Mumbai Goa Highway: मुंबई-गोवा महामार्गावरून प्रवास करणाऱ्या आनंदाची बातमी, १ जूनपासून...

मुंबई: मुंबई-गोवा महामार्गावरून प्रवास करणाऱ्या कोकणवासियांसाठी एक अत्यंत आनंदाची आणि दिलासादायक बातमी समोर आली आहे. दरवर्षी पावसाळ्यात किंवा सुट्ट्यांच्या दिवसात ज्या महामार्गावर तासनतास अडकून पडावे लागते, त्या प्रवासातील सर्वात मोठे अडथळे आता दूर होणार आहेत.


गेल्या अनेक वर्षांपासून रखडलेल्या एका महत्त्वाच्या टप्प्याचे काम आता मार्गी लागत असून, यामुळे प्रवाशांचा मोठा वेळ वाचणार आहे. हा बदल नेमका कुठे होणार आहे आणि कधीपासून प्रवाशांना याचा लाभ मिळेल, याची माहिती आता समोर आली आहे.


रायगड जिल्ह्यातील माणगाव आणि इंदापूर या दोन ठिकाणच्या बायपासचे काम आता अंतिम टप्प्यात पोहोचले असून १ जूनपर्यंत हे दोन्ही बायपास वाहतुकीसाठी खुले करण्याचे नियोजन करण्यात आले आहे. खासदार सुनील तटकरे यांनी रायगड जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित केलेल्या आढावा बैठकीत ही महत्त्वाची माहिती दिली. मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावरील ही दोन शहरे वाहतूक कोंडीसाठी ओळखली जातात, मात्र आता या बायपासमुळे प्रवाशांची या त्रासातून कायमस्वरूपी सुटका होणार आहे.


माणगाव आणि इंदापूर या शहरांमधून महामार्ग जात असल्याने तिथे नेहमीच वाहनांच्या लांबच लांब रांगा पाहायला मिळतात. विशेषतः पर्यटन हंगामात ही कोंडी प्रवाशांची सत्त्वपरीक्षा घेणारी ठरते. यावर उपाय म्हणून बायपासचे काम हाती घेण्यात आले होते, मात्र कोकण रेल्वेचा काही भाग या कामात आड येत असल्याने गती मंदावली होती. रेल्वेचे विद्युत पोल आणि इतर तांत्रिक सुविधांमुळे कामात अडथळे निर्माण झाले होते. यासंदर्भात खासदार तटकरे यांनी कोकण रेल्वेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांशी चर्चा केली असून, रेल्वे प्रशासनाने हे पोल आणि सुविधा तातडीने हलविण्याचे आश्वासन दिले आहे.


१ जूनपासून वेगवान प्रवास



या बैठकीनंतर बायपासच्या कामातील सर्व तांत्रिक अडचणी दूर झाल्या असून आता कामाला वेग आला आहे. संबंधित यंत्रणांना कामाची गती वाढवण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. सर्व काही नियोजनानुसार झाल्यास १ जूनपासून माणगाव आणि इंदापूर बायपासवरून वाहने धावू लागतील. हे दोन्ही बायपास सुरू झाल्यानंतर मुंबई-गोवा महामार्गावरील प्रवास केवळ वेगवानच नाही, तर अधिक सुरक्षितही होणार आहे. स्थानिक नागरिकांसह कोकणात जाणाऱ्या हजारो प्रवाशांना या निर्णयामुळे मोठा दिलासा मिळाला आहे.

Comments
Add Comment

DCM Eknath Shinde : उपमुख्यमंत्री शिंदेंनी केली मिसिंग लिंकच्या कामाची पाहणी, महाराष्ट्र दिनी होणार उद्घाटन; मुंबई-पुणे एक्सप्रेसवेवरील घाटाला मिळणार बायपास

मुंबई : मुंबई-पुणे द्रुतगती मार्गाला पूर्णतः ‘ऍक्सेस कंट्रोल’ बनवणाऱ्या महत्त्वाच्या ‘मिसिंग लिंक’ प्रकल्पाचे

HSC RESULT : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाचा बारावीचा निकाल कधी जाहीर होणार ?

मुंबई : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाचा बारावीचा निकाल कधी जाहीर होणार ? हा प्रश्न

MSRTC : 'आपली बस, आपली सेवा'; एसटी महामंडळाची नवी मोहीम

मुंबई : महाराष्ट्राच्या जीवनाशी नाळ जोडलेली लालपरी आता नव्या उमेदीनं, नव्या शिस्तीनं आणि नव्या संवेदनशीलतेनं

New Rule For Hotel : हॉटेलच्या मेन्युकार्डवर ‘पनीर’ किंवा ‘चीज ॲनालॉग’चा वापराचा उल्लेख बंधनकारक

मुंबई : पनीरच्या नावाखाली चीज ॲनालॉगचा वापर होत असल्याबाबतच्या तक्रारीनंतर अन्न व औषध प्रशासन विभागाच्या नवीन

Sanjay Nirupam : निरुपम यांच्या कारची हवा काढणाऱ्यांना जामीन मंजूर

मुंबई : शिवसेनेचे संजय निरुपम दहिसरमध्ये रिक्षा - टॅक्सी चालकांशी संवाद साधण्यासाठी गेले होते. त्यावेळी

Maharashtra Weather : राज्यात उष्णतेचा कहर; ६ जिल्ह्यांना उष्णतेचा, तर १० जिल्ह्यांना पावसाचा अलर्ट

मुंबई : महाराष्ट्राचं हवामान बिघडलय आणि याचा फटका सर्वांनाच बसतो आहे. राज्यावर दुहेरी संकट आल्याचं चित्र