हिडमाच्या मृत्यूनंतर नक्षलवाद्यांच्या कारवायांना लागली घरघर, एकाचवेळी ३७ नक्षलवादी आले शरण

नवी दिल्ली : शरण या आणि नक्षलवाद्यांच्या भावी योजनांची तसेच तयारीची माहिती देऊन सरकारी योजनांचा लाभ घ्या अथवा सुरक्षा दलाच्या कारवाईत मरा असा निर्वाणीचा इशारा केंद्रीय गृहंत्री अमित शाह यांनी नक्षलवाद्यांना दिला. त्यांनी ३१ मार्च २०२६ पर्यंत नक्षलवाद संपवण्याची घोषणा केली. यानंतर देशभर नक्षलवाद्यांविरोधात कठोर कारवाई सुरू झाली.

सुरक्षा पथकांचा पवित्रा बघून नक्षलवादी शरण येऊ लागले. पण काही प्रमुख नक्षलवादी सरकार विरोधात सशस्त्र कारवाया सुरू ठेवण्याच्या प्रयत्नात होते. अखेर नक्षलवाद्यांचा मोठा नेता असलेला नक्षलवादी हिडमा हा सुरक्षा पथकाच्या कारवाईत ठार झाला. हिडमा चकमकीत ठार झाल्यानंतर नक्षलवाद्यांच्या कारवायांना मोठा धक्का बसला आहे. बंदी घातलेल्या भाकपा माओवादी नक्षलवाद्यांच्या गटातील ३७ नक्षलवाद्यांनी एकाचवेळी शरण येऊन शस्त्र त्याग केला आहे.

शरण आलेल्या नक्षलवाद्यांमध्ये हिडमाचा विश्वासू सहकारी कोय्याडा सम्बैयाह उर्फ आझाद याचाही समावेश आहे. आझाद हा मुलुगू जिल्ह्याचा रहिवासी असून तो ३१ वर्षे भूमिगत राहून सरकार विरोधात कारवाया करत होता. विशेष म्हणजे शरण आलेल्या ३७ जणांपैकी २५ नक्षलवादी या महिला आहेत. शरण आलेल्या नक्षलवाद्यांकडून सुरक्षा पथकाने आठ बंदुका, एक एके ४७ रायफल, मोठ्या प्रमाणात दारूगोळा आणि जिवंत काडतुसे जप्त केली. ही माहिती तेलंगणाचे पोलीस महासंचालक बी. शिवधर रेड्डी यांनी दिली.

शरण आलेले तीन प्रमुख नक्षलवादी

कोय्याडा सम्बैयाह उर्फ आजाद, अप्पासी नारायण उर्फ रमेश, मुचाकी सोमाडा उर्फ एर्रा हे तीन नक्षलवादी नेते आणि त्यांचे समर्थक आंध्र तेलंगणा सीमेवर बस्तरच्या दक्षिणेकडील भागात सक्रीय होते. या नक्षलवाद्यांनी आता शरण येऊन शस्त्र त्याग केला आहे.
Comments
Add Comment

मेघालयमध्ये कोळसा खाणीत मोठी दुर्घटना

पूर्व जैंतिया हिल्स : मेघालयमधील पूर्व जैंतिया हिल्स (East Jaintia Hills district) जिल्ह्यातील कोळसा खाणीत मोठी दुर्घटना झाली. ही

Bharat Taxi App: ओला,उबरला पर्यायी भारत टॅक्सी ॲप लाँच; जाणून घ्या ॲप बद्दल

दिल्ली: केंद्रीय सहकार मंत्री अमित शहा यांनी आज म्हणजेच गुरुवारी (५ फेब्रुवारी २०२६) भारतातील पहिले

Shiv Navratri 2026: उज्जैनमध्ये शिव नवरात्र कधी सुरू होणार, नऊ दिवसांत काय विशेष असणार, जाणून घ्या

दिल्ली: उज्जैनचे महाकालेश्वर मंदिर जगप्रसिद्ध आहे. मंदिराशी संबंधित धार्मिक श्रद्धेमुळे येथे दररोज भाविकांची

Jammu and Kashmir: लष्कराची मोठी कारवाई; टॉप कमांडरसह २ पाकिस्तानी दहशदवाद्यांचा खात्मा

जम्मू काश्मीर: जम्मू आणि काश्मीरच्या उधमपूर जिल्ह्यात भारतीय लष्कराकडून मोठी कारवाई करण्यात आली आहे. या कारवाईत

विदेशी राजस्थान फिरण्यासाठी आले खरे, पण भारताने केली हकालपट्टी; कारण काय?

अजमेर : राजस्थानमध्ये लाखो पर्यटक फिरण्यासाठी येत असतात. विदेशी पर्यटकांना राजस्थानातील राजे राजवाड्यांची,

श्री स्वामी सत्यमित्रानंद गिरी सनातन संस्कृतीचे प्रमुख वाहक

समाधी मंदिर भावी पिढ्यासाठी प्रेरणास्थळ – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सांस्कृतिक पुनरोत्थानाच्या कार्याला