Sugar Share Surge: 'या' कारणामुळे साखर कारखान्यांच्या शेअर्समध्ये जबरदस्त वाढ

मोहित सोमण: केंद्र सरकारने दिलेल्या पाठिंब्यामुळे आज साखरेच्या शेअर्समध्ये जबरदस्त वाढ झाली आहे. केंद्र सरकारने साखरेच्या निर्यातीवरील ५०% असलेली कराची कॅप काढून टाकली होती. त्यामुळे आता १.५ दशलक्ष टन साखरीच्या निर्यातीचा मार्ग आता मोकळा झाला असून काकवीवरील (Molases) कर काढून टाकल्याने काकवी निर्यातही सुकर झाली.या अपडेट्समुळे साखर कंपनीच्या शेअर्समध्ये आज मोठी वाढ झाली आहे. प्रामुख्याने सकाळच्या सत्रात बलराम चिनी (५.०१%), श्री रेणुका शुगर (२.६२%), दालमिया भारत शुगर (१.१६%) मध्ये जबरदस्त वाढ झाली आहे.


अन्नमंत्री प्रल्हाद जोशी यांनी हा निर्णय साखर कारखाने आणि ऊस उत्पादक शेतकऱ्यांना इथेनॉलमध्ये कमकुवत वळवण्याचा आणि वाढत्या उत्पादन पातळीचा सामना करावा लागत असल्याने निर्यात मंजुरी आणि शुल्क काढून टाकल्याने इन्व्हेंटरीचा दबाव कमी होईल आणि गिरण्यांच्या उत्पन्नात सुधारणा होईल अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे असे म्हटले. 'चालू साखर हंगामासाठीही केंद्र सरकारने १५ लाख टन साखर निर्यातीला परवानगी देण्याचा निर्णय घेतला आहे आणि मोलॅसिसवरील ५०% निर्यात शुल्क काढून टाकण्यात आले आहे' असे जोशी म्हणाले आहेत.


इंडियन शुगर अँड बायो-एनर्जी मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशन (ISMA) ने आर्थिक वर्ष २०२५-२६ मध्ये साखर उत्पादनात जोरदार सुधारणा होण्याचा अंदाज वर्तवला आहे. हे उत्पादन ३४३.५ लाख टन पातळीवर वाढण्याचा अंदाज त्यांनी व्यक्त केला आहे. गेल्या हंगामातील २९६.१ लाख टनांपेक्षा जवळपास १६% जास्त उत्पादन यंदाच्या मोसमात वाढू शकते असे संस्थेने यावेळी प्रसारमाध्यमांशी बोलताना स्पष्ट केले आहे.दुपारी १२.५५ वाजेपर्यंत श्री रेणुका शुगर (२.६२%), बलराज चिनी (५.८७%), त्रिवेणी इंजिनिअरिंग (१.२३%) समभागात वाढ झाली आहे.

Comments
Add Comment

पाकिस्तान विरोधात भारताचा विजय, सुपर 8 मध्ये दिमाखात एन्ट्री

कोलंबो : आयसीसी पुरुष टी ट्वेंटी वर्ल्डकप २०२६ मध्ये पाकिस्तान विरूद्धचा साखळी सामना भारताने ६१ धावांनी जिंकला.

मान्यवरांच्या उपस्थितीत १७ फेब्रुवारीपासून सुरू होणार मुंबई क्लायमेट वीक

मुंबई : देशातील पहिला ‘मुंबई क्लायमेट वीक’ उपक्रमाची सुरूवात १७ फेब्रुवारीपासून विविध मान्यवरांच्या उपस्थितीत

ईशान, सूर्या, शिवम, तिलक, रिंकूमुळे भारताने पाकिस्तानपुढे ठेवले मोठे लक्ष्य

कोलंबो : आयसीसी पुरुष टी ट्वेंटी वर्ल्डकप २०२६ मध्ये पाकिस्तान विरूद्धच्या सामन्यात भारताने ईशान, सूर्या, शिवम,

भर लग्नसमारंभात जीवघेणा हल्ला; बुलढाण्यात तरुण......

बुलढाणा : आनंदाच्या वातावरणात सुरू असलेल्या विवाह सोहळ्याला अचानक हिंसाचाराचे गालबोट लागल्याची धक्कादायक घटना

दीड वर्षाच्या चिमुकलीवर अत्याचार करणाऱ्या नराधमाचा तातडीने शोध घेण्याचे, पोलीस उपायुक्तांना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे निर्देश

दीड वर्षाच्या बलात्कार पीडित चिमुकलीला न्याय मिळवून देण्यासाठी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घेतला

दिल्ली येथे ‘इंडिया एआय इम्पॅक्ट समिट’मध्ये महिलांच्या आर्थिक सक्षमीकरणासाठी आराखड्याची होणार मांडणी

मुंबई : दिल्ली येथील भारत मंडपम येथे आयोजित करण्यात आलेल्या ‘इंडिया एआय इम्पॅक्ट समिट’ मध्ये महिलांच्या आर्थिक