शिउबाठाचा माजी आमदार शिवसेनेत, 'स्थानिक'च्या निवडणुकीआधीच उद्धव ठाकरेंना धक्का

कोल्हापूर: विधानसभा निवडणुकीत शिवसेना पक्ष आणि ठाकरे गटाच्या उमेदवारांमध्ये जोरदार लढती झाल्या. मात्र, शिंदेंनी बाजी मारत ५७ आमदार निवडून आणले आहेत. त्यामुळे, आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांपूर्वी सत्तेत असलेल्या शिवसेना पक्षामध्ये जोरदार इनकमिंग चालू असल्याचे दिसून येत आहे. यामध्ये आता ठाकरेंच्या गटातील कोल्हापूर जिल्ह्यातील मोठा आणि अनुभवी नेता शिंदेंच्या गळाला लागला आहे.



विधानसभा निवडणुकीत कोल्हापूरात ठाकरे गटाच्या वाट्याला केवळ दोन जागा आल्याने ठाकरेंच्या कार्यकर्त्यांमध्ये नाराजी होती. तर, शिरोळमधील ठाकरे गटाचे माजी आमदार उल्हास पाटील हे स्वाभिमानी शेतकरी संघटनेत परतले होते. आता, नगरपालिका, महापालिका निवडणुकांपूर्वी त्यांनी शिंदेंच्या शिवसेनेचा भगवा हाती घेतला आहे. त्यामुळे, कोल्हापूर जिल्ह्यात शिवसेना शिंदे गटाच्या गळाला मोठा नेता लागल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे.




ठाकरे गटाचे आमदार राहिलेले उल्हास पाटील यांनी आता शिवसेना शिंदे गटात प्रवेश केला. २०२४ साली उल्हास पाटील शिवसेनेकडून शिरोळचे आमदार म्हणून निवडून आले होते. त्यानंतर २०२४ सालची विधानसभा निवडणूक त्यांनी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या चिन्हावर लढवली. मात्र, त्यांना पराभव पत्कारावा लागला असल्याने त्यांनी शिवसेनेची वाट धरली आहे.

Comments
Add Comment

कोकणातील आंबा-काजू उत्पादक शेतकऱ्यांना अधिवेशन संपण्यापूर्वीच मुख्यमंत्री नुकसानभरपाई जाहीर करणार

मुंबई : कोकणातील आंबा व काजू पिकांच्या विविध प्रश्नांसंदर्भात आज विधान भवन, मुंबई येथे आदरणीय मुख्यमंत्री

धर्मांतर विरोधी विधेयकात घुमला २००४ चा आवाज, डॉ. नीलम गोऱ्हेंनी सभागृहात जागवल्या जुन्या आठवणी

मुंबई: महाराष्ट्रात प्रलोभन किंवा बळजबरीने होणाऱ्या धर्मांतराच्या समस्येला आळा घालण्यासाठी आज विधान परिषदेत

धर्मस्वातंत्र्य कायद्यामुळे आमिष, बळजबरी करणाऱ्यांचे कंबरडे मोडणार!

मुंबई : राज्यातील १४ कोटी जनतेच्या सुरक्षिततेसाठी आणि बळजबरीने होणाऱ्या धर्मांतराच्या प्रकारांना आळा

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी घेतली पंतप्रधान मोदींची भेट; देशस्थिती, महाराष्ट्रातील प्रश्नांवर सखोल चर्चा

नवी दिल्ली : राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज म्हणजेच मंगळवार १७ मार्च रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी

थकबाकीदार शेतकऱ्यांना दिलासा; सप्टेंबर २०२५ पर्यंतच्या कर्जाला मिळणार माफी!

सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांचे विधान परिषदेत आश्वासन मुंबई : जळगाव जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या कर्ज

छत्रपती शिवरायांच्या अपमानावर संजय राऊत गप्प का ?

मुंबई : धर्मांध आक्रमकांचा उदोउदो करण्याची सवय जडलेल्या आणि मुस्लीमांचे तुष्टीकरण करणा-या संजय राऊतांनी