हिडमाच्या मृत्यूनंतर नक्षलवाद्यांच्या कारवायांना लागली घरघर, एकाचवेळी ३७ नक्षलवादी आले शरण

नवी दिल्ली : शरण या आणि नक्षलवाद्यांच्या भावी योजनांची तसेच तयारीची माहिती देऊन सरकारी योजनांचा लाभ घ्या अथवा सुरक्षा दलाच्या कारवाईत मरा असा निर्वाणीचा इशारा केंद्रीय गृहंत्री अमित शाह यांनी नक्षलवाद्यांना दिला. त्यांनी ३१ मार्च २०२६ पर्यंत नक्षलवाद संपवण्याची घोषणा केली. यानंतर देशभर नक्षलवाद्यांविरोधात कठोर कारवाई सुरू झाली.

सुरक्षा पथकांचा पवित्रा बघून नक्षलवादी शरण येऊ लागले. पण काही प्रमुख नक्षलवादी सरकार विरोधात सशस्त्र कारवाया सुरू ठेवण्याच्या प्रयत्नात होते. अखेर नक्षलवाद्यांचा मोठा नेता असलेला नक्षलवादी हिडमा हा सुरक्षा पथकाच्या कारवाईत ठार झाला. हिडमा चकमकीत ठार झाल्यानंतर नक्षलवाद्यांच्या कारवायांना मोठा धक्का बसला आहे. बंदी घातलेल्या भाकपा माओवादी नक्षलवाद्यांच्या गटातील ३७ नक्षलवाद्यांनी एकाचवेळी शरण येऊन शस्त्र त्याग केला आहे.

शरण आलेल्या नक्षलवाद्यांमध्ये हिडमाचा विश्वासू सहकारी कोय्याडा सम्बैयाह उर्फ आझाद याचाही समावेश आहे. आझाद हा मुलुगू जिल्ह्याचा रहिवासी असून तो ३१ वर्षे भूमिगत राहून सरकार विरोधात कारवाया करत होता. विशेष म्हणजे शरण आलेल्या ३७ जणांपैकी २५ नक्षलवादी या महिला आहेत. शरण आलेल्या नक्षलवाद्यांकडून सुरक्षा पथकाने आठ बंदुका, एक एके ४७ रायफल, मोठ्या प्रमाणात दारूगोळा आणि जिवंत काडतुसे जप्त केली. ही माहिती तेलंगणाचे पोलीस महासंचालक बी. शिवधर रेड्डी यांनी दिली.

शरण आलेले तीन प्रमुख नक्षलवादी

कोय्याडा सम्बैयाह उर्फ आजाद, अप्पासी नारायण उर्फ रमेश, मुचाकी सोमाडा उर्फ एर्रा हे तीन नक्षलवादी नेते आणि त्यांचे समर्थक आंध्र तेलंगणा सीमेवर बस्तरच्या दक्षिणेकडील भागात सक्रीय होते. या नक्षलवाद्यांनी आता शरण येऊन शस्त्र त्याग केला आहे.
Comments
Add Comment

‘तिरुपती’च्या २० कोटी लाडूंसाठी वापरले ‘भेसळयुक्त’ तूप

नवी दिल्ली (वृत्तसंस्था): तिरुपती मंदिरात भेसळयुक्त तूप वापरून अंदाजे २० कोटी लाडू तयार करण्यात आले होते.

दिल्ली क्राईम ब्रँचची धडक कारवाई, आयएसआयशी संबंधित ४ आंतरराष्ट्रीय शस्त्र तस्करांना अटक

नवी दिल्ली: दिल्ली गुन्हे शाखेने पाकिस्तानी आयएसआयशी जोडलेल्या आंतरराष्ट्रीय शस्त्र तस्करीच्या टोळीतील चार

कोट्यावधींच्या सायबर फसवणुकीचा दिल्ली पोलिसांकडून पर्दाफाश; गुन्हेगारीचे मुळ उद्ध्वस्त करणाच्या हेतूने कारवाई

मुंबई : दिल्ली पोलिसांनी गेल्या ४८ तासांत मोठ्या प्रमाणावर सायबर गुन्हेगारीविरोधात मोहीम राबवत शेकडो फसवणूक

भारतात नवीन कामगार कायदे लागू, आत्मनिर्भर भारताच्या दिशेने महत्त्वाचे पाऊल! काय होणार लाभ, जाणून घ्या सविस्तर

नवी दिल्ली: केंद्रीय श्रममंत्री मनसूख मांडवीय यांनी देशात चार नवीन कामगार कायदे लागू करत असल्याची मोठी घोषणा

नितीश कुमार यांनी २० वर्षांनी गृहमंत्री पद सोडले

१८ मंत्र्यांची खाती जाहीर पाटणा : बिहारच्या मुख्यमंत्री पदाची शपथ घेतल्यानंतर नितीश कुमार यांनी दुसऱ्या दिवशी

दिल्ली स्फोटासाठी घरघंटीत बनवली स्फोटके

नवी दिल्ली : राजधानी दिल्लीतील लाल किल्ला मेट्रो स्टेशनजवळ झालेल्या भीषण कार स्फोटाच्या तपासात पोलिसांना मोठा