बिहार: बिहार विधानसभा निवडणुकीत भाजपने ८९ तर जेडीयूने ८५ जागांवर आघाडी घेतल्याने एनडीएचा दणदणीत विजय झाला. जेडीयूपेक्षा ४ जागा अधिक मिळवल्याने बिहारमध्ये भाजपचे कमळ फुलणार असून विजयाचा भगवा फडकणार यात कोणतीच शंका नाही. महाराष्ट्रात सुद्धा विधानसभा निवडणूकीत महायुती एकत्र लढली, मात्र सर्वाधिक जागा भाजपच्या होत्या. त्यामुळे भाजपने मित्रपक्षांची साथ घेतली तरी पक्ष म्हणून निवडणूकीत अव्वल ठरल्याचे नाकारता येत नाही. महाराष्ट्र आणि बिहार प्रमाणे अजून कोणत्या राज्यांमध्ये भाजपची सत्ता आहे, हे सविस्तर जाणून घेऊया...
बिहार निवडणुकीतील घवघवीत यशानंतर भाजप आणि एनडीए आता १८ राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये सत्तेत आहे. केवळ भाजपकडे लक्ष केंद्रीत केल्यास भाजपने महाराष्ट्र आणि हरियाणासह अनेक प्रमुख राज्ये राखून आणि जम्मू आणि काश्मीरसारख्या केंद्रशासित प्रदेशांमध्ये लक्षणीय यश मिळवून सर्वात लोकप्रिय राजकीय पक्ष म्हणून आपले स्थान मजबूत केले.
भाजपच्या मुख्यमंत्री पदाचे चेहरे म्हणून योगी आदित्यनाथ (उत्तर प्रदेश), हिमंता बिस्वा सरमा (आसाम), देवेंद्र फडणवीस (महाराष्ट्र), आणि पुष्करसिंग धामी (उत्तराखंड) हे भाजपचे सर्वात प्रसिद्ध आहेत. याव्यतिरिक्त दिल्ली, राजस्थान, मध्य प्रदेश, अरुणाचल प्रदेश, त्रिपुरा, गोवा, गुजरात, छत्तीसगड आणि ओडिशामध्ये भाजपचे मुख्यमंत्री आहेत. यामध्ये आता बिहारचा मुख्यमंत्री म्हणून भाजपचा चेहरा असण्याची शक्यता असू शकते.
बिहार: बिहार विधानसभा निवडणुकीत भाजपने ८९ तर जेडीयूने ८५ जागांवर दणदणीत विजय मिळला. तर बिहारमधील २४३ जागांपैकी केवळ सहा जागांवर विरोधक काँग्रेसला ...
तर आंध्र प्रदेश, ईशान्य आसाम, नागालँड आणि मेघालय या राज्यांमध्ये भाजपच्या मित्रपक्षांची सत्ता आहे. त्यामुळे भाजप आणि एनडीएने एकूण १८ जागांवर आपली लोकप्रियता सिद्ध केली आहे. यातून हे स्पष्ट होते की देशातील महत्त्वाची राज्ये ही एनडीएच्या ताब्यात आहेत.
मोदींचे आता 'बंगाल' लक्ष्य
दरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बिहारमधील विजयानंतर कार्यकर्ते आणि जनतेला संबोधित करताना म्हटले की, ‘बिहारच्या विजयाने केरळ, तामिळनाडू, पाँडेचरी आणि पश्चिम बंगालमधील भाजप कार्यकर्त्यांना नव्या ऊर्जेने भारावून टाकले आहे. गंगाही इथूनच जाते आणि बंगालला जाते. बिहारच्या विजयाने बंगालमध्ये भाजपच्या विजयाचा मार्ग मोकळा केला आहे. मी बंगालच्या नागरिकांनाही सांगतो, आता भाजप तुमच्या सोबत मिळून पश्चिम बंगालमधूनही जंगलराज उखडून फेकेल.