Vasai News : 'मामा माझ्याशी लग्न कर', भाचीचा तगादा जीवावर! आईच्या सख्ख्या भावासोबतचं अफेअर; लोकल ट्रेनमध्ये झालेल्या वादाचा भयावह शेवट

मुंबई : वसईतील सातवली परिसरात अपहरण झालेल्या मुलीच्या मृत्यूप्रकरणी पोलिस तपासातून धक्कादायक माहिती समोर आली आहे. भाचीसोबत प्रेमसंबंध असलेल्या मामानेच तिचा जीव घेतल्याचे निष्पन्न झाले असून आरोपी मामाला पोलिसांनी अटक केली आहे. त्याला वसई न्यायालयात हजर केले असता तीन दिवसांची पोलिस कोठडी सुनावण्यात आली. मुंबईजवळील वालीव पोलीस ठाण्याच्या हद्दीत एका तरुणीच्या बेपत्ता होण्याच्या घटनेने खळबळ उडाली आहे. या प्रकरणातील प्रेमसंबंधांचा आणि नात्याचा तपशील समोर आल्याने घटनेचे गांभीर्य वाढले आहे.



पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बेपत्ता झालेली पूजा हिचे तिच्या सख्ख्या मामासोबत गेल्या वर्षभरापासून प्रेमसंबंध होते. या अनैतिक संबंधातून पूजा मामासोबत लग्न करण्यासाठी सतत तगादा लावत असल्याचे प्राथमिक चौकशीत उघड झाले आहे. अपहरण की पलायन? या लग्नावरून दोघांमध्ये अनेक वेळा वादही झाल्याची माहिती समोर आली आहे. पूजा घरातून बेपत्ता झाल्यानंतर, १६ नोव्हेंबर रोजी तिच्या आईने वळीव पोलिस ठाण्यात अपहरणाची फिर्याद दाखल केली. पूजा घरातून अचानक बेपत्ता झाल्यामुळे कुटुंबीयांनी तिच्या सुरक्षेबाबत मोठी चिंता व्यक्त केली आहे. या गंभीर घटनेची नोंद होताच वळीव पोलिसांनी तातडीने तपास सुरू केला आहे. प्रेमसंबंध आणि त्यानंतर लग्नावरून झालेल्या वादाच्या पार्श्वभूमीवर, पोलीस या घटनेचा गांभीर्याने तपास करत असून, तरुणीचा शोध घेण्यासाठी पथके रवाना करण्यात आली आहेत.



भाईंदर-वसई दरम्यान वेगात असलेल्या लोकल ट्रेनमधून भाचीला ढकलले


पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित तरुणी, पूजा, शनिवार, १६ नोव्हेंबर रोजी आपले घर सोडून वसईच्या वालीव गावराई पाडा परिसरात सुरक्षा रक्षकाची नोकरी करणाऱ्या आपल्या मामाकडे आली होती. १७ नोव्हेंबर रोजी दुपारी मामा आणि भाची चर्चगेट–विरार फास्ट लोकलमध्ये एकत्र प्रवास करत होते. भाईंदर आणि वसई यांच्या दरम्यान गाडी वेगात असताना दोघांमध्ये लग्नावरून तीव्र वाद झाला. या वादाचा शेवट अत्यंत भयावह ठरला, आरोपी मामा याने भाचीला अचानक ट्रेनमधून ढकलून दिले. खाली पडून पूजा जागीच ठार झाली. या घटनेच्या वेळी ट्रेनमध्ये उपस्थित असलेल्या काही सावध प्रवाशांनी तत्काळ आरोपी मामाला पकडले आणि त्याला वसई रोड रेल्वे पोलिसांच्या (GRP) ताब्यात दिले. पूजा बेपत्ता असल्याने तिच्या आईने वालीव पोलिस ठाण्यात अपहरणाचा गुन्हा नोंदवला होता. त्यामुळे, रेल्वे पोलिसांनी पुढील कारवाईसाठी आरोपी मामाला वालीव पोलिसांकडे सुपूर्द केले आहे. अनैतिक संबंधातून झालेल्या वादातून घडलेल्या या क्रूर कृत्यामुळे परिसरात संतापाचे वातावरण आहे.

Comments
Add Comment

Mumbai Water Storage : मुंबईवर पाणीटंचाईचं सावट गडद: तलावांत १८.८६ टक्के साठा

मुंबई : मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या सात तलावांमध्ये सध्या केवळ १८.८६% पाणीसाठा शिल्लक आहे. त्यामुळे पाणीटंचाईची

BMC अभियंत्यांसाठी पाच दिवसांचा आठवडा ?

मुंबई : महानगरपालिकेच्या मध्यवर्ती अभियांत्रिकी विभागामध्ये पाच दिवसांचा कामकाजाचा आठवडा लागू असला तरीही

Nitesh Rane : दहशतवाद्यांचे अड्डे बनलेले मदरसे माझ्या रडारवर, मंत्री नितेश राणेंचा निर्वाणीचा इशारा

विजय मांडे, कर्जत : मदरसे दहशतवाद्यांचे अड्डे झाले आहेत. तिथे देशविरोधी गोष्टी शिकवल्या जातात. हे मदरसे माझ्या

Nashik TCS : टीसीएस प्रकरणी दानिश शेख यांचे बँक खाते सील

नाशिक : राज्यभर गाजत असलेल्या टीसीएस प्रकरणात पोलिसांनी मोठी कारवाई करत आरोपी दानिश शेख याचे बँक खाते सील केले

Kharbao Business Park : खारबाव बिझनेस पार्क'चा विस्तार

ठाणे : मुंबई महानगर प्रदेशाचा संतुलित आणि आर्थिक विकास साधण्यासाठी राज्य सरकारने एक अत्यंत मोठा निर्णय घेतला

MSRTC : ST BUS साठी उड्डाणपुलांखाली चार्जिंग स्टेशन उभारणार

मुंबई : राज्यमार्ग परिवहन महामंडळाच्या (एसटी) इलेक्ट्रिक बस अर्थात ‘लालपरी’साठी पुलांखालच्या मोकळ्या जागांचा