Sugar Share Surge: 'या' कारणामुळे साखर कारखान्यांच्या शेअर्समध्ये जबरदस्त वाढ

मोहित सोमण: केंद्र सरकारने दिलेल्या पाठिंब्यामुळे आज साखरेच्या शेअर्समध्ये जबरदस्त वाढ झाली आहे. केंद्र सरकारने साखरेच्या निर्यातीवरील ५०% असलेली कराची कॅप काढून टाकली होती. त्यामुळे आता १.५ दशलक्ष टन साखरीच्या निर्यातीचा मार्ग आता मोकळा झाला असून काकवीवरील (Molases) कर काढून टाकल्याने काकवी निर्यातही सुकर झाली.या अपडेट्समुळे साखर कंपनीच्या शेअर्समध्ये आज मोठी वाढ झाली आहे. प्रामुख्याने सकाळच्या सत्रात बलराम चिनी (५.०१%), श्री रेणुका शुगर (२.६२%), दालमिया भारत शुगर (१.१६%) मध्ये जबरदस्त वाढ झाली आहे.


अन्नमंत्री प्रल्हाद जोशी यांनी हा निर्णय साखर कारखाने आणि ऊस उत्पादक शेतकऱ्यांना इथेनॉलमध्ये कमकुवत वळवण्याचा आणि वाढत्या उत्पादन पातळीचा सामना करावा लागत असल्याने निर्यात मंजुरी आणि शुल्क काढून टाकल्याने इन्व्हेंटरीचा दबाव कमी होईल आणि गिरण्यांच्या उत्पन्नात सुधारणा होईल अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे असे म्हटले. 'चालू साखर हंगामासाठीही केंद्र सरकारने १५ लाख टन साखर निर्यातीला परवानगी देण्याचा निर्णय घेतला आहे आणि मोलॅसिसवरील ५०% निर्यात शुल्क काढून टाकण्यात आले आहे' असे जोशी म्हणाले आहेत.


इंडियन शुगर अँड बायो-एनर्जी मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशन (ISMA) ने आर्थिक वर्ष २०२५-२६ मध्ये साखर उत्पादनात जोरदार सुधारणा होण्याचा अंदाज वर्तवला आहे. हे उत्पादन ३४३.५ लाख टन पातळीवर वाढण्याचा अंदाज त्यांनी व्यक्त केला आहे. गेल्या हंगामातील २९६.१ लाख टनांपेक्षा जवळपास १६% जास्त उत्पादन यंदाच्या मोसमात वाढू शकते असे संस्थेने यावेळी प्रसारमाध्यमांशी बोलताना स्पष्ट केले आहे.दुपारी १२.५५ वाजेपर्यंत श्री रेणुका शुगर (२.६२%), बलराज चिनी (५.८७%), त्रिवेणी इंजिनिअरिंग (१.२३%) समभागात वाढ झाली आहे.

Comments
Add Comment

PM Surya Ghar yojana : 'पंतप्रधान सूर्य घर' योजनेत महाराष्ट्राची बाजी

- उत्तर प्रदेश, गुजरातला टाकले मागे; चार महिन्यांत १ लाख ८ हजार घरांवर सौर यंत्रणा मुंबई : स्वच्छ आणि शाश्वत

संजय गांधी राष्ट्रीय उद्यानात पुन्हा घुमली 'वनराणी'ची शिट्टी

- बॅटरीवर चालणाऱ्या इंजिनासह आधुनिक सेवा; केंद्रीय मंत्री पीयूष गोयल यांच्या हस्ते उद्घाटन मुंबई :

Meta आपल्या जागतिक कर्मचाऱ्यांपैकी २० टक्के कर्मचाऱ्यांची कपात करणार ?

- एआय तंत्रज्ञानातील वाढत्या स्पर्धेमुळे कर्मचारी संरचनेत बदल मेटा प्लॅटफॉर्म ही फेसबुक आणि इंस्टाग्राम या

"काँग्रेसकडे निराशेत स्वतःचे कपडे फाडण्याव्यतिरिक्त काहीही शिल्लक नाही"; पंतप्रधान मोदींची काँग्रेसवर जोरदार टीका

- सततच्या पराभवातून आलेल्या नैराश्यातूनच काँग्रेसचा देशाविरोधात मोर्चा आसाम सोबतच देशातील बहुतेक

भव्य राष्ट्रध्वज नागपूरच्या राष्ट्राभिमानाचे प्रतीक ठरेल - मुख्यमंत्री फडणवीस

देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी असंख्य स्वातंत्र्य सैनिकांनी प्राणांची आहुती दिली याचा प्रत्येक

Nashik Kumbh Mela : नाशिक कुंभमेळ्यासाठी २२,१८१ कोटी रुपयांच्या कामांना मान्यता

- त्र्यंबक-नाशिकचा कुंभमेळा जगाला आकर्षण वाटणारा असावा - मुख्यमंत्री फडणवीस त्र्यंबक - नाशिक मध्ये सिंहस्थ