महापालिका निवडणूक प्रभाग आरक्षणावर आल्या फक्त १२९ हरकती सूचना

मुंबई (खास प्रतिनिधी) : मुंबई महापालिकेची सार्वत्रिक निवडणुकी करता प्रभाग आरक्षण सोडत जाहीर करण्यात आली होती. यासाठी १४ ते २० नोव्हेंबर या कालावधीत हरकती - सूचना मागविल्या होत्या. त्यानुसार, २० नोव्हेंबर रोजी शेवटच्या दिवसापर्यंत सर्व प्रशासकीय विभागातून १२९ हरकती - सूचना दाखल करण्यात आल्याची माहिती मिळत आहे.


मुंबई महापालिकेच्या सार्वत्रिक निवडणूक २०२५ करता मागील ११ नोव्हेंबर रोजी २२७ पैकी एसटी, एससी, ओबीसी, महिला वर्ग तसेच खुला प्रवर्ग याकरता आरक्षण सोडत काढण्यात आली. मुंबई महापालिकेच्या २२७ जागांपैकी आरक्षित जागांसाठी ११ नोव्हेंबर रोजी वांद्रे येथील बालगंधर्व रंगमंदिरात सोडत काढण्यात आली होती. त्यामध्ये, २२७ जागांमधून एसटी - २ , एससी - १५ , ओबीसी - ६१ , महिलांसाठी ११४ जागांसाठी काढण्यात आलेली सोडत जाहीर करण्यात आली होती.



त्यामुळे विविध राजकीय पक्षांच्या दिग्गजांना धक्का बसला. अनेकांचे प्रभाग महिला आरक्षित तसेच ओबीसी झाल्याने अनेकांना घरी बसणे नाहीतर आसपासच्या प्रभागाचा शोध घेण्याची वेळ आली. या आरक्षण सोडतीबाबत निवडणूक विभागाने १४ ते २० नोव्हेंबर या कालावधीत हरकती - सूचना मागविल्या होत्या. त्यानुसार, २० नोव्हेंबर रोजी शेवटच्या दिवसापर्यंत विविध विभागातून १२९ हरकती - सूचना दाखल झाल्या झाल्याची माहिती मिळत आहे.

यावर महापालिका आयुक्त भूषण गगराणी हे २१ ते २७ नोव्हेंबर या कालावधीत सदर हरकती आणि सूचना यांवर योग्य तो निर्णय घेतील. त्यानंतर २८ नोव्हेंबर रोजी अंतिम आरक्षण विहित नमुन्यात शासन राजपत्रात प्रसिध्द करण्यात येणार आहे.

Comments
Add Comment

Mumbai: तुमचा वर्षाचा पगार नाही एवढी मोठी लाच, मंत्रालयातील कक्ष अधिकारी जाळ्यात; एसीबीने ठोकल्या बेड्या..

मुंबई: राज्याचं प्रशासन सेवेतलं सर्वोच्च स्थान, केंद्रबिंदु असलेल्या मंत्रालयात काही दिवसांपूर्वी एका

मुंबई–पुणे एक्सप्रेसवे होणार १० पदरी; टोल वसुली....

२०६० पर्यंत टोल वसुली सुरूच  मुंबई : वाढत्या वाहतुकीमुळे कायम कोंडीचा सामना करणाऱ्या मुंबई–पुणे एक्सप्रेसवे वर

रस्ते तसेच रेल्वे कन्व्हर्टची सफाई रिमोट कंट्रोल मशिन्सद्वारे

मुंबई : मुंबई महापालिकेच्यावतीने रस्ते आणि रेल्वे कल्व्हर्ट यांच्या सफाईसाठी रिमोट कंट्रोल स्वींग लोडर मशीनचा

BMC : मुंबईसाठी तब्बल १३,५०० मोठ्या आकाराच्या कचरा पेट्यांची खरेदी

सार्वजनिक कचरा पेट्यांची संख्या कमी करताना या ठेवणार कुठे? मुंबई : मुंबईतील मोठ्या आकाराच्या कचरा कुंड्या हटवून

Navi Mumbai: नवी मुंबईतील भोंदूची विकृती उघड; काळी जादू करण्यासाठी महिलांना विवस्त्र व्हायला सांगत...

नवी मुंबई: राज्यात सध्या भोंदूबाबा अशोक खरात प्रकरण चांगलेच चर्चेत आहे. अशातच आता नवी मुंबईतून अशीच एक धक्कादायक

Ashok Kharat Case : भोंदूबाबा प्रकरणातील स्त्रिया मानसिक धक्क्यात; सोशल मीडियावर व्हिडीओ व्हायरल झाल्यामुळे.....

मुंबई : नाशिकमध्ये उघडकीस आलेल्या भोंदूबाबा अशोक खरात प्रकरणाने आता अधिक गंभीर वळण घेतले आहे, भोंदूबाबा सोबतचे