बांगलादेशला परतण्यास शेख हसीनांची सशर्त तयारी

नवी दिल्ली : बांगलादेशच्या माजी पंतप्रधान शेख हसीना यांनी त्यांच्या देशात परतण्याची इच्छा व्यक्त केली आहे. पण, त्यांनी यासाठी काही अटी घातल्या आहेत. सहभागी लोकशाही पुनर्संचयित झाल्यावर आणि त्यांच्या पक्ष अवामी लीगवरील बंदी उठवल्यानंतरच त्या देशात परततील, असे त्यांनी सांगितले आहे. शेख हसीना यांनी मुक्त, निष्पक्ष आणि समावेशक निवडणुकांची मागणी केली आहे. काही दिवसापूर्वी अवामी लीगने देशभरात आंदोलनाची घोषणा केली, या पार्श्वभूमीवर आता शेख हसीना यांनी देशात परतण्याची चर्चा केली आहे.


सध्या भारतात एका गुप्त ठिकाणी वास्तव्यास असलेल्या शेख हसीना यांनी पीटीआय या वृत्तसंस्थेला दिलेल्या मुलाखतीमध्ये सध्याचे अंतरिम सरकार आणि त्यांचे प्रमुख मुहम्मद युनूस यांच्यावर भारताशी असलेले संबंध खराब करण्याचा आणि अतिरेकी घटकांना प्रोत्साहन देण्याचा आरोप केला. त्यांच्या परराष्ट्र धोरणाची तुलना अंतरिम सरकारशी करताना, त्या म्हणाल्या की, ढाका आणि नवी दिल्ली यांच्यातील ‘विस्तृत आणि खोल’ संबंधांमुळे युनूस यांच्या मूर्ख कृत्यांचा ठामपणे प्रतिकार केला पाहिजे.


शेख हसीना यांनी आश्रय दिल्याबद्दल भारत सरकारचे आभार मानले. सहभागी लोकशाहीची पुनर्स्थापना. अंतरिम प्रशासनाने अवामी लीगवरील बंदी उठवावी आणि मुक्त, निष्पक्ष आणि समावेशक निवडणुका घ्याव्यात, असे त्यांनी म्हटले आहे. बांगलादेशच्या सर्वात जास्त काळ पंतप्रधान राहिलेल्या हसीना, या काही आठवड्यांच्या हिंसक सरकारविरोधी निदर्शनांनंतर ५ ऑगस्ट २०२४ रोजी देश सोडून गेल्या. आंदोलनाच्या दबावाखाली, त्यांना राजीनामा द्यावा लागला.

Comments
Add Comment

‘नरेगा’ अंतर्गत मातोश्री ग्रामसमृद्धी पाणंद रस्त्यांना मोठा दिलासा

नवी दिल्ली : ग्रामीण भागातील शेतमाल वाहतूक अधिक सुलभ आणि सुरक्षित करण्यासाठी ‘नरेगा’ अंतर्गत राबविण्यात

संसदेच्या दोन्ही सभागृहांचे कामकाज ९ मार्चपर्यंत स्थगित

नवी दिल्ली : लोकसभेतील अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा पहिला टप्पा शुक्रवारी संपला. पीठासीन अधिकारी संध्या राय यांनी

Narendra Modi: अत्याधुनिक सुविधांनी सज्ज असलेल्या 'सेवा तीर्थ'चे पंतप्रधानांच्या हस्ते उद्घाटन

नवी दिल्ली: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शुक्रवारी (१३ फेब्रुवारी) अत्याधुनिक सुविधांनी सज्ज असलेल्या सेवा

Bihar: एका दाम्पत्याला रोझ डे सेलिब्रेशन पडलं महागात; पोलिसांनी उगारला कारवाईचा बडगा

बिहार: बिहारमधील मुंगेर जिल्ह्यात 'रोझ डे'चे सेलिब्रेशन एका दाम्पत्याला चांगलेच महागात पडले आहे. दारूबंदी

डिझेल गाड्या कायमच्या होणार बंद ? काय सांगतो नीती आयोगाचा अहवाल?

मुंबई: भारतात प्रदूषण कमी करण्यासाठी केंद्र सरकार २०२७ पर्यंत १० लाखांहून अधिक लोकसंख्या असलेल्या शहरांमध्ये

विमानात मोठ्या आवाजात गाणी ऐकणार तर......; विमान वाहतूक मंत्रालयाने जारी केले नवे नियम

मुंबई : लांबच्या ठिकाणी जलद पोहोचण्यासाठी आजकाल सर्रास विमानांचा वापर केला जातो. ट्रेन किंवा बसने प्रवास करताना