‘तिरुपती’च्या २० कोटी लाडूंसाठी वापरले ‘भेसळयुक्त’ तूप

नवी दिल्ली (वृत्तसंस्था): तिरुपती मंदिरात भेसळयुक्त तूप वापरून अंदाजे २० कोटी लाडू तयार करण्यात आले होते. २०१९-२०२४ दरम्यान वाटण्यात आलेल्या एकूण ४८.७६ कोटी लाडूंपैकी हे लाडू होते, अशी माहिती श्री वेंकटेश्वर मंदिराचे व्यवस्थापन करणाऱ्या तिरुमला तिरुपती देवस्थानम (टीटीडी) ट्रस्ट बोर्डाचे अध्यक्ष बीआर नायडू यांनी दिली आहे. ही आकडेवारी २०१९ ते २०२४ दरम्यान वाटण्यात आलेल्या प्रसादाच्या एकूण ४८७.६ दशलक्ष लाडूंपैकी २० कोटी लाडू हे भेसळयुक्त तुपाचा वापर करुन बनवले होते, असेही त्यांनी स्पष्ट केले आहे.


मंदिरात दररोज येणाऱ्या भाविकांची संख्या, खरेदीची माहिती आणि उत्पादन आणि विक्रीचे आकडे यांचा विचार करून साध्या गणनेच्या आधारे हे आकडे काढण्यात आले आहेत. एसआयटीने अलीकडेच या प्रकरणासंदर्भात टीटीडीचे माजी अध्यक्ष आणि वायएसआरसीपी खासदार वायव्ही सुब्बा रेड्डी यांची आठ तास चौकशी केली. प्रयोगशाळेने नमुन्यांमध्ये भेसळ आढळून आली असूनही त्यांनी तूपाच्या टँकरना परवानगी का दिली असे विचारले असता, त्यांनी दावा केला की अहवाल त्यांच्यासमोर कधीही सादर करण्यात आला नाही. खरेदी तांत्रिक समितीच्या शिफारशींनुसार केली गेली.त्यांचे माजी सहाय्यक चिन्ना अप्पाना यांना अटक करण्यात आली आहे.


एसआयटीने टीटीडीचे माजी कार्यकारी अधिकारी एव्ही धर्मा रेड्डी यांचीही चौकशी केली आहे. नेल्लोर येथील न्यायालयात त्यांनी आपले महत्त्वाचे निरीक्षण नोंदवले आहे, १५ डिसेंबरपर्यंत पुरवणी आरोपपत्र सादर होण्याची अपेक्षा आहे. दरम्यान, सूत्रांनी असे म्हटले आहे की, या पाच वर्षांत अंदाजे ११ कोटी भाविकांनी मंदिराला भेट दिली होती. मात्र भेसळयुक्त तुपापासून बनवलेले लाडू नेमके कोणी घेतले हे निश्चित करण्याचा कोणताही मार्ग नाही. तिरुमला तिरुपती देवस्थानम (टीटीडी) ट्रस्ट बोर्डाचे स्पष्ट केले आहे की, व्हीव्हीआयपी लाडू देखील वेगळे ओळखता येत नव्हते.

Comments
Add Comment

दिल्ली क्राईम ब्रँचची धडक कारवाई, आयएसआयशी संबंधित ४ आंतरराष्ट्रीय शस्त्र तस्करांना अटक

नवी दिल्ली: दिल्ली गुन्हे शाखेने पाकिस्तानी आयएसआयशी जोडलेल्या आंतरराष्ट्रीय शस्त्र तस्करीच्या टोळीतील चार

कोट्यावधींच्या सायबर फसवणुकीचा दिल्ली पोलिसांकडून पर्दाफाश; गुन्हेगारीचे मुळ उद्ध्वस्त करणाच्या हेतूने कारवाई

मुंबई : दिल्ली पोलिसांनी गेल्या ४८ तासांत मोठ्या प्रमाणावर सायबर गुन्हेगारीविरोधात मोहीम राबवत शेकडो फसवणूक

भारतात नवीन कामगार कायदे लागू, आत्मनिर्भर भारताच्या दिशेने महत्त्वाचे पाऊल! काय होणार लाभ, जाणून घ्या सविस्तर

नवी दिल्ली: केंद्रीय श्रममंत्री मनसूख मांडवीय यांनी देशात चार नवीन कामगार कायदे लागू करत असल्याची मोठी घोषणा

नितीश कुमार यांनी २० वर्षांनी गृहमंत्री पद सोडले

१८ मंत्र्यांची खाती जाहीर पाटणा : बिहारच्या मुख्यमंत्री पदाची शपथ घेतल्यानंतर नितीश कुमार यांनी दुसऱ्या दिवशी

दिल्ली स्फोटासाठी घरघंटीत बनवली स्फोटके

नवी दिल्ली : राजधानी दिल्लीतील लाल किल्ला मेट्रो स्टेशनजवळ झालेल्या भीषण कार स्फोटाच्या तपासात पोलिसांना मोठा

शौर्य पाटील मृत्यू प्रकरणी दिल्ली सरकारची चौकशी समिती

सेंट कोलंबस शाळेच्या चार शिक्षिका निलंबित नवी दिल्ली : दिल्लीतील सेंट कोलंबस शाळेत दहावीला शिकणारा सांगलीचा १६