ठोंबरे आणि मिटकरींना पक्षातून 'दे धक्का', प्रवक्ते पदावरून उचलबांगडी!

सूरज चव्हाण यांना मात्र 'अभय'; राष्ट्रवादी अजित पवार गटातील अंतर्गत वादाला नवे वळण


मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या (अजित पवार गट) प्रवक्ते मंडळात मोठा फेरबदल करण्यात आला असून, पक्षातील दोन प्रमुख नेत्यांना, रुपाली ठोंबरे-पाटील आणि अमोल मिटकरी यांना प्रवक्ते पदावरून हटवण्यात आले आहे. पक्षातील वाढता अंतर्गत वाद आणि वादग्रस्त वक्तव्ये या निर्णयामागे प्रमुख कारण असल्याचे बोलले जात आहे. विशेष म्हणजे, काही दिवसांपूर्वी वादात अडकलेल्या युवक प्रदेशाध्यक्ष सूरज चव्हाण यांना मात्र या फेरबदलात 'अभय' मिळाल्याची चर्चा आहे.



ठोंबरे-पाटील यांच्या हकालपट्टीचे कारण काय?


रुपाली ठोंबरे-पाटील यांची हकालपट्टी होण्यामागे त्यांचा राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांच्याशी असलेला जाहीर वाद कारणीभूत ठरला. फलटणमधील डॉक्टर तरुणीच्या आत्महत्याप्रकरणी चाकणकर यांनी केलेल्या वक्तव्यावरून ठोंबरे-पाटील यांनी त्यांच्यावर जोरदार टीका केली होती. हा वाद इतका वाढला की, पक्षाकडून ठोंबरे-पाटील यांना कारणे दाखवा नोटीस पाठवण्यात आली. रुपाली ठोंबरे-पाटील यांनी अजित पवार यांची भेट घेतल्यानंतर काही तासांतच त्यांची प्रवक्तेपदावरून हकालपट्टी करण्यात आल्याने, पक्षाने शिस्तभंग सहन केला नसल्याचे स्पष्ट होते.



मिटकरींच्या वादग्रस्त वक्तव्यांचा फटका


दुसरीकडे, पक्षाचे नेते अमोल मिटकरी हे त्यांच्या वादग्रस्त वक्तव्यांमुळे सातत्याने चर्चेत असतात. त्यांच्या अनेक वक्तव्यांमुळे महायुतीमध्ये (शिंदे-फडणवीस-पवार गट) वारंवार तणाव निर्माण झाल्याचे पाहायला मिळाले. पक्षाला आणि महायुतीला संभाव्य अडचणीतून वाचवण्यासाठी, पक्षाने त्यांचीही प्रवक्ते पदावरून उचलबांगडी केली आहे.



सूरज चव्हाण यांना 'क्लीन चिट'


या पार्श्वभूमीवर, सर्वात लक्षवेधी बाब म्हणजे सूरज चव्हाण यांना मिळालेले अभय. छावा संघटनेचे प्रदेशाध्यक्ष विजय घाडगे यांना मारहाण केल्याप्रकरणी चव्हाण यांच्यावर मोठी टीका झाली होती. प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनीही जाहीर नाराजी व्यक्त केल्यानंतर अजित पवार यांनी त्यांना युवक प्रदेशाध्यक्ष पदावरून पदमुक्त होण्याचे आदेश दिले होते.


मात्र, नव्या प्रवक्त्यांच्या नियुक्तीमध्ये त्यांना कोणताही फटका बसलेला नाही. त्यामुळे, एका बाजूला शिस्तीचा बडगा उगारताना, दुसऱ्या बाजूला पक्षाने एका नेत्याला महत्त्वाच्या घटनेनंतरही सक्रिय ठेवण्याचा निर्णय घेतला आहे, ज्यामुळे राजकीय वर्तुळात अनेक तर्कवितर्क लावले जात आहेत. पक्षाच्या या निर्णयामुळे राष्ट्रवादी काँग्रेसच्या अंतर्गत राजकारणाला नवे वळण मिळाले आहे.



प्रवक्ते म्हणून कोणाला संधी मिळाली?


अनिल पाटील
रुपाली चाकणकर
ब्रिजमोहन श्रीवास्तव
चेतन तुपे
आनंद परांजपे
अविनाश आदिक
सना मलिक
राजलक्ष्मी भोसले
सुरज चव्हाण
हेमलता पाटील
प्रतिभा शिंदे
विकास पासलकर
राजीव साबळे
प्रशांत पवार
श्याम सनेर
सायली दळवी
शशिकांत तरंगे

Comments
Add Comment

Crime News : आधी कार आता दुचाकी जळून खाक, अहिल्यानगरात काय घडतंय ? CCTV तील 'ते' दृश्य पाहून संशय बळावला

Crime News :  अहिल्यानगर शहरात वाहनांना लक्ष्य करून आग लावण्याच्या घटना सुरूच असल्याने नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण

Jalgaon : भीषण अपघातामुळे वाटेतच काळाची झडप, १ वर्षाच्या चिमुकलीसह चौघांचा हृदयद्रावक अंत

Jalgaon : जळगाव जिल्ह्यातील वरणगावजवळ मुंबई-नागपूर महामार्गावरील (Mumbai-Nagpur Highway) बायपासवर थरारक अशी भीषण रस्ते अपघाताची

Crime News : शिट्टी वाजवली, उसाच्या शेतातून 10 ते 12 जण बाहेर आले, अन.... स्वस्तात सोने मिळण्याचे आमिष महागात पडले

अहिल्यानगर : स्वस्तात सोने मिळणार असल्याचं आमिष दाखवत रायगडच्या जिल्हा परिषद सदस्यालाच सापळ्यात ओढून तब्बल 52

Kolhapur News : कोल्हापूरात कोल्ह्याची दहशत! साडेतीन वर्षांच्या चिमुकल्यासह ११ जण जखमी; नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण

कोल्हापूर : कोल्हापूर (Kolhapur) जिल्ह्यात वन्य प्राण्यांच्या हल्ल्यांच्या (Attack) घटना सातत्याने समोर येत असताना आता

Yavatmal Murder Case : ‘गिफ्ट लवकरच पाठवतो’... स्टेटस ठेवला अन् घरात घुसून सपासप वार; तरुणाची निर्घृण हत्या

राज्यात गेल्या अनेक दिवसांपासून गुन्हेगारांचे प्रमाण वाढत चालले आहे. अशातच आणखी एका हत्येची घटना समोर आली

Navi Mumbai Airport Shivaji Maharaj Statue : नवी मुंबई विमानतळावर शिवरायांचा भव्य पुतळा! मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते १२ फूट उंच कांस्य अर्धपुतळ्याचे अनावरण

नवी मुंबई : महाराष्ट्राच्या अस्मितेचे प्रतीक असलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांचा भव्य १२ फूट उंच कांस्य