सिंधुदुर्ग आणि रत्नागिरीसाठी सिंधुरत्न समृद्ध २.० योजना - राज्यात १८ अतिविशाल औद्योगिक केंद्र उभारणार

प्रत्येक जिल्ह्यात सूक्ष्म, लघु, मध्यम उद्योग केंद्र उभारणार


मुंबई : सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी या दोन जिल्ह्यांसाठी सिंधुरत्न समृद्ध योजना २.० राबविण्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अर्थसंकल्पात केली. त्याशिवाय राज्यात १८ अतिविशाल औद्योगिक केंद्र उभारण्यासह प्रत्येक जिल्ह्यात सूक्ष्म, लघु, मध्यम उद्योग केंद्र उभारणार असल्याचेही त्यांनी सांगितले.


सिंधुरत्न समृद्ध योजना ही गेली तीन वर्षे सुरू होती. ती आणखी ३ वर्षासाठी राबविणार असल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले. कोकण विभागातील साकव बांधणी, दुरुस्तीसाठी विशेष कार्यक्रम राबविणार आहोत, असेही ते म्हणाले. त्याशिवाय इन्व्हेस्ट महाराष्ट्र या एकसंध डिजिटल व्यासपीठाची निर्मिती केली जाईल. राज्यात १८ अतिविशाल औद्योगिक केंद्र उभारण्यात येतील. प्रत्येक जिल्ह्यात सूक्ष्म, लघू आणि मध्यम उद्योग केंद्र स्थापन केली जाणार असून, यातून ५० लाख रोजगारनिर्मिती होणार असल्याचे फडणवीस यांनी सांगितले.


राज्यात सूक्ष्म, लघू, मध्यम उद्योग उपक्रम आयुक्तालय, तसेच सेवा आयुक्तालय असे दोन नवे आयुक्तालय निर्माण केले जाणार आहे. रत्ने आणि आभूषणे धोरणातून १ लाख कोटींची गुंतवणूक आणि ५ लाख रोजगारनिर्मितीचे उद्दिष्ट आहे. बांबू विकास प्रकल्पांतर्गत ५० हजार कोटींची गुंतवणूक करून ५ लाख रोजगार निर्मिती करणार आहोत. औष्णिक विद्युत प्रकल्पात ५ ते ७ टक्के बांबू बायोमासच्या वापराचे उद्दिष्ट आहे. जीआयएस, एमआयएस, ब्लॉकचेन, ड्रोन इत्यादीतून बांबू मूल्यसाखळीचा विकास करणार असल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.



५० अब्ज डॉलर्सचे मिडिया टेक आणि एव्हीजीसी केंद्र


गडचिरोली स्टिल हब उभारताना, २ कोटी ६१ लाख कोटींची गुंतवणूक आणण्याचे उद्दिष्ट असल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले. या माध्यमातून ७० हजार ८९५ रोजगार निर्मिती होणार आहे. त्याशिवाय जैवविविधता संवर्धनासाठी ५ कोटी वृक्षलागवड केली जाणार आहे, असे फडणवीस म्हणाले.


- तसेच मुंबई आणि पुण्यात ५० अब्ज डॉलर्सचे मिडिया टेक आणि एव्हीजीसी केंद्र बनविणार, ३० लाखांहून अधिक रोजगार निर्मितीसाठी नवीन ४०० जीसीसी (जागतिक क्षमता केंद्र) तसेच नवउपक्रम शहरांची उभारणी करणार असल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.

Comments
Add Comment

Rupali Chakankar : अशोक खरात प्रकरणात रुपाली चाकणकरांना आता ईडीचे समन्स, दोन दिवसांपूर्वीच SIT कडून चौकशी

नाशिक : बहुचर्चित भोंदू बाबा अशोक खरातची सखोल चौकशी सुरू आहे. या प्रकरणात अनेक बड्या नेत्यांची नावे समोर आल्याने

Devendra Fadnavis : इंधन बचतीसाठी मंत्र्यांच्या विमान प्रवासाला 'ब्रेक'

मुख्यमंत्र्यांची लेखी मंजुरी बंधनकारक; पंतप्रधानांच्या आवाहनानंतर राज्य सरकारचा मोठा निर्णय मुंबई : जागतिक

NEET UG 2026 : 'नीट' पेपर फुटीचं केरळ कनेक्शन! ४२ तास आधीच फुटला होता पेपर; परीक्षा अखेर रद्द; सीबीआय करणार चौकशी

२२ लाख विद्यार्थ्यांच्या मेहनतीवर पाणी वैद्यकीय क्षेत्रात करिअर करू पाहणाऱ्या लाखो विद्यार्थ्यांसाठी एक

SRH VS GT : टॉप स्पॉटसाठी हैदराबाद विरुद्ध गुजरातमध्ये रंगणार थरारक सामना ! निकालाचा परिणाम आरसीबीवर ...

IPL 2026 : आयपीएल २०२६ मध्ये ५६ वा सामना गुजरातच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर खेळला जाणार आहे. हा सामना सनरायझर्स

Assam Himanta Biswa Sarma Oath : आसाममध्ये पुन्हा 'बिस्वा'राज! हिमंत बिस्वा सलग दुसऱ्यांदा आसामच्या मुख्यमंत्रीपदी विराजमान

गुवाहाटी : आसामच्या राजकीय इतिहासात मंगळवारी (१२ मे) एका नव्या पर्वाची नोंद झाली. विधानसभा निवडणुकीत भारतीय जनता

LPG Crisis in India: देशात किती दिवसांचा LPG आणि इंधन साठा शिल्लक

LPG Crisis in India : पुढील वर्षभर देशवासियांनी सोनं (Gold) खरेदी करू नये, तसंच पेट्रोल डिझेलचा (Petrol Diesel) वापरही कमीत कमी करावा, असं