अजित पवारांवर आली नामुष्की, स्वप्न अपूर्णच राहिले


पाटणा : आधी राष्ट्रीय पक्ष असलेला राष्ट्रवादी काँग्रेस मोदींच्या नेतृत्वात भाजपचा प्रभाव वाढल्यामुळे प्रादेशिक पक्ष झाला. आता पंतप्रधान मोदींच्या मार्गदर्शनात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात राष्ट्रवादी काँग्रेस प्रादेशिक पक्ष म्हणून कार्यरत आहे. अजित पवार राष्ट्रवादीला पुन्हा एकदा राष्ट्रीय पक्ष हा दर्जा मिळवून देण्यासाठी प्रयत्न करत आहे. याच प्रयत्नांचा भाग म्हणून महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष अजित पवार यांनी विविध राज्यांच्या विधानसभा निवडणुका लढवण्याचा निर्णय घेतला. यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसने बिहार विधानसभेच्या १४ जागांवर उमेदवार उभे केले. पण या सर्व उमेदवारांचा पराभव झाला. बिहारमध्ये झालेल्या पराभवामुळे राष्ट्रीय पक्ष होण्याचे अजित पवारांचे स्वप्न अपूर्णच राहिले. तांत्रिकदृष्ट्या आजही राष्ट्रवादी काँग्रेस प्रादेशिक पक्ष म्हणून कार्यरत आहे.


नारकटियागंज, नौटन, पिंप्रा, मनिहारी, पारसा, सोनेपूर, महुआ, राघोपूर, बाखरी, अमरपूर, पाटना साहिब, मोहानिया, सासाराम, दिनारा या मतदारसंघात राष्ट्रवादीनं उमेदवार दिले होते. यातील एकाही उमेदवाराला छाप पाडता आलेली नाही. महाराष्ट्रात राष्ट्रवादी काँग्रेसची कामगिरी चांगली आहे. पण राज्याबाहेर राष्ट्रवादी काँग्रेसला अपेक्षित यश मिळवणे जमलेले नाही. आता बिहारमधील दारुण पराभवामुळे राष्ट्रीय पक्ष होण्याच्या अजित पवारांच्या स्वप्नांना पुन्हा सुरुंग लागला आहे.


Comments
Add Comment

केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांचे मुंबई विमानतळावर आगमन; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले स्वागत

मुंबई : केंद्रीय गृह आणि सहकार मंत्री अमित शाह यांचे आज छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ, मुंबई येथे

Mumbai Local News : लोकलमध्ये महिलेला मारहाण करणाऱ्या पुरुषाला १२ तासांत अटक

मुंबई : लोकलमध्ये महिलेला मारहाण करत असलेल्या पुरुषाचा व्हिडीओ व्हायरल झाला. हा व्हिडीओ व्हायरल होताच अवघ्या १२

Jalna : कॉलेजचा स्लॅब कोसळून एकाचा मृत्यू आणि चौघे जखमी

जालना : जालना जिल्ह्यातील भोकरदनमध्ये एका कॉलेजच्या नव्या इमारतीचे बांधकाम सुरू आहे. हे बांधकाम सुरू असताना

Weather changes in Maharashtra : महाराष्ट्रात पुन्हा बदलले हवामान; शनिवारी अनेक भागांत पावसाचा अंदाज, ७ जिल्ह्यांना यलो अलर्ट जारी!

मुंबई : महाराष्ट्रामध्ये मान्सूनचे वारे पुन्हा एकदा सक्रिय झाले असून, राज्याच्या विविध भागांत पावसाचा जोर

Boss Scam : अधिकारी बनून पैशांची मागणी; 'बॉस स्कॅम'पासून सावधान राहण्याचे केंद्राचे आवाहन

नवी दिल्ली : व्हॉट्सॲप, ई-मेल किंवा इतर संदेशवहन माध्यमांचा वापर करून आर्थिक फसवणूक करणाऱ्या सायबर

New IT Rules : सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्ससाठी नवीन आयटी नियम कठोर, आक्षेपार्ह मजकूर हटवण्याची मुदत २४ तासांवरून थेट २ तासांवर

नवी दिल्ली : केंद्र सरकारने सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्ससाठी आक्षेपार्ह आणि संवेदनशील मजकूर हटवण्याच्या मुदतीत