शिउबाठाचा माजी आमदार शिवसेनेत, 'स्थानिक'च्या निवडणुकीआधीच उद्धव ठाकरेंना धक्का

कोल्हापूर: विधानसभा निवडणुकीत शिवसेना पक्ष आणि ठाकरे गटाच्या उमेदवारांमध्ये जोरदार लढती झाल्या. मात्र, शिंदेंनी बाजी मारत ५७ आमदार निवडून आणले आहेत. त्यामुळे, आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांपूर्वी सत्तेत असलेल्या शिवसेना पक्षामध्ये जोरदार इनकमिंग चालू असल्याचे दिसून येत आहे. यामध्ये आता ठाकरेंच्या गटातील कोल्हापूर जिल्ह्यातील मोठा आणि अनुभवी नेता शिंदेंच्या गळाला लागला आहे.



विधानसभा निवडणुकीत कोल्हापूरात ठाकरे गटाच्या वाट्याला केवळ दोन जागा आल्याने ठाकरेंच्या कार्यकर्त्यांमध्ये नाराजी होती. तर, शिरोळमधील ठाकरे गटाचे माजी आमदार उल्हास पाटील हे स्वाभिमानी शेतकरी संघटनेत परतले होते. आता, नगरपालिका, महापालिका निवडणुकांपूर्वी त्यांनी शिंदेंच्या शिवसेनेचा भगवा हाती घेतला आहे. त्यामुळे, कोल्हापूर जिल्ह्यात शिवसेना शिंदे गटाच्या गळाला मोठा नेता लागल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे.




ठाकरे गटाचे आमदार राहिलेले उल्हास पाटील यांनी आता शिवसेना शिंदे गटात प्रवेश केला. २०२४ साली उल्हास पाटील शिवसेनेकडून शिरोळचे आमदार म्हणून निवडून आले होते. त्यानंतर २०२४ सालची विधानसभा निवडणूक त्यांनी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या चिन्हावर लढवली. मात्र, त्यांना पराभव पत्कारावा लागला असल्याने त्यांनी शिवसेनेची वाट धरली आहे.

Comments
Add Comment

उद्धव ठाकरेंनी मराठी माणसासाठी केलेले एक काम संजय राऊतांनी दाखवावे

भाजपा माध्यम विभाग प्रमुख नवनाथ बन यांचे थेट आव्हान उद्धव ठाकरे आणि उबाटा गट यांनी मराठी माणसाच्या हितासाठी काय

१६ जानेवारीला आपण अटलजींना खरी आदरांजली द्यायची आहे" : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

मुंबई : आज संपूर्ण देशभरात अटलबिहारी वाजपेयी यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी केली जात आहे. या निमित्त भाजपा

बहुप्रतिक्षित नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावरून आजपासून उड्डाणे!

नवी मुंबई : बहुप्रतिक्षित नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ गुरुवारपासून म्हणजेच २५ डिसेंबर २०२५ रोजी अधिकृतपणे

काँग्रेसचे ज्येष्ठ नेते माजी मंत्री सुरुपसिंग नाईक यांचे निधन

नंदुरबार : काँग्रेसचे ज्येष्ठ नेते माजी मंत्री आणि माजी खासदार सुरुपसिंग नाईक यांचे ८८ व्या वर्षी निधन झाले.

महापालिका निवडणुकीसाठी शिवसेनेच्या स्टार प्रचारकांची यादी जाहीर

मुंबई : मुंबईसह महाराष्ट्रातील २९ महापालिकांसाठी १५ मे रोजी मतदान आणि १६ मे रोजी मतमोजणी होणार आहे. या

ठाकरे बंधूंची युती होताच भाजपने दिला मोठा दणका

मुंबई : महाराष्ट्रातील मुंबईसह २९ महापालिकांसाठी राज्य निवडणूक आयोगाने निवडणूक कार्यक्रम जाहीर केला आहे. या