‘मी संसार माझा ...’ मालिकेतून सुरू होणार अनुप्रियाची गोष्ट

‘सन मराठी’वर ‘मी संसार माझा रेखिते’ या मालिकेचा प्रोमो पाहताच प्रेक्षकांची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. संपूर्ण कुटुंबाची काळजी घेणारी, कोणतीच अपेक्षा न ठेवता नात्यांना जपणारी अनुप्रिया १ डिसेंबर पासून रोज रात्री ९:३० वाजता प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. प्रोमोमध्ये उत्कृष्ट कलाकारांची  मांदियाळी पाहायला मिळत आहे. मुख्य अभिनेत्री दीप्ती केतकरसह, हरीश दुधाडे, आभा बोडस, संजीवनी जाधव, प्रणिता आचरेकर, संदीप गायकवाड आणि दीप्ती सोनावणे मालिकेची रंगत वाढवण्यासाठी सज्ज आहेत. मालिकेचा विषय प्रत्येक गृहिणीला आपलसं करून घेणारा आहे. याचसह मालिकेत मायलेकीचं घट्ट नातं पाहायला मिळतंय. 'जोडायचं ठरवलं तर सगळं जोडता येतं' या सुंदर तत्त्वावर मालिका आधारित आहे.


मालिकेत अनुप्रिया ही मुख्य भूमिका साकारणाऱ्या अभिनेत्री दीप्ती केतकर भूमिकेविषयी सांगताना म्हणाल्या की, "मी या मालिकेसाठी खूप उत्सुक आहे. काही काळ मी अश्याच भूमिकेची वाट पाहत होते. या मालिकेतील अनुप्रिया अगदी तशीच आहे. स्वतःच्या कुटुंबावर असलेलं प्रेम, त्यांची काळजी या सगळ्यात अनुप्रिया तिची स्वप्नं बाजूला ठेवून कुटुंबासाठी प्रत्येक गोष्ट आवडीने करते. या गोष्टीचा तिला कुठेच त्रास होत नाही. अनुप्रिया आणि माझ्यात एकच फरक आहे की, मला माझ्या कुटुंबाचा पूर्ण पाठिंबा आहे. अनुप्रियाच्या बाबतीत तसं नाहीये. या मालिकेसाठी माझ्या सासूबाई, नवरा व मुलगी माझ्यापेक्षा जास्त खूश आहेत. सासूबाईंनी मला ठणकावून सांगितलं आहे की, आता पूर्णपणे कामाकडे लक्ष दे आमची काळजी करू नकोस."


या पुढे दीप्ती केतकर म्हणाल्या की, "माझ्यासाठी मुलीकडून "आई तू खूप छान काम करते" हे वाक्य ऐकणं कोणत्याही अॅवॉर्डपेक्षा मोठं आहे. मालिकेत अनुप्रियाची मुलगीही तिच्या मागे खंबीर उभी असते. ही मालिका प्रत्येक गृहिणीला आपलीशी वाटेल ही खात्री आहे. प्रत्येक मालिकेनंतर मी कुटुंबासाठी ब्रेक घेत असते, पण आता मी थांबणार नाही. प्रेक्षकांना इतकंच सांगेन की, अनुप्रियाला भरभरून प्रेम व आशीर्वाद द्या."

Comments
Add Comment

‘मी अश्वत्थामा चिरंजीव’ नाटकामुळे वेगळीच अनुभूती

  टर्निंग पॉइंट-युवराज अवसरमल    मी अश्वत्थामा चिरंजीव’ नाटकामध्ये अश्वत्थामाचा ज्वलंत जीवनपट

एका रंगकर्मीची 'विठ्ठल वारी'...

राजरंग-राज चिंचणकर   पंढरीच्या वारीत असंख्य वारकरी सामील होत आषाढी एकादशीला विठुरायाच्या चरणी लीन होतात. या

उजळमाथ्याने फिरणाऱ्या प्रत्येक गॉसिपकारास...!

भालचंद्र कुबल-पाचवा वेद   नाटक उजळवणाऱ्या प्रत्येक प्रकाशयोजनाकारास मी नेहमी पहिलं वाक्य ऐकवतो, "रिस्पेक्ट

भारतातील पहिले एआय-आधारित तिकीट बुकिंग व्यासपीठ ‘थम्पएन’ सुरू

देशातील लाइव्ह मनोरंजन क्षेत्रासाठी कृत्रिम बुद्धिमत्तेवर (एआय) आधारित पहिले डिस्कव्हरी आणि तिकीट बुकिंग

रंगभूमी आणि बदलता विनोद...

मराठी नाट्यक्षेत्रात सुरू झालेला 'नाट्य निरंतर' हा उपक्रम अल्पावधीतच रसिकांच्या पसंतीस उतरत असल्याचे दिसून येत

आसमंताच्या रंगमंचावरचे 'आषाढ नाट्य'

राजरंग-राज चिंचणकर आषाढ महिन्याची चाहूल लागली की कवी कुलगुरू कालिदासाने 'मेघदूत' या महाकाव्यात वर्णन केलेल्या