‘युनेस्को’च्या वर्ल्ड बुक कॅपिटल या दर्जासाठी पुण्याची दावेदारी

पुणे : ‘युनेस्को’च्या ‘जागतिक पुस्तक राजधानी’ (वर्ल्ड बुक कॅपिटल) या दर्जासाठी राष्ट्रीय पुस्तक न्यासाच्या माध्यमातून पुण्याचा अर्ज पाठवण्यात आला आहे. २०२७ साठीचा सन्मान पुण्याला मिळण्याची आशा आहे,’ अशी माहिती जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी दिली.


राष्ट्रीय पुस्तक न्यासातर्फे (एनबीटी) आयोजित पुणे पुस्तक महोत्सव यंदा १३ ते २१ डिसेंबर या कालावधीत फर्ग्युसन महाविद्यालयाच्या मैदानावर होणार आहे. उच्च व तंत्रशिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील, जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांच्या उपस्थितीत वासापूजन करून महोत्सवाच्या मांडव उभारणीला सुरुवात करण्यात आली. ‘एनबीटी’चे अध्यक्ष मिलिंद मराठे, पुणे पुस्तक महोत्सवाचे संयोजक राजेश पांडे, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. सुरेश गोसावी, प्र-कुलगुरू डॉ. पराग काळकर, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प्रांत कार्यवाह प्रवीण दबडघाव, डेक्कन एज्युकेशन सोसायटीच्या नियामक मंडळाचे अध्यक्ष प्रमोद रावत, कार्यवाह आनंद काटीकर, लेखक-दिग्दर्शक प्रवीण तरडे, बागेश्री मंठाळकर, या वेळी उपस्थित होते.


पाटील म्हणाले, ‘पुणे पुस्तक महोत्सवाचे आता तिसरे वर्ष आहे. गेल्या दोन वर्षांत पुणेकर या महोत्सवाशी जोडले गेले आहेत. ‘युनेस्को’च्या २०२७च्या जागतिक पुस्तक राजधानी सन्मानासाठी पुण्याचा अर्ज दाखल करण्यात आला आहे. जगातील अन्य देशांचेही अर्ज असतात. त्यामुळे कोणत्या स्थळाला पुस्तक राजधानीचा मान मिळणार, त्याची घोषणा फेब्रुवारीत होण्याची शक्यता आहे. या घोषणेच्या अानुषंगाने यंदाच्या पुणे पुस्तक महोत्सवाची युनेस्कोच्या समितीकडून पाहणी होणार आहे. यंदाचा पुणे पुस्तक महोत्सव आणखी व्यापक होणार आहे.’


डुडी म्हणाले, ‘काही वर्षांपूर्वी जयपूरला छोट्या स्तरावर सुरू झालेला साहित्य महोत्सव मोठा होत गेला. त्यातून तेथील पर्यटन, संस्कृतीसह अर्थव्यवस्थेला चालना मिळाली. त्यामुळे पुणे पुस्तक महोत्सवाला जागतिक पातळीवर नेण्यासाठी ‘युनेस्को’च्या जागतिक पुस्तक राजधानी या सन्मानासाठी राष्ट्रीय पुस्तक न्यासाच्या माध्यमातून पुण्याचा अर्ज पाठवण्यात आला आहे. ४५० किलोमीटरची ही स्पर्धा चार दिवसांत होणार आहे. या स्पर्धेला ऑलिम्पिक पात्रता स्पर्धा म्हणून मान्यता मिळाली आहे. या स्पर्धेमुळे पुणे शहराला ‘ग्लोबल सिटी’ म्हणून ओळख मिळणार आहे.


Comments
Add Comment

मच्छीमारांना सक्षम आणि स्वावलंबी बनविण्यासाठी शासन प्रयत्नशील; मस्यव्यवसाय व बंदरे मंत्री नितेश राणेंनी दिली माहिती

मुंबई: राज्यातील मच्छीमारांना आर्थिकदृष्ट्या सक्षम आणि स्वावलंबी बनविण्यासाठी मुख्यमंत्री मत्स्य संपदा

विधान परिषदेत विरोधकांचे संख्याबळ घटणार; ९ आमदार निवृत्त होणार; संख्याबळानुसार महाविकास आघाडीच्या पदरात केवळ दोनच जागा

मुंबई: विधानसभा निवडणुकीत सपाटून मार खाल्ल्यानंतर, आता विधान परिषदेतही विरोधकांचे संख्याबळ कमालीचे घटणार आहे.

मगरपट्ट्याच्या मागील बाजूस कॅनल फुटल्याने रस्त्यावर पाणीच पाणी

पुणे : मगरपट्टा सोसायटीच्या मागील बाजूस असलेल्या कालव्याला भगदाड पडल्याने मोठ्या प्रमाणात पाणी बाहेर पडत असून

पुणे - मुंढव्यातील पासपोर्ट कार्यालय पाषाणला स्थलांतरित होणार

पुणे : परराष्ट्र मंत्रालयाच्या अखत्यारीत असलेले मुंढवा येथील पासपोर्ट सेवा केंद्र (पीएसके) आता कायमस्वरूपी

सोलापूर महापालिका व जिल्हा परिषदेवर भाजपचा दबदबा - विरोधी पक्षनेत्याशिवायच कारभार सुरू

सोलापूर : सोलापूर महापालिकेत १०२ पैकी ८७ जागा भाजपने जिंकल्या असून, आठ जागा मिळविलेला एमआयएम दुसऱ्या क्रमांकावर

Ashok Kharat Case: दोन महिने आधी प्रकरण बाहेर, मात्र खरातला वाचण्यासाठी कुणी ताकद लावली?

नाशिक: लैंगिक शोषण प्रकरणात नाशिक पोलिसांनी अटक केल्यानंतर आता खरातचे विकृत कारनामे समोर येऊ लागले आहेत. अशोक