शिउबाठाला मोठे खिंडार! नाशिकच्या अद्वय हिरेंची घरवापसी, भाजपच्या मुंबईतील कार्यालयात होणार पक्षप्रवेश

नाशिक: महाराष्ट्राच्या राजकारणात आज अजून एक पक्षांतर होणार आहे. राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूक तारखा जाहीर झाल्यामुळे पक्षांतराला वेग आला आहे. याच पार्श्वभूमीवर आज ठाकरे गटाचे उपनेते अद्वय हिरे यांचे भाजपमध्ये पक्षांतर करणार असल्याचे निश्चित झाले आहे. अद्वय हिरे यांच्या भाजप एन्ट्रीमुळे ठाकरेंच्या गटाला नाशिकमध्ये खिंडार पडले आहे. हिरे यांचा पक्षप्रवेश आज  भाजपच्या मुंबईतील कार्यालयात होणार आहे.


नाशिकच्या राजकारणात हिरे कुटुंबियांचे नेहमीच वर्चस्व राहिले आहे. विशेष म्हणजे नाशिकच्या मालेगावात हिरे कुटुंबियांची ताकद जास्त आहे. त्यामुळे आगामी नगर पंचायत, नगर परिषद निवडणुकांमध्ये ठाकरेंच्या गटाचे मोठे नुकसान झाले आहे. याउलट अद्वय हिरे यांच्या पक्षप्रवेशाने भाजपची नाशिक जिल्ह्यात मोठी ताकद वाढणार आहे. अद्वय हिरेंसोबतच अपूर्व हिरे, प्रसाद हिरे, तुषार शेळके यांच्याही भाजपमध्ये पक्षप्रवेश होणार असल्याची माहिती आहे.




मुळात हिरे पहिले भाजपमध्येच होते. मात्र मधल्या काळात त्यांनी भाजपातून ठाकरे गटात प्रवेश केला होता. त्यांनी ठाकरे गटाच्या मशाल चिन्हावर विधानसभा निवडणूक लढवली होती. पण विधानसभेवेळी मंत्री दादा भुसे यांचे आव्हान त्यांच्यासमोर असल्याने त्यांचा पराभव झाला होता. तसेच भाजपचा बिहारमधील विजयसुद्धा त्यांच्या भाजप प्रवेशासाठी महत्त्वाचा ठरला असल्याची शक्यता आहे.


नगर पंचायत आणि नगर परिषद निवडणुकांसाठी अर्ज दाखल करण्याचा काल (१७ नोव्हेंबर) शेवटचा दिवस होता. आजपासून प्रत्येक पक्ष खऱ्या अर्थाने प्रचाराचा नारळ फोडणार आहे.


Comments
Add Comment

Maharashtra Pollution Control Board : उद्योग क्षेत्रातील 'लायसन्स राज'ला लगाम

- प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या संमती शुल्कात कपात; ५ ते २५ वर्षांची रक्कम एकत्रित भरण्याची सोय मुंबई : राज्यातील

Kriti Sanon Raksha Bandhan Ad : ट्रोलिंगचा दणका! क्रिती सेननला बसला मोठा धक्का; वादानंतर ब्रँडने जाहिरातच घेतली मागे

Kriti Sanon Raksha Bandhan Ad  : अभिनेत्री क्रिती सेनन रक्षाबंधनाच्या जाहिरातीमुळे सोशल मीडियावर चांगलीच ट्रोल झाली होती. तिच्या

Nepal flood news : नेपाळमध्ये ढगफुटीसदृश भीषण पूर! अनेक गावांसह हजारो नागरिक वाहून गेल्याची भीती; पॉवर प्रोजेक्ट्स, रस्ते आणि पुलांचे मोठे नुकसान

काठमांडू : हिमालयीन देश असलेल्या नेपाळमध्ये निसर्गाचा मोठा प्रकोप पाहायला मिळत आहे. तिबेटच्या सीमेला लागून

Chhattisgarh Social Boycott : एकाच गावातील ३१ जणांचा सामाजिक बहिष्कार; ७ लहान मुलांचाही समावेश, अतिक्रमणाच्या आरोपाची शिक्षा?

धमतरी : छत्तीसगडमधील धमतरी जिल्ह्यातील तर्रागोंदी गावातून धक्कादायक घटना समोर आली आहे. एका कुटुंबातील तब्बल ३१

Unique Grand Opening : नेते अन् अभिनेते सोडाच; सँडविच दुकानाच्या उद्घाटनाला आला चक्क 'रोबोट VVIP'! बाउन्सर अन् ढोल-ताशांच्या गजरात जंगी स्वागत

उज्जैन : सध्या तंत्रज्ञान इतके प्रगत झाले आहे की, रोबोट्स केवळ कारखान्यांपुरते किंवा संशोधनापुरते मर्यादित

Devendra Fadnavis : सुट्या खाद्यतेल विक्रीबाबत 'एसओपी' तयार करा! मुख्यमंत्र्यांची 'एफडीए'ला सूचना

- छोट्या व्यापाऱ्यांच्या तक्रारींची दखल घेत मध्यम मार्ग काढण्याचे निर्देश मुंबई : अन्न व औषध प्रशासनाने (एफडीए)