मुंबईकर गारठले; थंडीमुळे पारा १६.२ अंशावर !

मुंबई : राज्यात मागील काही दिवसांपासून थंडीचे प्रमाण वाढले आहे. महाराष्ट्रातील अनेक भागांत हिवाळ्याची चाहूल यंदा लवकरच लागली आहे. मुंबईत नेहमी डिसेंबरमध्ये थंडी जाणवते. पण यंदा नोव्हेंबरमध्येच गारठा पडला आहे. सांताक्रूझ वेधशाळेत आज सकाळी १६.२ अंश सेल्सिअस किमान तापमान नोंदवले गेले आहे. या तापमानाने मागील अकरा वर्षांचे रेकॉर्ड तोडले आहे. याआधी राज्यात २०१६ मध्ये १६.४ किमान तापमानाची नोंद झाली होती. या काळातील नेहमीचे २१ अंशांच्या आसपासचे तापमान यंदा तब्बल पाच अंशांनी घसरल्याने शहरात थंडीचे प्रमाण वाढले आहे.


मुंबईसह इतर उपनगरांमध्येही थंडीची तीव्रता अधिक वाढली आहे. बदलापूरमध्ये तापमान ११ अंशांपर्यंत खाली गेले आहे. महाबळेश्वरसारखी थंडी या भागात जाणवत होती. सकाळपासून मुंबईत धुरकट वातावरण दिसत असून, हवेतल्या प्रदूषणामुळे AQI सुमारे १७० च्या स्तरावर पोहोचला आहे. यामुळे थंडीसोबतच हवेची गुणवत्ता खालावण्याची समस्या अधिक गंभीर झाली आहे.


यंदा नोव्हेंबरपासूनच तापमानात जलद घट होण्यामागे विविध हवामान घटक कारणीभूत आहेत. उत्तर आणि मध्य भारतातून येणारे थंड व कोरडे वारे महाराष्ट्रात प्रवेश करत असल्याने तापमान खाली येत आहे. बंगालच्या उपसागरात निर्माण झालेल्या चक्रीवादळांच्या प्रभावामुळे वातावरणातील आर्द्रता कमी झाली असून, हवेतला बाष्प जलदगतीने कमी झाल्याने थंडीची तीव्रता वाढली आहे. मान्सूनचा पूर्णत: परतावा झाल्यानेही वातावरणात बदल दिसून येत आहे. हवामान तज्ज्ञांचे म्हणणे आहे आगामी दिवसांत तापमानात आणखी घट होऊ शकते.


राज्यातील विविध शहरांमध्येही किमान तापमानात मोठी घट नोंदवली गेली आहे. सांताक्रूझमध्ये १६.२ अंश, कुलाब्यात २१.६ अंश, बदलापूरमध्ये ११ अंश, तर पुण्यात ९.४ अंश सेल्सिअस तापमान नोंदले गेले. लोणी काळभोरमध्ये तापमान ६.९ अंशांपर्यंत खाली गेले असून, हे राज्यातील सर्वात कमी तापमान ठरले आहे. राज्यभरातील या कमी तापमानामुळे नागरिकांना हिवाळ्याचा कडाका जाणवू लागला आहे.

Comments
Add Comment

महाविद्यालयीन शुल्कातील गैरप्रकारांची निवृत्त न्यायमूर्तींमार्फत चौकशी

उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांची विधानसभेत घोषणा; दोषींवर गुन्हे दाखल करण्याचे संकेत मुंबई :

'गॅस तुटवड्याविषयी सरकारने उपाययोजना कराव्यात'

मुंबई : आखाती देशांतील युद्धजन्य परिस्थितीमुळे देशासह राज्यात गॅसचा तुटवडा निर्माण झाल्याचे पडसाद बुधवारी

नागरिकांना विनासायास डिजिटल सेवा मिळण्यासाठी व्यापक धोरण तयार करा; माहिती तंत्रज्ञान मंत्री ॲड. आशिष शेलार यांचे निर्देश

मुंबई : राज्यातील सर्वसामान्य नागरिकांना शासकीय ई-सेवा आणि आधार संबंधित सेवा कोणत्याही अडथळ्याविना मिळाव्यात,

माजी सैनिक आणि भूमिहीनांच्या जमिनी वर्ग १ होणार, महसूलमंत्री बावनकुळेंची घोषणा

मुंबई : राज्यातील माजी सैनिक, भूमिहीन शेतकरी आणि शेतमजुरांना महाराष्ट्र शेत जमीन (सीलिंग) अधिनियमांतर्गत वाटप

प्रवासी आरक्षण सेवा इतके तास बंद राहणार

मुंबई : मुंबई प्रवासी आरक्षण प्रणाली (पीआरएस) दिनांक १२.०३.२०२६ रोजी २३.४५ वाजल्यापासून दिनांक १३.०३.२०२६ रोजी

एसटी प्रवाशांसाठी आनंदाची बातमी! महामंडळात १७,७४२ पदांची होणार जंगी भरती

परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांचे विधानपरिषदेत आश्वासन मुंबई : महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाचा (एसटी)