मोदींचा विरोधकांवर थेट हल्लाबोल, येत्या काळात काँग्रेसमध्ये पडू शकते फुट?

बिहार: बिहार विधानसभा निवडणुकीत भाजपने ८९ तर जेडीयूने ८५ जागांवर दणदणीत विजय मिळला. तर बिहारमधील २४३ जागांपैकी केवळ सहा जागांवर विरोधक काँग्रेसला मिळाल्याने त्यांचा दारूण पराभव झाला. त्यामुळे बिहारमध्ये आता एनडीएचे सरकार स्थापन होणार यात विरोधकांनाही तीळमात्र शंका नसावी. दरम्यान बिहारच्या निवडणूक निकालानंतर पंतप्रधानांनी जनतेशी संवाद साधला. यावेळी पंतप्रधान मोदींनी काँग्रेसवर जोरदार हल्लाबोल केला आहे. तसेच, येणाऱ्या काळात काँग्रेसमध्ये मोठी फूट पडेल असे मोठे भाकीत देखील त्यांनी केले.



मोदींचे काँग्रेसबाबत मोठी भाकीत


मोदी आपल्या भाषणात म्हणाले, बिहारमध्ये भाजपने जितक्या जागा जिंकल्या, तितक्या जागा काँग्रेस गेल्या सहा राज्यांच्या विधानसभा निवडणुकांमध्ये मिळून जिंकू शकलेली नाही. काँग्रेसच्या राजकारणाचा आधार आता फक्त नकारात्मक राजकारण झाला आहे. कधी चौकीदार चोर है चा नारा, संसदेचा वेळ वाया घालवणे, प्रत्येक संस्थेवर हल्ला करणे, कधी ईव्हीएमवर प्रश्न, कधी निवडणूक आयोगाला शिवीगाळ, कधी मतचोरीचा आरोप, देशाच्या शत्रूंचा अजेंडा पुढे आणणं यामुळे काँग्रेसकडे देशासाठी कोणताही सकारात्मक दृष्टीकोन नाहीये. तसेच, आज काँग्रेस 'मुस्लीम लीगी माओवादी काँग्रेस' अर्थात एमएमसी बनली आहे. काँग्रेसचा संपूर्ण अजेंडा याच गोष्टींवर चालतो. त्यामुळेच काँग्रेसमध्येदेखील एक वेगळा प्रवाह तयार होतोय. जो या नकारात्मक धोरणाच्या विरोधी आहे. त्यामुळे कदाचित येत्या काळात काँग्रेसमध्ये फुट पडू शकते, अशी टीका मोदींनी केली आहे.







काँग्रेसच्या मित्र पक्षांनाही सावध राहा


काँग्रेसच्या मित्र पक्षांनाही कळतंय की काँग्रेस त्यांच्या निगेटिव्ह पॉलिटिक्समध्ये सर्वांना घेऊन डुबत आहे. त्यामुळेच मी बिहार निवडणुकीत सांगितले होते की, काँग्रेसचे नामदार तलावात डुबकी मारून बिहार निवडणुकीत स्वत डुबण्याची आणि इतरांना डुबवण्याचा सराव करत आहेत. मी आधीही या मंचावरून काँग्रेसच्या साथीदारांना सावधान केले होते. काँग्रेस ही परजीवी आहे. ते आपल्या सहकाऱ्यांची मत बँक घेऊन पुनरागमन करण्याच्या प्रयत्नात आहे. त्यामुळे काँग्रेसच्या मित्रपक्षांनी त्यांच्यापासून सावध राहिले पाहिजे, असा हल्लाबोल यावेळी नरेंद्र मोदी यांनी केला.




विकास विरोधी लोकांना जनतेने उत्तर दिले आहे


बिहारचा निकाल हा घराणेशाहीतल्या लोकांना जनतेने दिलेलं उत्तर आहे. भारताच्या विकासात बिहारच्या लोकांचा सिंहाचा वाटा आहे. पण ज्या लोकांनी सहा दशके देशाची सत्ता उपभोगली त्यांनी बिहारला बदनाम केले. बिहारच्या गौरवशाही इतिहासाचा सन्मान काँग्रेसने केला नाही. तसेच बिहारच्या लोकांच्या अपमान केला.

Comments
Add Comment

West Bengal Earthquake : पश्चिम बंगालमध्ये भूकंपाचे धक्के; सिलीगुडी, कूचबिहार हादरले, रिक्टर स्केलवर ५.६ तीव्रतेची नोंद

कोलकाता : पश्चिम बंगाल (West Bengal) मध्ये रविवारी रात्री भूकंपाचे (Earthquake) तीव्र धक्के जाणवले. सिलीगुडी (Siliguri) आणि कूचबिहार (Cooch

Narendra Modi : सार्वजनिक वाहतुकीचा वापर करा, मोदींचे आवाहन

नवी दिल्ली : पश्चिम आशियातील वाढता संघर्ष, ऊर्जा बाजारातील चढ-उतार आणि जागतिक आर्थिक अनिश्चिततेच्या

NEET-UG 2026 Re-Exam : नीट यूजी २०२६ पुनर्परीक्षेची शहर सूचना स्लिप neet.nta.nic.in वर उपलब्ध

नवी दिल्ली : नॅशनल टेस्टिंग एजन्सीने (NTA) रविवार २१ जून २०२६ रोजी होणार असलेल्या नीट यूजी २०२६ पुनर्परीक्षेची शहर

CRIME : नवांशहर हादरले! बेपत्ता राधिकाची निर्घृण हत्या; ब्रीफकेसमध्ये मृतदेह भरून जंगलात जाळला

NAWANSHAHR DISTRICT PUNJAB : गेल्या चार-पाच दिवसांपासून बेपत्ता असलेल्या १५ वर्षीय राधिका या दहावीच्या विद्यार्थिनीचा अखेर

Rules For Edible Oil:  खाद्यतेल विक्रीचे नियम बदलणार! केंद्राचा मोठा निर्णय, आता फक्त ९ पॅक साइजमध्येच मिळणार तेल

सर्वसामान्य ग्राहकांची दिशाभूल रोखण्यासाठी आणि बाजारपेठेत अधिक पारदर्शकता आणण्यासाठी केंद्र सरकारने

हजारांच्या पगारापासून कोट्यवधींची संपत्ती? ओडिशातील अभियंत्याच्या ठिकाणी छापे, २ कोटींची रोकड जप्त

ओडिशामध्ये (odisha) भ्रष्टाचाराविरोधात (Corruption) मोठी कारवाई करत लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (Anti-Corruption Bureau) एका सरकारी