मडगाव, रत्नागिरी, उडुपी या स्थानकांमध्ये ‘५ जी’ नेटवर्कची जोडणी

मुंबई : कोकण रेल्वेच्या प्रमुख स्थानकात आणि कोकण रेल्वेच्या अखत्यारितील रेल्वेगाड्यांमध्ये ‘५ जी’ नेटवर्क सुविधा उपलब्ध करण्यात येणार असून प्रवाशांना विनाव्यत्यय इंटरनेटचा वापर करता येणार आहे. कोकण रेल्वे कॉर्पोरेशन लिमिटेडने ब्लू क्लाउड सॉफ्टटेक सोल्युशन्स लिमिटेडसोबत प्रमुख स्थानकांमध्ये ‘५ जी’ नेटवर्कची जोडणी आणि डिजिटल मनोरंजन सेवांसाठी नुकताच नवी मुंबई येथे सामंजस्य करार केला. कोकण रेल्वेच्या मडगाव, रत्नागिरी, उडुपी या तीन रेल्वे स्थानकांमध्ये ‘५ जी’ नेटवर्कची जोडणी करण्यात येईल, तर टप्प्याटप्प्याने ब्लू क्लाउड इतर रेल्वे स्थानकांमध्ये त्यांची डिजिटल उत्पादने आणि ‘५ जी’ फिक्स्ड वायरलेस ॲक्सेस सेवा पुरवली जाईल. कोकण रेल्वेच्या अखत्यारितील रेल्वेगाड्यांमध्ये ही सेवा पुरवेल. त्यामुळे प्रवाशांना कोणत्याही अडचणीविना इंटरनेटद्वारे माहिती मिळविता येईल. ब्लू क्लाउड सॉफ्ट टेक सोल्युशन्स लिमिटेडसोबतची ही भागीदारी प्रवाशांना जागतिक दर्जाच्या सेवा प्रदान करण्याच्या वचनबद्धतेशी पूर्णपणे सुसंगत आहे. प्रमुख स्थानकांवर नाविन्यपूर्ण ‘५ जी’ नेटवर्क आणि डिजिटल मनोरंजन उपलब्ध करून दिल्याने, कोकण रेल्वेच्या आधुनिकीकरणात एक महत्त्वपूर्ण पाऊल पुढे टाकले. कोकण रेल्वे प्रशासन प्रवाशांच्या सोयी वाढविण्यासाठी, पायाभूत सुविधांचे आधुनिकीकरण करण्यासाठी आणि देशाच्या डिजिटल प्रगती आणि गतिशीलता उद्दिष्टांना पाठिंबा देण्यासाठी रेल्वे मार्गात अत्याधुनिक तंत्रज्ञान लागू करण्यासाठी वचनबद्ध आहे, असे मत कोकण रेल्वे कॉर्पोरेशन लिमिटेडचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक संतोष कुमार झा यांनी सांगितले.

Comments
Add Comment

दादर–रत्नागिरी पॅसेंजर पुन्हा सुरू करा; अन्यथा.....

मुंबई : मुंबईतील कोकणवासीयांसाठी अत्यंत महत्त्वाची असलेली दादर–रत्नागिरी पॅसेंजर ट्रेन पुन्हा पूर्ववत सुरू

'कोकण रेल्वेच्या गाड्यांना दिवा ऐवजी दादरचाच थांबा द्यावा'

खेड : रत्नागिरी - दादर या पॅसेंजर गाडीला मागील काही महिन्यांपासून दादर ऐवजी दिवा हाच शेवटचा थांबा देण्यात आला आहे.

‘अलबत्या गलबत्या’ टीमच्या गाडीचा अपघात; दोन जखमी

खेड : मुंबई-गोवा महामार्गावरील भोस्ते घाटात मंगळवारी सकाळी ‘अलबत्या गलबत्या’ नाट्यसंघाच्या गाडीला अपघात झाला.

कोकणच्या विकासासाठी निधीचा धडाका; गॅस तुटवड्याच्या अफवांवर विश्वास ठेवू नका - गृहमंत्री योगेश कदम

रत्नागिरी : गृहराज्यमंत्री योगेश कदम यांनी आज आयोजित पत्रकार परिषदेत कोकणचा विकास, गॅस पुरवठा आणि राजकीय

Ratnagiri: रत्नागिरीत भूकंपाचे धक्के, नागरिकांमध्ये भीती

रत्नागिरी: कोकणात सध्या अनेक गावात पालखी येते.त्यामुळे कोकणवासियांची कोकणात प्रचंड गर्दी जमली आहे. अनेक

सिंधुदुर्ग आणि रत्नागिरीसाठी सिंधुरत्न समृद्ध २.० योजना - राज्यात १८ अतिविशाल औद्योगिक केंद्र उभारणार

प्रत्येक जिल्ह्यात सूक्ष्म, लघु, मध्यम उद्योग केंद्र उभारणार मुंबई : सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी या दोन