अजित पवारांवर आली नामुष्की, स्वप्न अपूर्णच राहिले


पाटणा : आधी राष्ट्रीय पक्ष असलेला राष्ट्रवादी काँग्रेस मोदींच्या नेतृत्वात भाजपचा प्रभाव वाढल्यामुळे प्रादेशिक पक्ष झाला. आता पंतप्रधान मोदींच्या मार्गदर्शनात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात राष्ट्रवादी काँग्रेस प्रादेशिक पक्ष म्हणून कार्यरत आहे. अजित पवार राष्ट्रवादीला पुन्हा एकदा राष्ट्रीय पक्ष हा दर्जा मिळवून देण्यासाठी प्रयत्न करत आहे. याच प्रयत्नांचा भाग म्हणून महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष अजित पवार यांनी विविध राज्यांच्या विधानसभा निवडणुका लढवण्याचा निर्णय घेतला. यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसने बिहार विधानसभेच्या १४ जागांवर उमेदवार उभे केले. पण या सर्व उमेदवारांचा पराभव झाला. बिहारमध्ये झालेल्या पराभवामुळे राष्ट्रीय पक्ष होण्याचे अजित पवारांचे स्वप्न अपूर्णच राहिले. तांत्रिकदृष्ट्या आजही राष्ट्रवादी काँग्रेस प्रादेशिक पक्ष म्हणून कार्यरत आहे.


नारकटियागंज, नौटन, पिंप्रा, मनिहारी, पारसा, सोनेपूर, महुआ, राघोपूर, बाखरी, अमरपूर, पाटना साहिब, मोहानिया, सासाराम, दिनारा या मतदारसंघात राष्ट्रवादीनं उमेदवार दिले होते. यातील एकाही उमेदवाराला छाप पाडता आलेली नाही. महाराष्ट्रात राष्ट्रवादी काँग्रेसची कामगिरी चांगली आहे. पण राज्याबाहेर राष्ट्रवादी काँग्रेसला अपेक्षित यश मिळवणे जमलेले नाही. आता बिहारमधील दारुण पराभवामुळे राष्ट्रीय पक्ष होण्याच्या अजित पवारांच्या स्वप्नांना पुन्हा सुरुंग लागला आहे.


Comments
Add Comment

Contaminated Water In Mantralaya : दूषित पाण्यामुळे मंत्रालयातील शंभरहून अधिक कर्मचारी आजारी

मुंबई : राज्याचे प्रशासन ज्या वास्तूतून चालते, त्या मंत्रालयातील पाण्याच्या मुख्य टाकीत चक्क मेलेले मांजर आढळून

Devendra Fadanvis : शिवरायांच्या नावावर निरर्थक वाद उकरून काढणे संतापजनक

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस; आक्षेप घेणाऱ्यांनी 'शिवाजी कोण होता?' पुस्तक वाचले का? मुंबई : "छत्रपती शिवाजी

Nashik : टीसीएस धर्मांतर प्रकरणात धक्कादायक माहिती समोर, पीडितेचं नाव बदललं अन्....

नाशिक : नाशिक शहरातील टीसीएस कंपनीतील लैंगिक अत्याचार आणि धर्मांतर प्रकरणात धक्कादायक माहिती समोर आली आहे. या

Crime : नॉनव्हेज जेवणाचा वाद विकोपाला, वैतागलेल्या पत्नीने धारदार शस्त्र घेऊन केलं थेट असं काही की...

तेलंगणा Telangana : तेलंगणातील कामारेड्डी परिसरात मन सुन्न करणारी घटना समोर आली आहे. छोट्याशा कौटुंबिक वादाचं रूपांतर

Pratap Sarnaik : रिक्षा-टॅक्सी चालकांना मराठी सक्तीबाबत नवा फॉर्म्युला

दंडात्मक कारवाईला तूर्तास ब्रेक; १ मेपासून राज्यव्यापी मोहीम, चालकांना सहा महिन्यांचा 'दिलासा' मुंबई : राज्यातील

लग्नाला जाताना कुटुंबावर काळाचा घाला, तिघांचा जागीच मृत्यू, मृतांमध्ये ३ वर्षीय चिमुकलीचा समावेश

Amravati accident : अमरावती जिल्हातील वरूड-मोर्शी महामार्गावर रस्ते अपघाताची भीषण घटना समोर आली आहे. खडका फाट्याजवळ