पुण्यात म्हाडाची मोठी घोषणा; ४ हजारांहून अधिक घरांसाठी वाढीव मुदत

पुणे : पुणेकरांसाठी मोठी आनंदाची बातमी आहे. म्हाडाच्या पुणे गृहनिर्माण व क्षेत्रविकास मंडळातर्फे पुणे, पिंपरी-चिंचवड, पीएमआरडीए हद्द तसेच सोलापूर, कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्यातील ४,१८६ घरांसाठी आयोजित संगणकीय सोडतीच्या अर्जाची अंतिम मुदत आता वाढवण्यात आली आहे. आता इच्छुक नागरिकांना ३० नोव्हेंबर २०२५ रोजी रात्री ११ वाजेपर्यंत अर्ज करता येणार आहे.


या सोडतीसाठी आतापर्यंत तब्बल १,८२,७८१ ऑनलाईन अर्ज दाखल झाले असून त्यापैकी १,३३,८८५ अर्ज अनामत रकमेच्या भरण्यासह नोंदवले गेले आहेत. संगणकीय सोडत ११ डिसेंबर २०२५ रोजी दुपारी १२ वाजता काढली जाणार आहे. अर्जदारांना ३० नोव्हेंबरपर्यंत RTGS अथवा NEFT द्वारे अनामत रकमेचा भरणा करता येईल.


तांत्रिक अडचणींमुळे काही अर्जदारांची कागदपत्रे पडताळणीसाठी अपूर्ण राहिल्याने मुदतवाढ मागणी करण्यात आली होती. तसेच नागरिकांकडून आलेल्या उत्स्फूर्त प्रतिसादाचा विचार करून म्हाडाने ही अंतिम मुदतवाढ जाहीर केली आहे. नव्या वेळापत्रकाची माहिती म्हाडाच्या संकेतस्थळावर उपलब्ध होईल. इतर अटी पूर्वी जाहीर केलेल्या जाहिरातीनुसारच राहणार आहेत, अशी माहिती पुणे मंडळाच्या अधिकार्‍यांनी दिली.


या सोडतीत चार प्रमुख गटांमध्ये सदनिका उपलब्ध आहेत. प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य या योजनेत १६८३ घरांचा समावेश आहे, तर प्रधानमंत्री आवास योजना (शहरी) अंतर्गत २९९ घरे उपलब्ध आहेत. १५ टक्के सर्वसमावेशक गृहनिर्माण योजनेत पीएमआरडीए हद्दीत ८६४ घरे देण्यात आली आहेत. तसेच २० टक्के सर्वसमावेशक गृहनिर्माण योजनेअंतर्गत पुणे महानगरपालिका, पिंपरी-चिंचवड महानगरपालिका आणि पीएमआरडीए क्षेत्रातील ३२२२ घरांचा समावेश आहे.

Comments
Add Comment

आपत्कालीन परिस्थितीतील वाहतूक आराखडा तत्काळ तयार करा - उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे निर्देश

मुंबई पुणे द्रुतगती महामार्ग वाहतूक कोंडीची उपमुख्यमंत्र्यांकडून गंभीर दखल मिसिंग लिंकचे कामही लवकरात लवकर

अमरावती शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयासाठी १२ हेक्टर जागा मंजूर

देवेंद्र फडणवीस यांच्या सूचनेवरून महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचा निर्णय १०० विद्यार्थी प्रवेश ⁠४३०

पुणे एक्सप्रेस वे अपघात प्रकरणी महाराष्ट्र राज्य परिवहन सेवेच्या १३९ फेऱ्या रद्द

मुंबई : पुणे–मुंबई एक्सप्रेस वेवर झालेल्या टँकर अपघातामुळे मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी निर्माण झाली असून या

एक्सप्रेवेवर प्रचंड मोठी वाहतूक कोंडी अन् २५ किलोमीटर पर्यंत रांगा; नेमकं पुण्यात घडलं काय ?

लोणावळा : मुंबई–पुणे द्रुतगती महामार्गावर मंगळवारी सायंकाळी घडलेल्या एका अपघातामुळे संपूर्ण मार्गावर

Congress: काँग्रेसमधला वाद चव्हाट्यावर, नगरसेवक थेट दिल्लीत पोहोचले, बैठकीत नेमकं घडलं काय?

दिल्ली: चंद्रपूर महापालिकेत सर्वाधिक जागा जिंकूनही काँग्रेसमध्ये गटातील राजकारणामुळे सत्ता गमावण्याची वेळ

Ajit Pawar : विमान अपघाताआधी अजित पवारांनी सुनेत्रा वहिनींच्या नातलगाला केलेला शेवटचा फोन... काय होते अजित पवारांचे शेवटचे शब्द

धाराशिव : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष आणि राज्याचे उपमुख्यमंत्री दिवंगत अजित पवार यांच्या संदर्भात एक नवी