लोकांना चुकीची माहिती देऊन पॅनिक तयार करण्याची गरज नाही. केंद्र सरकारने यासंदर्भातील आपली भूमिका अत्यंत स्पष्टपणे मांडली आहे. भारताच्या ऊर्जा सुरक्षेसंबंधी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कशाप्रकारे पाऊले उचलली हे आपल्यासमोर आले आहे. सध्या राज्यात कुठेही इंधन टंचाई नाही. काही माध्यमांनी दोन-तीन दिवस झाले पेट्रोल - डिझेलचा तुटवडा निर्माण होणार असल्याच्या बातम्या दिल्या. यामुळे पेट्रोल पंपांवर विनाकारण मोठमोठ्या रांगा लागल्या. असा कोणताही तुटवडा नाही. केंद्र सरकारनेही हे स्पष्ट केले आहे. भविष्यात जी परिस्थिती उद्भवेल, त्याचा सामना करण्यासाठी भारत सरकार मोदींच्या नेतृत्वा सक्षमपणे भक्कम परिस्थितीत आहे.

Comments
Add Comment

लक्ष द्या ! लग्नपत्रिकेवर वधू-वराची जन्मतारीख टाकणे अनिवार्य होणार ? नेमकी शिफारस काय ?

लग्न म्हणजे दोन व्यक्तींचे , दोन कुटुंबाचे मिलन. पण वयोमर्यादा अपूर्ण असली तरी अनेक लग्न होतात, अर्थात बालविवाह

Health Department : आरोग्य विभागाच्या बदलीत राजकीय दबाव आणल्यास शिस्तभंगाची कारवाई

मुंबई : सार्वजनिक आरोग्य विभागातील मनुष्यबळ व्यवस्थापनात सुसूत्रता आणि पारदर्शकता आणण्यासाठी राज्य सरकारने

Nashik : मोठी बातमी ! डॉ. वसंतराव पवार मेडिकल कॉलेजमध्ये लिफ्ट कोसळल्याने महिला कर्मचारी गंभीर जखमी

नाशिक : नाशिकमध्ये पुन्हा एकदा गंभीर लिफ़्ट दुर्घटना समोर आली आहे. नाशिकच्या आडगाव परिसरातील डॉ. वसंतराव पवार

Ladki Bahin Yojana: लाडक्या बहि‍णींना ₹१५०० येणार की ₹३००० येणार? अपडेट काय ?

Ladki Bahin Yojana: राज्य सरकारची महत्वाकांक्षी योजना म्हणून ओळखली जाणारी मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना अनेक गरजू

XChat : लाँच झाले एक्सचे एक्सचॅट ॲप

टेक्सास : एक्स या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मने मेसेजिंग ॲप एक्सचॅट लॉन्च केले आहे. सध्या हे ॲप फक्त आयओएस

IPL 2026 : सनरायझर्स हैदराबादचा विजयी चौकार, गुणतालिकेत तिसऱ्या स्थानी झेप

जयपूर : इशान मलिंगाच्या नेतृत्वाखालील भेदक गोलंदाजी आणि अभिषेक शर्मा व इशान किशन यांच्यातील शतकी भागीदारीच्या