शिवकुमार यांचे 'ते' विधान आणि कर्नाटकच्या काँग्रेस नेत्यांची खर्गेंसोबत अचानक भेट! कर्नाटकातील राजकारणात बदल घडणार?

नवी दिल्ली: कर्नाटकातील नेतृत्व बदलाच्या वाढत्या चर्चांच्या पार्श्वभूमीवर, उपमुख्यमंत्री डीके शिवकुमार यांच्या निष्ठावंत काँग्रेस नेत्यांच्या एका गटाने काल (२० नोव्हेंबर) नवी दिल्लीत काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांची भेट घेतली. रात्री उशिरा झालेल्या या बैठकीमुळे कर्नाटकातील सत्ताधारी काँग्रेसमध्ये सत्तासंघर्ष सुरू असल्याच्या चर्चा सुरू झाल्या आहेत. महत्त्वाचे म्हणजे ही भेट एवढी तात्काळ ठरवली गेली की, सुरक्षा यंत्रणांनासुद्धा याबद्दल माहिती नव्हती.



२०२३ मध्ये, विधानसभा निवडणुकीत काँग्रेसच्या विजयानंतर, मुख्यमंत्रीपदासाठी सिद्धरामय्या आणि शिवकुमार यांच्यात तीव्र स्पर्धा झाली. यानंतर सिद्धरामय्या यांची मुख्यमंत्री म्हणून नियुक्ती झाली, तर काँग्रेस हायकमांडने तडजोड केल्यामुळे शिवकुमार उपमुख्यमंत्री झाले. या गोष्टीला अडीज वर्ष पूर्ण झाल्यानंतर लगेच 'रोटेशनल मुख्यमंत्री फॉर्म्युला' बद्दलच्या चर्चांना जोर आला आहे. ज्या अंतर्गत शिवकुमार कार्यकाळाच्या मध्यभागी मुख्यमंत्रीपदाची सूत्रे स्वीकारू शकतात, परंतु अद्याप पुष्टी झालेली नाही.





दरम्यान, गलुरू येथे इंदिरा गांधी जयंती निमित्त आयोजित एका कार्यक्रमात डीके शिवकुमार यांनी महत्त्वाचे विधान केले होते. ज्याचे अनुमान यापूर्वी शिवकुमार यांनी स्वत: डावलून टाकले होते. ते म्हणाले की, मी या पदावर कायम नाही राहू शकत. या पदावर राहून मला साडेपाच वर्षे झाली आहेत. यावर्षी मार्चमध्ये सहा वर्षे पूर्ण होतील. कोणतेच पद नेहमीसाठी नसते." शिवकुमार यांच्या या विधानामुळे दिल्लीतील चर्चांना आधार मिळाला. तर सिद्धरामय्या यांनी सांगितले की, ते पूर्ण पाच वर्षांचा कार्यकाळ पूर्ण करतील.

Comments
Add Comment

नागपूर येथील भारतीय व्यवस्थापन संस्थेला इन्क्यूबेशन सेंटर म्हणून मान्यता

मुंबई: विदर्भातील नवउद्योग (स्टार्टअप) परिसंस्था अधिक सक्षम करण्याच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण पाऊल उचलत,

नमो शेतकरी महासन्मान निधीचा ८ वा हप्ता पुढील आठवड्यात शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार; कृषीमंत्र्यांनी दिली माहिती

मुंबई: राज्यातील लाखो शेतकऱ्यांना आर्थिक दिलासा देणारा महत्त्वपूर्ण निर्णय राज्य शासनाने घेतला असून, नमो

‘महाराष्ट्र धर्मस्वातंत्र्य विधेयक’ विधानपरिषदेत मंजूर

मुंबई: महाराष्ट्रात गेल्या काही काळापासून चर्चेत असलेले आणि अत्यंत कडक तरतुदी असलेले ‘महाराष्ट्र

सिंधुदुर्गच्या विकासाला बुस्टर; राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत १०० टक्के 'व्हिजीएफ'ला मंजुरी

मुंबई: सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या पर्यटनाला आणि अर्थव्यवस्थेला मोठी गती देणारा निर्णय मंगळवारी राज्य

नंदूरबार,छत्रपती संभाजीनगरमधील गैरव्यवहारासाठी 'एसआयटी स्थापन; महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांची विधान परिषदेत घोषणा

​मुंबई: नंदूरबार जिल्ह्यातील नवापूर येथील भूसंपादन गैरव्यवहार आणि छत्रपती संभाजीनगरमधील ब्रिजवाडी येथील ५४

मुंबईचा पश्चिम आणि पूर्व द्रुतगती महामार्ग पावसाळ्यापूर्वी समतल करा; उपमहापौरांची आयुक्तांकडे निवेदनाद्वारे मागणी

मुंबई: मुंबई महानगरातील रस्त्यांची स्थिती अधिक सुधारण्यासाठी पश्चिम व पूर्व द्रुतगती महामार्ग तसेच प्रमुख