शौर्य पाटील मृत्यू प्रकरणी दिल्ली सरकारची चौकशी समिती

सेंट कोलंबस शाळेच्या चार शिक्षिका निलंबित


नवी दिल्ली : दिल्लीतील सेंट कोलंबस शाळेत दहावीला शिकणारा सांगलीचा १६ वर्षीय शौर्य पाटील या विद्यार्थ्याने आत्महत्या केल्याने राजधानीतच नव्हे, तर महाराष्ट्रातही मोठे दुःख आणि संताप उसळला आहे. शौर्यने आत्महत्या करण्यापूर्वी दीड पानांची सुसाईड नोट लिहिली असून त्यात त्याने शाळेच्या प्राचार्यांसह तीन शिक्षिकांना जबाबदार धरले आहे.


या घटनेनंतर शाळेबाहेर विद्यार्थ्यांनी, पालकांनी आणि नातेवाइकांनी मोठे आंदोलन सुरू केले आहे. शुक्रवारी सलग दुसऱ्या दिवशी शौर्यच्या समर्थनार्थ शाळेबाहेर मोठा जमाव जमला होता. सर्वांचे एकच म्हणणे ‘दोषींना शिक्षा झालीच पाहिजे, शौर्यला न्याय मिळालाच पाहिजे!’


शौर्यने आपल्या सुसाईड नोटमध्ये लिहिले की, तो मानसिक छळाला कंटाळला आहे. सतत अपमान, शैक्षणिक भार, अन्यायकारक वागणूक आणि प्राचार्यांचा दबाव हे त्याच्या मानसिक त्रासाचे मुख्य कारण असल्याचे त्यात नमूद आहे. १० दिवसांत अहवाल सादर करण्याचे आदेश


या प्रकरणाची गंभीरता लक्षात घेऊन दिल्ली सरकारने चार शिक्षिकांचे निलंबन केले आहे. या संपूर्ण प्रकाराची सखोल चौकशी करण्यासाठी विशेष समिती स्थापन केली आहे. समितीला १० दिवसांत प्राथमिक अहवाल सादर करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. पालक व आंदोलनकर्त्यांचा आरोप आहे की हे निलंबन फक्त नावापुरता आहे व कारवाईचा देखावा केला जात आहे.

Comments
Add Comment

हिवाळी अधिवेशनाआधी केंद्र सरकारची सर्वपक्षीय बैठक

मुंबई : हिवाळी अधिवेशन सुरू होण्यापूर्वी संसदेचे कामकाज सुरळीत पार पाडण्यासाठी केंद्र सरकारने सर्वपक्षीय

स्मृती मानधना-पलाश मुच्छल लग्नाची 'ही' तारीख पंतप्रधानानीचं केली उघड

मुंबई : स्मृती मानधना आणि पलाश मुच्छल यांच्या लग्नाबाबतची चर्चा अनेक दिवसापासून रंगत होती. मात्र आता त्यांच्या

स्मार्ट सिटीच्या धर्तीवर अयोध्येचा विकास

लखनऊ / अयोध्या : मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या दूरदर्शी नेतृत्वाचा परिणाम म्हणून अयोध्येचा स्मार्ट सिटी

विधेयक मंजुरीसाठी राष्ट्रपती, राज्यपालांवर वेळेचं बंधन नाही; सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय

नवी दिल्ली (वृत्तसंस्था): सर्वोच्च न्यायालयाने गुरुवारी राष्ट्रपती आणि राज्यपाल यांना राज्य किंवा केंद्र

सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानंतरच जिल्हा परिषदांचा कार्यक्रम

आरक्षणासाठी निवडणूक आयोग पुन्हा लॉटरी काढण्याची शक्यता नवी दिल्ली : राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या

CM Nitish Kumar Bihar : CM नितीश कुमारांकडे फक्त २१ हजारांची रोख रक्कम! पाटण्यात नावावर घर नाही, तरीही नितीश कुमार यांची एकूण संपत्ती किती?

पाटणा : बिहारच्या राजकारणाला गेल्या दोन दशकांपासून एकच चेहरा व्यापून राहिला आहे, तो म्हणजे नितीश कुमार यांचा. ते