नितीशकुमार यांच्या मंत्रिमंडळात दोन उपमुख्यमंत्री?

भाजप आणि लोक जनशक्ती पक्षालाही मिळणार नेतृत्वाची संधी


नवी दिल्ली : राष्ट्रीय लोकशाही आघाडी बिहारमध्ये सरकार स्थापनेत व्यस्त आहे आणि तिकीट वाटपाच्या सूत्रानुसारच मंत्रीपदांचे वाटप करण्याची योजना आखत आहे. नितीशकुमार मुख्यमंत्रीपदी कायम राहतील, तर भाजप आणि लोक जनशक्ती पक्ष यांना प्रत्येकी एक उपमुख्यमंत्री मिळण्याची शक्यता आहे. भाजपला कॅबिनेट मंत्रीपदांचा सर्वाधिक वाटा मिळण्याची अपेक्षा आहे, त्यानंतर जेडी-यू व इतर लहान एनडीए मित्रपक्षांना स्थान मिळेल.


बिहार विधानसभा निवडणूक निकालात एनडीएने घवघवीत यश मिळवले असून विरोधकांचा मोठा पराभव या निवडणुकांमध्ये झाला आहे. या पार्श्वभूमीवर एकीकडे विरोधी गोटात नेमके कुठे चुकले याबाबत चर्चा-आरोप होऊ लागले असताना दुसरीकडे सत्ताधारी गोटात पुढील सरकार कसे स्थापन करावे? कुणाला काय आणि किती मिळावे? याविषयी खल होऊ लागले आहेत. सत्तेतील वाट्याबाबतची जोरदार चर्चा होत असताना भाजपमधून समसमान वाटपाचा प्रस्ताव समोर आला असून त्यावरच शिक्कामोर्तब होणार असल्याची चर्चा सुरू झाली आहे. नितीशकुमार यांच्या नेतृत्वाखालीच एनडीएचे सरकार काम करणार आहे. भाजपचे बिहारचे प्रदेशाध्यक्ष दिलीप जैस्वाल यांनी नितीशकुमार हेच मुख्यमंत्री बनणार आहेत , असे सांगत सर्व चर्चांना पूर्णविराम दिला. १८ नोव्हेंबर रोजी सकाळी १० वाजता भाजपच्या कार्यालयातील अटल सभागृहात भाजपच्या आमदारांची बैठक होणार असल्याची माहिती जैस्वाल यांनी दिली.

Comments
Add Comment

Tirupati laddu : तिरुपती लाडू भेसळ प्रकरण : सीबीआयकडून मोठा खुलासा; लाडूमध्ये 'बीफ टॅलो' किंवा प्राण्यांची चरबी नसल्याचे स्पष्ट

नेल्लोर : संपूर्ण देशाचे लक्ष लागून राहिलेल्या तिरुपती लाडू भेसळ प्रकरणात सीबीआयने (CBI) आपला अंतिम आरोपपत्र (Chargesheet)

Union Budget 2026 : १ फेब्रुवारीला देशाचा अर्थसंकल्प! काय स्वस्त, काय महाग? बजेट मध्ये यंदा काय खास? सुट्टीच्या दिवशी इथे LIVE पहा अर्थसंकल्प

नवी दिल्ली : देशाच्या आर्थिक प्रगतीचा लेखाजोखा मांडणारा 'केंद्रीय अर्थसंकल्प २०२६-२७' येत्या रविवारी, १

P. T. Usha: धावपटू पी.टी. उषा यांच्या पतीचे निधन; पंतप्रधान मोदींकडून शोक व्यक्त

प्रसिद्ध धावपटू पी. टी. उषा यांच्या पतीचे निधन झाले आहे. पी. टी. उषा यांचे पती व्ही. श्रीनिवासन यांनी वयाच्या ६७ व्या

आयुष मंत्रालयाचा झेप्टोसोबत सामंजस्य करार

आता १० मिनिटांत औषधं दारात! नवी दिल्ली : देशातील सर्वसामान्य नागरिकांना आयुष औषधं आणि वेलनेस औषधं सहज उपलब्ध

योजना केवळ कागदांवर न राहता थेट नागरिकांच्या जीवनात पोहोचाव्यात

अर्थसंकल्पापूर्वी पंतप्रधान मोदी यांनी घेतला विकासाचा आढावा नवी दिल्ली : जरी सध्या देशाचे लक्ष अर्थसंकल्पाकडे

Shashi Tharoor : 'आमच्यात सर्वकाही अलबेल',राहुल गांधी आणि मल्लिकार्जुन खरगे यांना भेटल्यानंतर शशी थरूर यांचं विधान

काँग्रेसचे ज्येष्ठ नेते शशी थरूर यांनी आज, गुरुवारी (२९ जानेवारी) पक्षाध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे आणि विरोधी