Mumbai: चेंबूरमधील संतापजनक घटना; एका अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार

मुंबई: मुंबईत एक संतापजनक घटना समोर आली आहे. चेंबूरच्या टिळक नगर परिसरात एका अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. याप्रकरणी पोलिसांनी दोन नराधमांना अटक केली आहे. या घटनेमुळे मुंबईतील महिला आणि मुलींच्या सुरक्षितेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.



चेंबुरमध्ये अल्पवयीन मुलीवर अत्याचार



मिळालेल्या माहितीनुसार, पीडित मुलगी आणि दोन्ही आरोपी हे गोवंडी येथील शिवाजी नगर परिसरातील रहिवासी आहेत. कामाच्या बहाण्याने आरोपींनी या अल्पवयीन मुलीला टिळक नगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत बोलावून घेतले होते. तिला निर्जन ठिकाणी असलेल्या झुडपात नेऊन तिच्यावर अत्याचार केल्याचा आरोप पीडितेने केला आहे.


​मुलीच्या जबाबाच्या आधारे पोलिसांनी तातडीने आफताब आणि अनिस नावाच्या दोन संशयितांना अटक केली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, या दोघांविरुद्ध भारतीय न्याय संहिता (BNS) आणि पोक्सो (POCSO) कायद्याच्या विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अटक करण्यात आलेल्या दोन्ही आरोपींना सोमवारी न्यायालयात हजर केले जाणार असून, त्यांना पोलीस कोठडी मिळण्याची शक्यता आहे. या प्रकरणाचा अधिक तपास पोलीस करत आहेत.


दुसरीकडे, बीडच्या परळी तालुक्यातून धक्कादायक प्रकार समोर आला आहे. परळी तालुक्यातील एका गावामध्ये एका सोळा वर्षीय मुलीवर दोघांनी अत्याचार केल्याची घटना काही दिवसांपूर्वी घडली होती. यामध्ये आरोपीने या मुलीला घरी बोलावून दुसऱ्या साथीदाराने तिचे हातपाय बांधत अत्याचार केले होते. या मुलीने याबाबतची माहिती कुटुंबीयांना दिल्यानंतर कुटुंबीयांनी याचा जाब आरोपींना विचारताच आरोपींनी त्यांना देखील शिवीगाळ करत धमकी दिली आहे. याप्रकरणी परळी ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास पोलीस करत आहेत.

Comments
Add Comment

BMC News : सहाय्यक आयुक्तांच्या दालनाचे ऑडिट करा; सभागृह नेते गणेश खणकर यांची मागणी

मुंबई (विशेष प्रतिनिधी) मुंबई महापालिकेत पावणे चार वर्षे प्रशासकीय राज्य होते. त्यामुळे समिती अध्यक्षांची दालन

Ranichi Baug : राणीबागेतील वाघ, बिबटयांचा मांस मटणावर ताव; खरेदीला स्थायी समितीने दिली मंजुरी

मुंबई (विशेष प्रतिनिधी) राणीबागेतील वाघ, बिबट्यांसह अन्य प्राण्यांना म्हैस व रेड्याचे मांस दिले जात असून या

Mumbai Water Cut : मुंबईवर पाणी संकटाची टांगती तलवार; १ मेपासून १०% पाणी कपात होणार ?

मुंबई : भारतीय हवामान विभागाने यंदाच्या मान्सूनबाबत दीर्घकालीन अंदाज जाहीर केला असून देशात सरासरीपेक्षा कमी

heatstroke in Maharashtra : महाराष्ट्रात उष्माघातामुळे दोन जणांचा मृत्यू

मुंबई : राज्यात सुर्याने रौद्ररूप धारण केले असून मार्च महिन्यातच पारा प्रचंड वाढल्याचे दिसत आहे. वाढत्या

Cab Drivers Strike : शनिवारपासून कॅब चालकांचा संप

मुंबई : कॅब व रिक्षा चालकांच्या प्रलंबित मागण्यांवर गुरूवारी परिवहन आयुक्त राजेश नार्वेकरांशी होणाऱ्या बैठकीत

Mumbai : मुंबईत झाडांच्या फांद्यांची होणार शास्त्रोक्त छाटणी

मुंबई (विशेष प्रतिनिधी) : धोकेदायक ठरू शकणाऱ्या झाडांची पावसाळा सुरू होण्यापूर्वी शास्रोक्त पद्धतीने छाटणी कशी