रायगडमध्ये दोन मंत्री, पाच आमदार, तीन खासदारांची प्रतिष्ठा पणाला !

नगरपालिकांच्या निवडणुकांमुळे ऐन थंडीत वातावरण तापले


सुभाष म्हात्रे अलिबाग (प्रतिनिधी) : नगरपालिका निवडणुकांची रणधुमाळी रायगड जिल्ह्यात सुरु असून, जिल्ह्यातील दोन मंत्री, पाच आमदार आणि तीन खासदारांची या निवडणुकीसाठी प्रतिष्ठा पणाला लागली आहे. या नगरपालिकांवर आपल्याच पक्षाचे वर्चस्व प्रस्थापित करण्यासाठी या नेतेमंडळींना खूपच प्रयत्न करावे लागणार आहेत. या प्रयत्नात कोण बाजी मारणार याकडे सर्वांचेच लक्ष लागून राहिले आहे. सध्यातरी रायगड जिल्ह्यात ऐन थंडीत राजकीय वातावरण तापलेले असून, जस-जसा प्रचार शिगेला पोहोचणार आहे. तसे एकमेकांवर आरोपांच्या फैरी झडण्याची शक्यता नाकारता येत नाही. विशेषतः खासदार सुनील तटकरे आणि रोहयो मंत्री भरतशेठ गोगावले यांना राजकीयदृष्ट्या आपले प्राबल्य वाढविण्यासाठी या नगरपालिका निवडणुकांकडे गांभीर्याने पहावे लागत असल्याचे प्रकर्षाने दिसून येत आहे. या निवडणुकांनंतर आगामी जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुका होणार असल्याने या निवडणुकीचा कठीण पेपर कोण सोडविणार याकडे रायगडकरांचे लक्ष आहे.


रायगड जिल्ह्यात अलिबाग, पेण, उरण, कर्जत, माथेरान, रोहा, महाड, श्रीवर्धन, मुरुड, खोपोली या नगरपालिकांच्या निवडणुका चार वर्षांनी होत असल्याने सर्वच पक्षांच्या कार्यकर्त्यांचा अंगात उत्साह संचारलेला आहे. त्यामुळे या सर्व नगरपालिकांवर कुणाची सत्ता येणार हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे. महाडमध्ये गोगावले यांच्या विरोधात राष्ट्रवादीने भाजपसमवेत युती केली आहे. त्यामुळे महाड जिंकणे हे तटकरे आणि गोगावले यांच्यासाठी प्रतिष्ठेचे ठरणार आहे. असाच प्रकार रोहा, कर्जत, श्रीवर्धन, खोपोलीमध्येही निर्माण झालेला आहे. तेथेही राष्ट्रवादी विरुद्ध शिवसेना असाच राजकीय सामना होणार असल्याने खासदार सुनिल तटकरे विरुद्ध आमदार महेंद्र थोरवे यांचा कस लागणार आहे. कर्जतला भाजपाने शिवसेनेला साथ दिली आहे, तर खोपोलीत शिवसेना, भाजप, रिपाइं एकत्र आलेले आहेत. त्यांच्या विरोधात राष्ट्रवादीने ठाकरे शिवसेना आणि शेकाप यांची मोट बांधून विकास परिवर्तन आघाडी गठीत केलेली आहे. त्यामुळे येथेही थोरवे आणि तटकरे यांना कडवी झुंज द्यावी लागणार आहे. माथेरानमध्ये राष्ट्रवादी विरुद्ध महायुती असाच सामना होणार आहे. अलिबागमध्ये शेकाप, काँग्रेस यांची महाआघाडी आहे. त्या विरोधात शिवसेना, भाजप एकत्र आलेले आहेत. मात्र यामध्ये राष्ट्रवादीचा समावेश नाही. त्यांनी नगराध्यक्ष पदासाठी स्वतंत्र अर्ज दाखल केला आहे. त्यामुळे येथे राष्ट्रवादी महायुतीत सहभागी झालेली नाही. उरणला भाजपने स्वतंत्रपणे निवडणूक लढविण्याचा निर्णय घेतला आहे. त्या विरोधात शिवसेना आणि महाविकास आघाडीही मैदानात उतरलेली आहे. यामुळे येथे भाजपचे आमदार महेश बालदी यांना आपल्या अस्तित्वासाठी झगडावे लागणार एवढे निश्चित. रोह्यात खासदार सुनिल तटकरे यांच्या विरोधात शिवसेना उभी ठाकली आहे. अशी स्थिती श्रीवर्धन, मुरुडला देखील आहे. एकूणच महायुतीच्या सर्व आमदारांना आपापल्या मतदार संघातील नगरपालिकांवर सत्ता टिकविण्यासाठी झगडावे लागणार हे नक्की !

Comments
Add Comment

मराठी शाळांबाबतच्या धोरणाविषयी काय म्हणाली मुंबई महापालिका ?

मराठी शाळांबाबत चुकीची माहिती; महापालिका प्रशासनाने मराठी अभ्यास केंद्राच्या शिष्टमंडळासमोर मांडली

शीव उड्डाणपूल येत्या पावसाळ्यात होणार वाहतुकीसाठी खुला

मुंबई (विशेष प्रतिनिधी) : शीव (सायन) उड्डाणपुलाच्या कामांना अपेक्षित गती प्राप्त होत आहे. पादचा-यांना पूर्व -

रेल्वे मार्गावर धुराचे लोट येताच उडाला गोंधळ, पसरले भीतीचे वातावरण; नेमका कसला होता 'तो' धूर जाणून घ्या

ठाणे : शुक्रवारी संध्याकाळी गर्दीच्या वेळी पसरलेल्या धुरामुळे नागरिकांची घाबरगुंडी उडाली होती. मध्य रेल्वेवर

तब्बल ४६ वर्षांनंतर भांडुप संकुला २००० दलशक्ष लिटर क्षमतेचा जलशुध्दीकरण प्रकल्प येत्या एप्रिल २०२९ पर्यंत होणार प्रकल्प पूर्ण

मुंबई :  भांडुप संकुल येथे मुंबई महानगरपालिकेमार्फत २,००० दशलक्ष लीटर प्रतिदिन क्षमतेचा अत्याधुनिक जलशुद्धीकरण

सुनेत्रा पवार शनिवारी सायंकाळी ५ वाजता घेणार उपमुख्यमंत्री पदाची शपथ, सूत्रांची माहिती

मुंबई : अजित पवार यांच्या निधनानंतर रिक्त झालेल्या उपमुख्यमंत्रिपदाची जबाबदारी सुनेत्रा पवार यांच्याकडे

दादरच्या छत्रपती शिवाजी महाराज मैदानात अनधिकृतपणे जाहिरात फलक

मुंबई (विशेष प्रतिनिधी) : दादर येथील छत्रपती शिवाजी महाराज मैदान परिसरात अनधिकृतपणे लोखंडी संरचना उभारुन