बिहारमध्ये भाजप अव्वल, महाराष्ट्रासह १३ राज्यांवर भाजपची सत्ता! जाणून घ्या सविस्तर...

बिहार: बिहार विधानसभा निवडणुकीत भाजपने ८९ तर जेडीयूने ८५ जागांवर आघाडी घेतल्याने एनडीएचा दणदणीत विजय झाला. जेडीयूपेक्षा ४ जागा अधिक मिळवल्याने बिहारमध्ये भाजपचे कमळ फुलणार असून विजयाचा भगवा फडकणार यात कोणतीच शंका नाही. महाराष्ट्रात सुद्धा विधानसभा निवडणूकीत महायुती एकत्र लढली, मात्र सर्वाधिक जागा भाजपच्या होत्या. त्यामुळे भाजपने मित्रपक्षांची साथ घेतली तरी पक्ष म्हणून निवडणूकीत अव्वल ठरल्याचे नाकारता येत नाही. महाराष्ट्र आणि बिहार प्रमाणे अजून कोणत्या राज्यांमध्ये भाजपची सत्ता आहे, हे सविस्तर जाणून घेऊया...


बिहार निवडणुकीतील घवघवीत यशानंतर भाजप आणि एनडीए आता १८ राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये सत्तेत आहे. केवळ भाजपकडे लक्ष केंद्रीत केल्यास भाजपने महाराष्ट्र आणि हरियाणासह अनेक प्रमुख राज्ये राखून आणि जम्मू आणि काश्मीरसारख्या केंद्रशासित प्रदेशांमध्ये लक्षणीय यश मिळवून सर्वात लोकप्रिय राजकीय पक्ष म्हणून आपले स्थान मजबूत केले.


भाजपच्या मुख्यमंत्री पदाचे चेहरे म्हणून योगी आदित्यनाथ (उत्तर प्रदेश), हिमंता बिस्वा सरमा (आसाम), देवेंद्र फडणवीस (महाराष्ट्र), आणि पुष्करसिंग धामी (उत्तराखंड) हे भाजपचे सर्वात प्रसिद्ध आहेत. याव्यतिरिक्त दिल्ली, राजस्थान, मध्य प्रदेश, अरुणाचल प्रदेश, त्रिपुरा, गोवा, गुजरात, छत्तीसगड आणि ओडिशामध्ये भाजपचे मुख्यमंत्री आहेत. यामध्ये आता बिहारचा मुख्यमंत्री म्हणून भाजपचा चेहरा असण्याची शक्यता असू शकते.



तर आंध्र प्रदेश, ईशान्य आसाम, नागालँड आणि मेघालय या राज्यांमध्ये भाजपच्या मित्रपक्षांची सत्ता आहे. त्यामुळे भाजप आणि एनडीएने एकूण १८ जागांवर आपली लोकप्रियता सिद्ध केली आहे. यातून हे स्पष्ट होते की देशातील महत्त्वाची राज्ये ही एनडीएच्या ताब्यात आहेत.



मोदींचे आता 'बंगाल' लक्ष्य


दरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बिहारमधील विजयानंतर कार्यकर्ते आणि जनतेला संबोधित करताना म्हटले की, ‘बिहारच्या विजयाने केरळ, तामिळनाडू, पाँडेचरी आणि पश्चिम बंगालमधील भाजप कार्यकर्त्यांना नव्या ऊर्जेने भारावून टाकले आहे. गंगाही इथूनच जाते आणि बंगालला जाते. बिहारच्या विजयाने बंगालमध्ये भाजपच्या विजयाचा मार्ग मोकळा केला आहे. मी बंगालच्या नागरिकांनाही सांगतो, आता भाजप तुमच्या सोबत मिळून पश्चिम बंगालमधूनही जंगलराज उखडून फेकेल.



Comments
Add Comment

आयएनएस ‘अरिदमन’ आणि ‘तारगिरी’ नौदलात दाखल

विशाखापट्टणम : आंध्रप्रदेशच्या विशाखापट्टणम येथे आयोजित नेत्रदीपक सोहळ्यात स्वदेशी बनावटीची आयएनएस अरिदमन ही

West Bengal : पश्चिम बंगाल : मालदा हिंसाचाराच्या सूत्रधाराला अटक

कोलकाता : पश्चिम बंगालच्या मालदा जिल्ह्यातील कालियाचक इथल्या हिंसाचाराचा सूत्रधार आणि एआयएमआयएम नेते

जन विश्वास विधेयक संसदेच्या दोन्ही सभागृहात मंजूर; वाहतूक कोंडी, ड्रायव्हिंग लायसन्सच्या नूतनीकरणात होणारा विलंब हे आता गुन्हे नाहीत

नवी दिल्ली : संसदेच्या दोन्ही सभागृहांनी जन विश्वास विधेयकाला मंजुरी दिली. राष्ट्रपतींची स्वाक्षरी झाली की

संरक्षणमंत्र्यांच्या हस्ते विशाखापट्टणममध्ये अणुऊर्जेवर चालणाऱ्या पाणबुडीचे आणि स्टेल्थ फ्रिगेटचे जलावतरण

विशाखापट्टणम : संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांच्या हस्ते आज (शुक्रवार ३ एप्रिल २०२६) विशाखापट्टणममध्ये

PM Kisan Yojana 23rd Instalment: पीएम किसान योजनेचा २३ वा हप्ता 'या' महिन्यात मिळण्याची शक्यता

मुंबई: भारत हा कृषीप्रधान देश आहे. त्यामुळे लाखो लोक शेती करतात. त्यांच्यापैकी अनेकांना शेतीतून फारसे उत्पन्न

Summer Special Train: उन्हाळ्यात घरी परतणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी; मुंबई-पुणे दरम्यान २१०० हून अधिक विशेष गाड्या धावणार

मुंबई: उन्हाळ्याच्या सुट्ट्यांसाठी घरी परतण्याची योजना आखणाऱ्या प्रवाशांना दिलासा मिळाला आहे. मध्य रेल्वेने