एक कोटी लाडक्या बहिणींकडून केवायसी पूर्ण

मुंबई : मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या सर्व लाभार्थी महिलांना ई केवायसी प्रक्रिया १८ नोव्हेंबरपर्यंत पूर्ण करायची आहे. ही ई केवायसी पूर्ण करण्यासाठी आता ५ दिवसांचा वेळ शिल्लक राहिला आहे. लाडकी बहीण योजना महिला व बालविकास विभागाकडून जुलै २०२४ पासून राबवली जाते. दररोज चार ते पाच लाख महिलांची ई केवायसी प्रक्रिया ही साईटवर पूर्ण होत आहे. गुरुवारपर्यंत १ कोटी महिलांची ई केवायसी पूर्ण झाली असल्याची माहिती तटकरे यांनी दिली.


मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या वेबसाईटवर ई केवायसी प्रक्रिया सुरू झाल्यानंतर ज्या महिला एकल आहेत किंवा ज्या महिलांच्या वडिलांचे आणि पतीचे निधन झाले आहे. ज्या महिला घटस्फोटित आहेत, अशा महिलांना ई केवायसी प्रक्रिया करता येत नव्हती. अखेर महिला व बालविकास विभागाने त्याची दखल घेतली आहे. आदिती तटकरे यांनी अशा महिलांसाठी वेबसाईटमध्ये तांत्रिक बदल करणार असल्याचे सांगितले आहे.

Comments
Add Comment

डिजिटल व्यवसाय आणि उद्योजकता

करिअर : सुरेश वांदिले डिजिटल व्यवसाय आणि उद्योजकता विषयातील बॅचलर ऑफ बिझनेस अॅडमिनिस्ट्रेशन (बीबीए-डीबीइ) हा

Bihar Vidhan Sabha Election Result : बिहार विधानसभा मतमोजणीला लवकरच सुरुवात; नवे सरकार आज स्थापन होण्याच्या दिशेने पहिले पाऊल...

नवी दिल्ली : बिहार विधानसभा निवडणुकीसाठीचे मतदान नुकतेच पार पडले असून, आज, निकालाचा 'महादिवस' आहे. आज या निवडणुकीचे

महिलांच्या वाढलेल्या विक्रमी मतदानामुळे एनडीएचे पारडे जड?

निवडणुकीची आज मतमोजणी व निकाल मुंबई : गेल्या अनेक दिवसांपासून बिहार विधानसभा निवडणुकीची देशभरात चर्चा होती. ही

मुंबई अग्निशमन दलाच्या अधिकाऱ्यांसह जवानांना पूरपरिस्थितीत बचावाचे प्रशिक्षण, ऍडवॉन्स फ्लड आणि रेस्क्यू प्रशिक्षणाकरता नेमली संस्था

पाण्यात आणि उंचावर अडकलेल्यांना अत्याधुनिक पध्दतीने वाचवण्यासाठी करणार प्रशिक्षित मुंबई (खास प्रतिनिधी):

पवई तलावातील जलपर्णी वाढता वाढता वाढे, कंत्राटदाराला मिळाला १ कोटी रुपयांचा बोनस

मुंबई (सचिन धानजी): मुंबईतील पवई तलावातील पाण्याच्या पृष्ठभागावरील जलपर्णी वनस्पती, तरंगणा-या तसेच जमिनीतून

मुंबईतील २७ टक्केच नागरिक साखरेपासून राहतात लांब, व्यायामचा अभाव आणि चुकीचा आहारामुळे असंसर्गजन्य आजारांना दिले जाते निमंत्रण

मुंबई (खास प्रतिनिधी): मुंबई महानगरपालिकेतील २४ प्रशासकीय विभागांमध्ये जानेवारी २०२५ पासून 'मीठ - साखर अभियान