नितीशकुमार यांच्या मंत्रिमंडळात दोन उपमुख्यमंत्री?

भाजप आणि लोक जनशक्ती पक्षालाही मिळणार नेतृत्वाची संधी


नवी दिल्ली : राष्ट्रीय लोकशाही आघाडी बिहारमध्ये सरकार स्थापनेत व्यस्त आहे आणि तिकीट वाटपाच्या सूत्रानुसारच मंत्रीपदांचे वाटप करण्याची योजना आखत आहे. नितीशकुमार मुख्यमंत्रीपदी कायम राहतील, तर भाजप आणि लोक जनशक्ती पक्ष यांना प्रत्येकी एक उपमुख्यमंत्री मिळण्याची शक्यता आहे. भाजपला कॅबिनेट मंत्रीपदांचा सर्वाधिक वाटा मिळण्याची अपेक्षा आहे, त्यानंतर जेडी-यू व इतर लहान एनडीए मित्रपक्षांना स्थान मिळेल.


बिहार विधानसभा निवडणूक निकालात एनडीएने घवघवीत यश मिळवले असून विरोधकांचा मोठा पराभव या निवडणुकांमध्ये झाला आहे. या पार्श्वभूमीवर एकीकडे विरोधी गोटात नेमके कुठे चुकले याबाबत चर्चा-आरोप होऊ लागले असताना दुसरीकडे सत्ताधारी गोटात पुढील सरकार कसे स्थापन करावे? कुणाला काय आणि किती मिळावे? याविषयी खल होऊ लागले आहेत. सत्तेतील वाट्याबाबतची जोरदार चर्चा होत असताना भाजपमधून समसमान वाटपाचा प्रस्ताव समोर आला असून त्यावरच शिक्कामोर्तब होणार असल्याची चर्चा सुरू झाली आहे. नितीशकुमार यांच्या नेतृत्वाखालीच एनडीएचे सरकार काम करणार आहे. भाजपचे बिहारचे प्रदेशाध्यक्ष दिलीप जैस्वाल यांनी नितीशकुमार हेच मुख्यमंत्री बनणार आहेत , असे सांगत सर्व चर्चांना पूर्णविराम दिला. १८ नोव्हेंबर रोजी सकाळी १० वाजता भाजपच्या कार्यालयातील अटल सभागृहात भाजपच्या आमदारांची बैठक होणार असल्याची माहिती जैस्वाल यांनी दिली.

Comments
Add Comment

इंडिया AI इम्पॅक्ट समिट २०२६ मध्ये 'कुंभदूत' एजेंटिक AI संकल्पनेचे सादरीकरण

सिंहस्थ २०२७ पूर्वी टप्प्याटप्प्याने तंत्रज्ञानाचा उपयोग नवी दिल्ली / नाशिक : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

आता गुपचूप लग्न शक्य नाही? गुजरातमध्ये विवाह नोंदणीसाठी नवा प्रस्ताव

अहमदाबाद : गुजरातमध्ये विवाहाच्या नोंदणीत काही बदल करण्यात आले आहेत. सध्याच्या नियमांनुसार, विवाहाची नोंदणी

VIRAL VIDEO : सावधान! देवभूमीचा ट्रिप प्लॅन करताय? हा थरारक व्हिडिओ पाहून तुमचेही पाय लटपटतील!

देहराडून : उत्तराखंडमधील प्रसिद्ध सिद्धपीठ माता धारी देवी मंदिराजवळ नदीपात्रात दोन बोटींची समोरासमोर भीषण धडक

India AI Impact Summit 2026 : एआय समिटमध्ये महाराष्ट्राचा डंका! कृषी विकासासाठी 'महाॲग्री एआय' ठरणार गेमचेंजर - मुख्यमंत्री फडणवीस

नवी दिल्ली : कृषी क्षेत्रात आर्टिफिशिअल इंटेलिजन्सच्या सहाय्याने अन्न सुरक्षितता, वातावरणातील बदलाला सामोरे

Nitesh Rane : नवी दिल्लीतील ‘इंडिया एआय इम्पॅक्ट समिट’मध्ये मंत्री नितेश राणे यांचा सहभाग

मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतील 'डिजिटल इंडिया'ला आता कृत्रिम बुद्धिमत्तेची (एआय) जोड देऊन

AI Authenticity Label : एआय-निर्मित डिजिटल कंटेंटसाठी ‘ऑथेंटिसिटी लेबल’ आजपासून अनिवार्य

केंद्र सरकारने एआयच्या मदतीने तयार होणाऱ्या डिजिटल कंटेंटबाबत कडक मार्गदर्शक तत्त्वे लागू केली आहेत. १०