उमेदवारीचा पत्ता नाही, पण सोशल मीडियावर प्रचाराची धावपळ सुरू

मुंबई : मुंबई महापालिका निवडणुकीचा कार्यक्रम जानेवारीत जाहीर होण्याची शक्यता असून आरक्षण सोडत पूर्ण झाली आहे. आचारसंहिता लागू होण्यापूर्वीच अनेक इच्छुकांनी सोशल मीडियावर आपला प्रचार सुरू केला आहे. अजून पक्षाने उमेदवारी जाहीर केलेली नसतानाही स्वतःचे फोटो, व्हिडिओ आणि संदेश पोस्ट करून आपली ओळख मजबूत करण्याचा प्रयत्न अनेक जण करताना दिसत आहेत.


आचारसंहिता लागू झाल्यानंतर उमेदवारांना दररोजचा खर्चाचा तपशील निवडणूक विभागाला सादर करावा लागणार आहे. ठरलेल्या मर्यादेपेक्षा जास्त खर्च करण्यास मनाई असल्याने आचारसंहितेपूर्वी सोशल मीडिया, न्यूज चॅनल, वेब पोर्टल, बॅनर्स, होर्डिंग्ज यांसारख्या माध्यमांतून “फुकट प्रचार” करण्याकडे इच्छुक उमेदवारांचा कल वाढला आहे. काही जणांनी तर पक्षाने हिरवा कंदील दिल्याचे गृहीत धरून आधीच पोस्टर्स आणि होर्डिंग्ज बसवायला सुरुवात केली आहे.


ज्यांच्या जागा आरक्षण बदलामुळे गेल्या, त्या माजी नगरसेवकांनी आता महिला आरक्षणामुळे आपल्या पत्नींचे फोटो सोशल मीडियावर झळकवायला सुरुवात केली आहे. काहींनी तर वाढदिवस किंवा स्थानिक कार्यक्रमांचा बहाणा करूनच मतदारांना आपली तोंडओळख करून देण्याचा प्रयत्न वेगात सुरू केला आहे.


काही भागांत तर पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी आरक्षणात आपला “हक्काचा” नगरसेवक बचावला, तोच पुन्हा निवडणूक लढवणार या खात्रीने फटाके फोडून साजरे करत, भेटीगाठी घेऊन निवडणूक उत्सवाची सुरुवात करून टाकली आहे.

Comments
Add Comment

महावितरणचा 'आयपीओ' येणार - उत्पन्न वाढीसाठी मुख्यमंत्र्यांनी केली सूचना; 'कॉर्पोरेट गव्हर्नन्स' चा अंमल करणार

मुंबई : ऊर्जा क्षेत्रात कार्यरत असलेल्या बाजारपेठेचा लाभ उठवित महावितरणने आयपीओ (इनिशियल पब्लिक ऑफरिंग) आणत

Kokan Railway: कोकणकरांसाठी आनंदाची बातमी! शिमग्यासाठी धावणार खास विनाआरक्षित 'ही' ट्रेन

मुंबई : कोकणकरांसाठी महत्वाचा सण म्हणजे शिमगा, राज्याच्या कानाकोपऱ्यातून चाकरमानी आपल्या गावी शिमग्यासाठी

दहिसर नदी प्रदूषण रोखण्यासाठीच्या प्रकल्पांचे काम मार्च २०२६ पर्यंत पूर्ण होणार

मुंबई : दहिसर नदीतील वाढते प्रदूषण रोखण्यासाठी सुरू असलेल्या प्रकल्पांचे काम मार्च २०२६ पर्यंत पूर्ण होणार आहे,

घर खरेदीत फसवणूक करणाऱ्या बिल्डरांची मालमत्ता जप्त होणार

मुंबई : राज्यात आपले गृहस्वप्न साकार करू पाहणाऱ्या हजारो सर्वसामान्यांची बिल्डरांकडून होणारी फसवणूक आता राज्य

स्वातंत्र्यवीर सावरकर यांना मरणोत्तर ‘भारतरत्न’ द्या! - भाजप आमदार प्रसाद लाड यांची विधान परिषदेत मागणी

सकारात्मक निर्णय घेण्याचे संसदीय कार्यमंत्र्यांचे आश्वासन मुंबई : भारतीय स्वातंत्र्यचळवळीतील

मुंबई सेंट्र्ल रेल्वस्थानकाजवळील पुलाचे नामकरण; आता होणार 'पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर' पूल

- मुंबई सेंट्र्ल रेल्वस्थानकाजवळील पुलाच्या पुनर्बांधणी कामाचे मुख्यमंत्री यांच्या हस्ते लोकार्पण मुंबई :