महापालिकेच्या ४२६ घरांची लॉटरी सोडत पुढे ढकलली, पुढील आठवड्यात जाहीर केली जाणार तारीख

मुंबई (खास प्रतिनिधी): जाहीर करण्यात आलेल्या ४२६ घरांसाठी काढलेल्या लॉटरीसाठी २० नोव्हेंबरला सोडत काढण्यात येणार होती. परंतु ही लॉटरी तांत्रिक अडचणींमुळे पुढे ढकलण्यात आली आहे. आता पुढील आठवड्यात सोडत काढण्याचे निश्चित पालिकेने केले आहे. मात्र ही सोडत अनिश्चित काळासाठी स्थगित केली असली तरी सोडतीची नवी तारीख लवकरच जाहीर केली जाईल असे प्रशासनाच्यावतीने जाहीर करण्यात आले आहे. या सर्व घरांसाठी २०३७ जणांनी अर्ज भरले आहेत.



विकास नियंत्रण नियमावली- २०३४ च्या विनियम १५ व ३३ (२०) (ब) अंतर्गत ४ हजार चौरस मीटरपेक्षा मोठ्या भूखंडावरील प्रकल्प राबवणाऱ्या विकासकांडून महापालिकेला प्रिमियमच्या बदल्यात घरे द्यावी लागतात. ताब्यात आलेल्या घरांपैंकी ४२६ घरांची सोडत काढून विक्री करण्याचा निर्णय मुंबई महापालिकेने घेतला. महापालिकेकडून प्रथमच म्हाडाच्या धर्तीवर लॉटरी काढून अर्ज प्रक्रिया १४ नोव्हेंबरला पूर्ण झाल्यानंतर २० नोव्हेंबला अत्यल्प व अल्प उत्पन्न गटासाठी सोडत काढण्याचे निश्चित केले होते. परंतु ही सोडत आता पुढे ढकलण्यात आली आहे.


यासाठी घरे महागडी असतानाही २०३७ अर्ज प्राप्त झाले. आता पुढील आठवड्यात सोडत काढण्याचे पालिकेने निश्चित केले असले तरी पुढील आठवड्यात सोडतीची तारीख जाहीर केली जाणार आहे, असल्याची माहिती प्रशासनाने दिली आहे



कोणत्या ठिकाणी किती अर्ज


प्रेस्टिज भायखळा – ४२ घरांसाठी ११२ अर्ज


एलबीएस मार्ग भांडूप (प) – २४० घरांसाठी १२९ अर्ज


१६/ए मरोळ- अंधेरी (पू) – १४ घरांसाठी ९३७ अर्ज


माजासगाव, जोगेश्वरी (पू) – ४६ घरांसाठी ३९३ अर्ज



त्रिलोक पार्क, कांदिवली (प) – ४ घरांसाठी ८३ अर्ज


स्वामी विवेकानंद मार्ग, गोरेगाव (पू) – १९ घरांसाठी १८९ अर्ज


कांदिवली (प) – ३० घरांसाठी ११५ अर्ज


कांजूर -आदि अल्लूर – २७ घरांसाठी ५५ अर्ज


सागर वैभव सोसायटी कांदिवली – ४ घरांसाठी २४ अर्ज

Comments
Add Comment

BMC : मुंबई महानगरपालिका मुख्यलयात मंत्रालयाच्या धर्तीवर प्रवेश

मुंबई  : मुंबई महापालिका मुख्यालय बॉम्बने उडवून देण्याची धमकी प्राप्त झाल्यानंतर पुन्हा एकदा महापालिका

BMC मुख्यालय उडवून देण्याची धमकी, महापौरांसह इमारतीच्या सुरक्षेत वाढ

महापािलका मुख्यालय उडवून देण्याची धमकी ; महापौरांसह इमारतीच्या सुरक्षेत वाढ अशा धमक्यांना मी मुळीच घाबरत नाही-

अवकाळी पावसाने बाधित फळपिकांचे पंचनामे पूर्ण करा, कृषिमंत्र्यांचे निर्देश

मुंबई : 'राज्यात मे आणि जून २०२६ या कालावधीत अवकाळी पाऊस, वादळी वारे आणि गारपिटीमुळे बाधित झालेल्या फळपिकांच्या

Verification of Street Vendors : मुंबईत २० हजार फेरीवाल्यांची पडताळणी पूर्ण

येत्या २६ जून पर्यंत पडताळणी न झालेल्यांना मिळणार नाही क्यू आर कोड ओळखपत्र मुंबई (विशेष प्रतिनिधी ) : उच्‍च

Devendra Fadnavis : समर्थ भारत ते विकसित भारत’ पंतप्रधान मोदींमुळेच शक्य

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस; महाराष्ट्र राज्याच्या वतीने पत्र लिहून केले अभिनंदन मुंबई : देशाच्या इतिहासात

Panvel-Karjat Corridor : रेल्वेला नवी लाइफलाइन! लवकरच धावणार उपनगरी रेल्वे; पनवेल-कर्जत कॉरिडॉरचे ९८ टक्के काम पूर्ण

MUMBAI : मुंबई उपनगरी रेल्वे नेटवर्कसाठी महत्त्वाचा ठरणारा बहुप्रतीक्षित पनवेल-कर्जत रेल्वे कॉरिडॉर आता