“२५ वर्षे मुंबई महापालिका लुटली” अमित साटमांचा ठाकरेंवर अप्रत्यक्ष वार


मुंबई : बिहार विधानसभा निवडणुकीत घवघवीत यश मिळाल्यानंतर भाजपचा आत्मविश्वास आणखी वाढला असून आता पक्षाने थेट मुंबई महापालिका निवडणुकांकडे मोर्चा वळवला आहे. “बिहारमध्ये दिसले ते फक्त झलक होती, खरी लढाई मुंबईत आहे,” अशा शब्दांत मुंबई भाजप अध्यक्ष अमित साटम यांनी निवडणूक रणधुमाळीची सुरुवात केली. यावेळी त्यांनी ठाकरे बंधूवर जोरदार टीका केली.


साटम म्हणाले की, मुंबईकरांच्या पैशावर डल्ला मारणे, संपत्तीची लूट करणे आणि महापालिकेचा गैरवापर करणे, हे गेल्या गेल्या २५ वर्षांत सत्ताधाऱ्यांचे काम होते. “महापालिकेवर राज्य करणारे हे डाकू आहेत,” असा थेट आरोप करत त्यांनी नाव न घेता ठाकरे कुटुंबावर हल्ला चढवला. त्यांनी स्पष्ट केलं की, “मुंबई महापालिका ही कोणाच्याही घराण्याची जागीर नाही; मुंबईकरांची सेवा करण्यासाठी ही व्यवस्था आहे,” असे ते म्हणाले.


राहुल गांधी व आदित्यवरही टीका


बिहारमधील विजयाबद्दल बोलताना साटम म्हणाले, “विरोधक पराभव झाला की वोटचोरी म्हणतात आणि जिंकले की लोकशाही आठवते. बिहारने दाखवून दिलं की देशाचा ‘पप्पू’ कोण.” त्यांनी पुढे महाराष्ट्रातील परिस्थितीवर भाष्य करत, “महाराष्ट्राचा पप्पू कोण आहे हे सांगायची गरज नाही. लवकरच त्यांनाही धडा शिकवू,” असे म्हटले, आणि नाव न घेता आदित्य ठाकरेंवर निशाणा साधला. “कोण कोणासोबत येतंय यापेक्षा ११ वर्षांत मुंबईचा विकास कोणी केला, बीडीडी चाळ पुनर्विकासांतून ५५० चौ.फु. घर कोण देतंय, आणि मराठी भाषेला अभिजात दर्जा कोणी मिळवून दिला, हे अधिक महत्त्वाचं,” असे त्यांनी आपल्या भाषणात सांगितले.


Comments
Add Comment

नागपूर येथील भारतीय व्यवस्थापन संस्थेला इन्क्यूबेशन सेंटर म्हणून मान्यता

मुंबई: विदर्भातील नवउद्योग (स्टार्टअप) परिसंस्था अधिक सक्षम करण्याच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण पाऊल उचलत,

नमो शेतकरी महासन्मान निधीचा ८ वा हप्ता पुढील आठवड्यात शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार; कृषीमंत्र्यांनी दिली माहिती

मुंबई: राज्यातील लाखो शेतकऱ्यांना आर्थिक दिलासा देणारा महत्त्वपूर्ण निर्णय राज्य शासनाने घेतला असून, नमो

‘महाराष्ट्र धर्मस्वातंत्र्य विधेयक’ विधानपरिषदेत मंजूर

मुंबई: महाराष्ट्रात गेल्या काही काळापासून चर्चेत असलेले आणि अत्यंत कडक तरतुदी असलेले ‘महाराष्ट्र

सिंधुदुर्गच्या विकासाला बुस्टर; राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत १०० टक्के 'व्हिजीएफ'ला मंजुरी

मुंबई: सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या पर्यटनाला आणि अर्थव्यवस्थेला मोठी गती देणारा निर्णय मंगळवारी राज्य

नंदूरबार,छत्रपती संभाजीनगरमधील गैरव्यवहारासाठी 'एसआयटी स्थापन; महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांची विधान परिषदेत घोषणा

​मुंबई: नंदूरबार जिल्ह्यातील नवापूर येथील भूसंपादन गैरव्यवहार आणि छत्रपती संभाजीनगरमधील ब्रिजवाडी येथील ५४

मुंबईचा पश्चिम आणि पूर्व द्रुतगती महामार्ग पावसाळ्यापूर्वी समतल करा; उपमहापौरांची आयुक्तांकडे निवेदनाद्वारे मागणी

मुंबई: मुंबई महानगरातील रस्त्यांची स्थिती अधिक सुधारण्यासाठी पश्चिम व पूर्व द्रुतगती महामार्ग तसेच प्रमुख