मडगाव, रत्नागिरी, उडुपी या स्थानकांमध्ये ‘५ जी’ नेटवर्कची जोडणी

मुंबई : कोकण रेल्वेच्या प्रमुख स्थानकात आणि कोकण रेल्वेच्या अखत्यारितील रेल्वेगाड्यांमध्ये ‘५ जी’ नेटवर्क सुविधा उपलब्ध करण्यात येणार असून प्रवाशांना विनाव्यत्यय इंटरनेटचा वापर करता येणार आहे. कोकण रेल्वे कॉर्पोरेशन लिमिटेडने ब्लू क्लाउड सॉफ्टटेक सोल्युशन्स लिमिटेडसोबत प्रमुख स्थानकांमध्ये ‘५ जी’ नेटवर्कची जोडणी आणि डिजिटल मनोरंजन सेवांसाठी नुकताच नवी मुंबई येथे सामंजस्य करार केला. कोकण रेल्वेच्या मडगाव, रत्नागिरी, उडुपी या तीन रेल्वे स्थानकांमध्ये ‘५ जी’ नेटवर्कची जोडणी करण्यात येईल, तर टप्प्याटप्प्याने ब्लू क्लाउड इतर रेल्वे स्थानकांमध्ये त्यांची डिजिटल उत्पादने आणि ‘५ जी’ फिक्स्ड वायरलेस ॲक्सेस सेवा पुरवली जाईल. कोकण रेल्वेच्या अखत्यारितील रेल्वेगाड्यांमध्ये ही सेवा पुरवेल. त्यामुळे प्रवाशांना कोणत्याही अडचणीविना इंटरनेटद्वारे माहिती मिळविता येईल. ब्लू क्लाउड सॉफ्ट टेक सोल्युशन्स लिमिटेडसोबतची ही भागीदारी प्रवाशांना जागतिक दर्जाच्या सेवा प्रदान करण्याच्या वचनबद्धतेशी पूर्णपणे सुसंगत आहे. प्रमुख स्थानकांवर नाविन्यपूर्ण ‘५ जी’ नेटवर्क आणि डिजिटल मनोरंजन उपलब्ध करून दिल्याने, कोकण रेल्वेच्या आधुनिकीकरणात एक महत्त्वपूर्ण पाऊल पुढे टाकले. कोकण रेल्वे प्रशासन प्रवाशांच्या सोयी वाढविण्यासाठी, पायाभूत सुविधांचे आधुनिकीकरण करण्यासाठी आणि देशाच्या डिजिटल प्रगती आणि गतिशीलता उद्दिष्टांना पाठिंबा देण्यासाठी रेल्वे मार्गात अत्याधुनिक तंत्रज्ञान लागू करण्यासाठी वचनबद्ध आहे, असे मत कोकण रेल्वे कॉर्पोरेशन लिमिटेडचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक संतोष कुमार झा यांनी सांगितले.

Comments
Add Comment

शिवसेना नेते रामदास कदम यांना मातृशोक

मुंबई : शिवसेना नेते आणि माजी मंत्री रामदास कदम यांच्या मातोश्री लीलाबाई गंगाराम कदम यांचे वृद्धापकाळाने निधन

दीड वर्षांच्या जलतरणपटू 'वॉटर बेबी' वेदाने इंडियन बुक ऑफ रेकॉर्ड वर कोरलं नाव

रत्नागिरी : वय फक्त दीड वर्ष… आणि कामगिरी थेट राष्ट्रीय स्तरावर! रत्नागिरीच्या वेदा सरफरेने देशातील सर्वात लहान

मोबाईल नेटवर्कसाठी नगरपंचायत निवडणुकीवर बहिष्कार

रत्नागिरी : महाराष्ट्रात २४६ नगरपालिका आणि ४२ नगरपंचायतींसाठी २ डिसेंबर रोजी मतदान आणि ३ डिसेंबर रोजी मतमोजणी

देवरूखच्या ‘सप्तलिंगी लाल भात’ची राष्ट्रीय बाजारात चमक

संगमेश्वर तालुक्याला मिळणार नवी ओळख देवरूख (प्रतिनिधी) : संगमेश्वर तालुक्यातील सुपीक जमीन, सप्तलिंगी नदीचे

महायुतीतर्फे रत्नागिरी जिल्ह्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लढवल्या जाणार

ना. उदय सामंत यांची घोषणा महायुतीचा अखेर सस्पेन्स संपला नगराध्यक्ष पदांच्या उमेदवारांची

महिलांना सक्षम करणे म्हणजे हिंदू राष्ट्राला सक्षम करणे : मंत्री नितेश राणे

रत्नागिरी : महिलांना सक्षम करणे म्हणजे हिंदू राष्ट्राला सक्षम करणे हा संदेश आजच्या कार्यक्रमाच्या माध्यमातून