‘युनेस्को’च्या वर्ल्ड बुक कॅपिटल या दर्जासाठी पुण्याची दावेदारी

पुणे : ‘युनेस्को’च्या ‘जागतिक पुस्तक राजधानी’ (वर्ल्ड बुक कॅपिटल) या दर्जासाठी राष्ट्रीय पुस्तक न्यासाच्या माध्यमातून पुण्याचा अर्ज पाठवण्यात आला आहे. २०२७ साठीचा सन्मान पुण्याला मिळण्याची आशा आहे,’ अशी माहिती जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी दिली.


राष्ट्रीय पुस्तक न्यासातर्फे (एनबीटी) आयोजित पुणे पुस्तक महोत्सव यंदा १३ ते २१ डिसेंबर या कालावधीत फर्ग्युसन महाविद्यालयाच्या मैदानावर होणार आहे. उच्च व तंत्रशिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील, जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांच्या उपस्थितीत वासापूजन करून महोत्सवाच्या मांडव उभारणीला सुरुवात करण्यात आली. ‘एनबीटी’चे अध्यक्ष मिलिंद मराठे, पुणे पुस्तक महोत्सवाचे संयोजक राजेश पांडे, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. सुरेश गोसावी, प्र-कुलगुरू डॉ. पराग काळकर, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प्रांत कार्यवाह प्रवीण दबडघाव, डेक्कन एज्युकेशन सोसायटीच्या नियामक मंडळाचे अध्यक्ष प्रमोद रावत, कार्यवाह आनंद काटीकर, लेखक-दिग्दर्शक प्रवीण तरडे, बागेश्री मंठाळकर, या वेळी उपस्थित होते.


पाटील म्हणाले, ‘पुणे पुस्तक महोत्सवाचे आता तिसरे वर्ष आहे. गेल्या दोन वर्षांत पुणेकर या महोत्सवाशी जोडले गेले आहेत. ‘युनेस्को’च्या २०२७च्या जागतिक पुस्तक राजधानी सन्मानासाठी पुण्याचा अर्ज दाखल करण्यात आला आहे. जगातील अन्य देशांचेही अर्ज असतात. त्यामुळे कोणत्या स्थळाला पुस्तक राजधानीचा मान मिळणार, त्याची घोषणा फेब्रुवारीत होण्याची शक्यता आहे. या घोषणेच्या अानुषंगाने यंदाच्या पुणे पुस्तक महोत्सवाची युनेस्कोच्या समितीकडून पाहणी होणार आहे. यंदाचा पुणे पुस्तक महोत्सव आणखी व्यापक होणार आहे.’


डुडी म्हणाले, ‘काही वर्षांपूर्वी जयपूरला छोट्या स्तरावर सुरू झालेला साहित्य महोत्सव मोठा होत गेला. त्यातून तेथील पर्यटन, संस्कृतीसह अर्थव्यवस्थेला चालना मिळाली. त्यामुळे पुणे पुस्तक महोत्सवाला जागतिक पातळीवर नेण्यासाठी ‘युनेस्को’च्या जागतिक पुस्तक राजधानी या सन्मानासाठी राष्ट्रीय पुस्तक न्यासाच्या माध्यमातून पुण्याचा अर्ज पाठवण्यात आला आहे. ४५० किलोमीटरची ही स्पर्धा चार दिवसांत होणार आहे. या स्पर्धेला ऑलिम्पिक पात्रता स्पर्धा म्हणून मान्यता मिळाली आहे. या स्पर्धेमुळे पुणे शहराला ‘ग्लोबल सिटी’ म्हणून ओळख मिळणार आहे.


Comments
Add Comment

राज्यात रस्ता अपघाती मृत्यूंमध्ये ८ टक्क्यांची घट; परिवहन विभागाकडून आकडेवारी जाहीर

- २०३० पर्यंत अपघात निम्म्यावर आणण्याचे परिवहन विभागाचे उद्दिष्ट मुंबई : राज्यात रस्ता सुरक्षेसाठी परिवहन

भिगवण प्रकरणात मोठा ट्विस्ट; पाच दिवसात तरुणीने बदलला निर्णय

पुणे : महाष्ट्राभर चर्चा असलेल्या भिगवण प्रकरणात अनेक दावे , प्रतिदावे समोर येत होते, पण आता स्वतः मुलीनेच

महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळाकडून ४२ मौलिक ग्रंथांचे प्रकाशन

मुंबई : मराठी भाषा गौरव दिनानिमित्त महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळातर्फे यंदा ४२ मौलिक ग्रंथांचे

मालेगाव महापालिकेत नमाजपठण कशाला? हे तर ‘जिहाद’चेच रूप - नितेश राणे

- राज्यातील सर्व मदरसे बंद करण्याची मुख्यमंत्र्यांकडे मागणी करणार - नितेश राणे मुंबई : निवडणुकीच्या पूर्वी ‘जय

'हवाई वाहतूक ही अत्यंत महत्त्वाची आणि गांभीर्यची बाब'; खासदार सुप्रियाताई सुळेंचे वक्तव्य

नवी दिल्ली: मी विमान वाहतूक मंत्रालय यांचे आभार मानते. रोहित पवार यांनी हा विषय मुद्देसूद मांडला. आमच्या घरातील

'रोहयो' मजुरांना केंद्राकडून निधी मिळत नसेल तर राज्य सरकारने द्यावा; काँग्रेस विधिमंडळ नेते विजय वडेट्टीवार यांची विधानसभेत मागणी

मुंबई: राज्यातील ग्रामीण अर्थव्यवस्थेचा कणा असलेल्या महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेचे