गैरप्रकारांना आळा घालण्यासाठी टीईटी परीक्षेकरिता आधुनिक तंत्राचा वापर

मुंबई: शिक्षक पात्रता परीक्षेत (टीईटी) बोगस उमेदवारांसह इतर कोणतेही गैरप्रकार रोखण्यासाठी राज्य परीक्षा परिषदेकडून काटेकोर उपाययोजना केल्या जाणार आहेत. यामध्ये परीक्षार्थी उमेदवारांची प्रत्यक्ष तपासणी करण्यासाठी अद्ययावत तंत्रज्ञानाची जोड देण्यात आली असून ‘फोटो व्ह्यू’ आणि ‘कनेक्ट व्ह्यू’ या दोन नव्या प्रणाली परीक्षा परिषदेने उपाययोजनांमध्ये समाविष्ट केल्या आहेत.


राज्य परीक्षा परिषदेतर्फे यावर्षी २३ नोव्हेंबर रोजी ‘टीईटी’ आयोजित करण्यात आली आहे. सर्वोच्च न्यायालयाने ‘टीईटी’ अनिवार्य असल्याबाबत दिलेल्या निर्णयानंतर या परीक्षेचे महत्त्व वाढले आहे. तसेच, केंद्रप्रमुख भरती परीक्षेतही ‘टीईटी’ उत्तीर्ण असणे आवश्यक करण्यात आले आहे. त्यामुळे गेल्या वर्षीच्या ‘टीईटी’च्या तुलनेत यंदा ‘टीईटी’च्या नोंदणीमध्येही लक्षणीय वाढ झाली आहे.


‘टीईटी’मध्ये २०१८ आणि २०१९ या दोन वर्षात अनेक गैरप्रकार उघडकीस आले होते. या पार्श्वभूमीवर गेल्यावर्षीपासून राज्य परीक्षा परिषदेने गैरप्रकार रोखण्यासाठी अत्यंत काटेकोर उपाययोजना करण्यात सुरुवात केली आहे. गेल्यावर्षी केलेल्या उपाययोजनांमध्ये यंदा दोन नव्या प्रणालींची भर घालण्यात आली आहे. यामध्ये ‘फोटो व्ह्यू’ प्रणाली उमेदवार पडताळणीसाठी, तर ‘कनेक्ट व्ह्यू’ प्रणाली वेगवान संपर्कासाठी वापरली जाणार आहे.


राज्य परीक्षा परिषदेतर्फे ‘टीईटी’चे प्रवेशपत्र उमेदवारांना १० नोव्हेंबर ते २३ नोव्हेंबर या कालावधीत https://mahatet.in/ या संकेतस्थळाद्वारे उपलब्ध करून देण्यात येणार आहे. दिलेल्या मुदतीत प्रवेशपत्र उपलब्ध करून न घेतल्यास त्याची सर्वस्वी जबाबदारी उमेवारांची असेल, असे प्रसिद्धिपत्रकाद्वारे स्पष्ट केले.

Comments
Add Comment

लातूर जिल्ह्यात काढणीच्या तोंडावर पाऊस; शेतकरी चिंतेत

लातूर : दोन तीन दिवसांपासून उन्हाचा तडाखा वाढला होता. अवकाळी पावसाचा अंदाज हवामान विभागाने नुकताच जाहीर केला

उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांनी घेतले छत्रपती संभाजी महाराजांच्या समाधीचे दर्शन

पुणे : छत्रपती संभाजी महाराज यांच्या ३३७ व्या बलिदान स्मरणदिनानिमित्त राज्याच्या उपमुख्यमंत्री आणि पुणे

सातारा येथे २२ मार्चला चतुर्थ ‘महाराष्ट्र मंदिर न्यास परिषद'

मंदिर-संस्कृतीच्या रक्षणार्थ एक हजारांहून अधिक मंदिर प्रतिनिधींची उपस्थिती सातारा : लाखो वर्षांपासून हिंदु

पाणी समजून प्यायलं थिनर; चार वर्षांच्या चिमुकल्याच्या तोंडापासून ते पोटापर्यंत...

ठाणे : ठाण्याच्या इंदिरानगरमध्ये एक अतिशय धक्कादायक घटना घडली आहे. चार वर्षाच्या चिमुकल्याने चुकून पाणी समजून

मराठमोळ्या मुलीशी लग्न करुन आता पत्नीला बुरख्यातच ठेवतो; म्हणाल्या, पुरुष स्त्रियांकडे...

मुंबई: प्रसिद्ध युट्यूबर आणि सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर अदनान शेख सध्या त्याच्या वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत

नागपूर येथील भारतीय व्यवस्थापन संस्थेला इन्क्यूबेशन सेंटर म्हणून मान्यता

मुंबई: विदर्भातील नवउद्योग (स्टार्टअप) परिसंस्था अधिक सक्षम करण्याच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण पाऊल उचलत,