बांगलादेशला परतण्यास शेख हसीनांची सशर्त तयारी

नवी दिल्ली : बांगलादेशच्या माजी पंतप्रधान शेख हसीना यांनी त्यांच्या देशात परतण्याची इच्छा व्यक्त केली आहे. पण, त्यांनी यासाठी काही अटी घातल्या आहेत. सहभागी लोकशाही पुनर्संचयित झाल्यावर आणि त्यांच्या पक्ष अवामी लीगवरील बंदी उठवल्यानंतरच त्या देशात परततील, असे त्यांनी सांगितले आहे. शेख हसीना यांनी मुक्त, निष्पक्ष आणि समावेशक निवडणुकांची मागणी केली आहे. काही दिवसापूर्वी अवामी लीगने देशभरात आंदोलनाची घोषणा केली, या पार्श्वभूमीवर आता शेख हसीना यांनी देशात परतण्याची चर्चा केली आहे.


सध्या भारतात एका गुप्त ठिकाणी वास्तव्यास असलेल्या शेख हसीना यांनी पीटीआय या वृत्तसंस्थेला दिलेल्या मुलाखतीमध्ये सध्याचे अंतरिम सरकार आणि त्यांचे प्रमुख मुहम्मद युनूस यांच्यावर भारताशी असलेले संबंध खराब करण्याचा आणि अतिरेकी घटकांना प्रोत्साहन देण्याचा आरोप केला. त्यांच्या परराष्ट्र धोरणाची तुलना अंतरिम सरकारशी करताना, त्या म्हणाल्या की, ढाका आणि नवी दिल्ली यांच्यातील ‘विस्तृत आणि खोल’ संबंधांमुळे युनूस यांच्या मूर्ख कृत्यांचा ठामपणे प्रतिकार केला पाहिजे.


शेख हसीना यांनी आश्रय दिल्याबद्दल भारत सरकारचे आभार मानले. सहभागी लोकशाहीची पुनर्स्थापना. अंतरिम प्रशासनाने अवामी लीगवरील बंदी उठवावी आणि मुक्त, निष्पक्ष आणि समावेशक निवडणुका घ्याव्यात, असे त्यांनी म्हटले आहे. बांगलादेशच्या सर्वात जास्त काळ पंतप्रधान राहिलेल्या हसीना, या काही आठवड्यांच्या हिंसक सरकारविरोधी निदर्शनांनंतर ५ ऑगस्ट २०२४ रोजी देश सोडून गेल्या. आंदोलनाच्या दबावाखाली, त्यांना राजीनामा द्यावा लागला.

Comments
Add Comment

Toll Plaza Rules : खिशाला बसणार 'दुगना लगान'चा फटका! १५ नोव्हेंबरपासून टोल प्लाझावर नवा नियम; 'ही' चूक केल्यास दुप्पट शुल्क भरावे लागणार

नवी दिल्ली : जर तुम्ही वारंवार राष्ट्रीय महामार्गांवर प्रवास करत असाल, तर ही बातमी तुमच्यासाठी अत्यंत

राग, निराशा अन् हतबलता वाढतेय!

इंडियन सुपर लीग सुरू करण्यासाठी फुटबॉलपटूंची विनंती नवी दिल्ली : भारतातील सर्वात मोठी व्यावसायिक फुटबॉल

भारत-दक्षिण आफ्रिका दुसरा कसोटी सामना सकाळी ९ वाजेपासून

नवी दिल्ली : दक्षिण आफ्रिकेचा संघ सध्या भारत दौऱ्यावर असून दोन्ही संघांमध्ये तिन्ही फॉरमॅटमध्ये मालिका

एटीएसची इब्राहिम अबिदी याच्या मुंब्रा अन् कुर्ला येथील घरावर धाड

नवी दिल्ली  : पुण्यातील अल कायदा प्रकरणाचे धागेदोरे आता मुंब्र्यापर्यंत पोहोचले आहेत. पुणे एटीएसने सॉफ्टवेअर

दिल्ली स्फोटाच्या तपासाचे अतिरिक्त महासंचालक विजय साखरे यांच्याकडे नेतृत्व

नवी दिल्ली : दिल्लीत लाल किल्ल्याजवळ झालेल्या स्फोटाच्या तपासाला आता वेग आला आहे. राष्ट्रीय तपास संस्थेने (एनआयए)

दिल्ली स्फोट तपासात मोठे यश! ड्रायव्हर डॉ. उमर नबी असल्याचे डीएनए तपासातून स्पष्ट

नवी दिल्ली: दिल्लीच्या लाल किल्ल्याजवळ १० नोव्हेंबर रोजी झालेल्या स्फोटामधील तपासात मोठे यश मिळाले आहे. या भीषण