‘तिरुपती’च्या २० कोटी लाडूंसाठी वापरले ‘भेसळयुक्त’ तूप

नवी दिल्ली (वृत्तसंस्था): तिरुपती मंदिरात भेसळयुक्त तूप वापरून अंदाजे २० कोटी लाडू तयार करण्यात आले होते. २०१९-२०२४ दरम्यान वाटण्यात आलेल्या एकूण ४८.७६ कोटी लाडूंपैकी हे लाडू होते, अशी माहिती श्री वेंकटेश्वर मंदिराचे व्यवस्थापन करणाऱ्या तिरुमला तिरुपती देवस्थानम (टीटीडी) ट्रस्ट बोर्डाचे अध्यक्ष बीआर नायडू यांनी दिली आहे. ही आकडेवारी २०१९ ते २०२४ दरम्यान वाटण्यात आलेल्या प्रसादाच्या एकूण ४८७.६ दशलक्ष लाडूंपैकी २० कोटी लाडू हे भेसळयुक्त तुपाचा वापर करुन बनवले होते, असेही त्यांनी स्पष्ट केले आहे.


मंदिरात दररोज येणाऱ्या भाविकांची संख्या, खरेदीची माहिती आणि उत्पादन आणि विक्रीचे आकडे यांचा विचार करून साध्या गणनेच्या आधारे हे आकडे काढण्यात आले आहेत. एसआयटीने अलीकडेच या प्रकरणासंदर्भात टीटीडीचे माजी अध्यक्ष आणि वायएसआरसीपी खासदार वायव्ही सुब्बा रेड्डी यांची आठ तास चौकशी केली. प्रयोगशाळेने नमुन्यांमध्ये भेसळ आढळून आली असूनही त्यांनी तूपाच्या टँकरना परवानगी का दिली असे विचारले असता, त्यांनी दावा केला की अहवाल त्यांच्यासमोर कधीही सादर करण्यात आला नाही. खरेदी तांत्रिक समितीच्या शिफारशींनुसार केली गेली.त्यांचे माजी सहाय्यक चिन्ना अप्पाना यांना अटक करण्यात आली आहे.


एसआयटीने टीटीडीचे माजी कार्यकारी अधिकारी एव्ही धर्मा रेड्डी यांचीही चौकशी केली आहे. नेल्लोर येथील न्यायालयात त्यांनी आपले महत्त्वाचे निरीक्षण नोंदवले आहे, १५ डिसेंबरपर्यंत पुरवणी आरोपपत्र सादर होण्याची अपेक्षा आहे. दरम्यान, सूत्रांनी असे म्हटले आहे की, या पाच वर्षांत अंदाजे ११ कोटी भाविकांनी मंदिराला भेट दिली होती. मात्र भेसळयुक्त तुपापासून बनवलेले लाडू नेमके कोणी घेतले हे निश्चित करण्याचा कोणताही मार्ग नाही. तिरुमला तिरुपती देवस्थानम (टीटीडी) ट्रस्ट बोर्डाचे स्पष्ट केले आहे की, व्हीव्हीआयपी लाडू देखील वेगळे ओळखता येत नव्हते.

Comments
Add Comment

Vidarbha Railway: गोंदिया ते जबलपूर रेल्वे प्रकल्पाला केंद्र सरकारची मंजुरी

मुंबई: गोंदिया ते जबलपूर रेल्वे प्रवासाचा चेहरामोहरा बदलणार असून या मार्गाच्या दुहेरीकरणाला अखेर केंद्र

गोंदिया-जबलपूर मार्ग दुहेरीकरणाला केंद्रीय मंत्रिमंडळाकडून मंजुरी

महाराष्ट्रासह चार राज्यात मल्टी-ट्रॅकिंग प्रकल्प नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली

पोखरणमध्ये भारताचे हवाई दल करणार 'ऑपरेशन वायुशक्ती'

पोखरण : भारतीय हवाई दल राजस्थानमधील पोखरण येथे २७ फेब्रुवारी रोजी 'ऑपरेशन वायुशक्ती' अंतर्गत युद्धसराव अर्थात

संसदीय मुत्सद्देगिरीत डॉ. श्रीकांत शिंदेंची एन्ट्री; इंडोनेशियासोबतच्या संबंधांचे करणार सारथ्य

नवी दिल्ली : भारताची 'संसदीय मुत्सद्देगिरी' (Legislative Diplomacy) जागतिक स्तरावर अधिक बळकट करण्यासाठी लोकसभा अध्यक्ष मा. ओम

Kerala To Be Renamed : केरळचे नाव बदलून केरळम होणार? राज्य निवडणुकीपूर्वी मोठ्या निर्णयाची शक्यता

केरळचे नाव बदलून केरळम करण्याचे विधेयक आज केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत मंजूर होण्याची शक्यता आहे, जो

AI ​​Impact Summit मधील आंदोलन प्रकरणी युवक काँग्रेस अध्यक्षाला अटक

नवी दिल्ली : मागील आठवड्यात झालेल्या एआय इम्पॅक्ट समिटमधील भारतीय युवा काँग्रेसच्या आंदोलन प्रकरणात दिल्ली