शाळेची बस १५० फूट दरीत कोसळली; दोन विद्यार्थ्यांचा मृत्यू

नंदुरबार : जिल्ह्यातील अक्कलकुवा तालुक्यात विद्यार्थ्यांना घेऊन जाणाऱ्या बसचा भीषण अपघात झाला. देवगोई घाटातल्या अमलीबारी जवळ एक स्कूल बस १०० ते १५० फूट खोल दरीत कोसळली. बसमध्ये २० ते २५ विद्यार्थी होते. या दुर्घटनेत आतापर्यंत दोन विद्यार्थ्यांचा मृत्यू झाला असून जवळपास तीसहून अधिक विद्यार्थी जखमी झाले. घटनेनंतर स्थानिक नागरिकांकडून मदतीचे काम सुरू करण्यात आले. तसेच प्रशासन आणि पोलीस घटनास्थळी दाखल झाले. जखमींना तातडीने नंदुरबार जिल्हा रुग्णालयात हलविण्यात आले आहे. तर इतर जखमी विद्यार्थ्यांवर अक्कलकुवा ग्रामीण रुग्णालयातच उपचार सुरू आहेत.


नंदुरबार जिल्ह्यातल्या अक्कलकुवा आणि मोलगींला जोडणाऱ्या देवगोई घाटात चाळीसगाव तालुक्यातील मेहुनबारे येथील अनुदानित आश्रम शाळेच्या विद्यार्थ्यांना घेऊन जाणारी शालेय बस दरीत कोसळून अपघात झाला. दिवाळीच्या सुट्ट्यांमध्ये आपल्या गावाकडे आलेल्या आदिवासी विद्यार्थ्यांना आश्रमशाळेत नेण्यासाठी ही बस अक्कलकुव्याच्या मोलगी परिसरात आली होती.

Comments
Add Comment

TET exam : टीईटी परीक्षेत सीसीटीव्हीमध्ये चेहरा दिसणे बंधनकारक

टीईटी परीक्षेत सीसीटीव्हीमध्ये चेहरा दिसणे बंधनकारक बुरखा, दुपट्टा किंवा ओढणीला बंदी नाही- राज्य परीक्षा

Vilas Ghule : विलास घुले हत्या प्रकरणावरून धनंजय मुंडेंचा सवाल; निष्पक्ष तपासाची मागणी

बीड : बीड (Beed) जिल्ह्यातील केज तालुक्यातील विलास घुले (Vilas Ghule) हत्या प्रकरणावरून (Murder) माजी मंत्री आणि आमदार धनंजय मुंडे

Monsoon Update : जून महिन्यात पाऊस पडणार नाही ; या तारखेपासून कोसळणार मुसळधार पाऊस

महाराष्ट्र : महाराष्ट्रामध्ये काही भागात पावसाने जोरदार हजेरी लावली. २३ आणि २५ जूनला मुंबईसह इतर शहरात मुसळधार

Ketan Agarwal Murder Case: "म्हणून मी त्याला लोहगडावरून खाली ढकललं..." सियाने पोलिसांसमोर सर्वचं सांगितलं

केतनच्या हत्येमागचं सर्वात भयंकर कारण आलं समोर Ketan Agarwal Murder Case : पुणे : पुण्यातील उद्योगपती केतन अग्रवाल (Ketan Agarwal Murder)

आषाढी वारीसाठी रेल्वेची खास भेट; पंढरपूरसाठी धावणार विशेष गाड्या, जाणून घ्या वेळापत्रक

आषाढी एकादशीच्या पार्श्वभूमीवर पंढरपूरला जाणाऱ्या वारकऱ्यांसाठी मध्य रेल्वेने विशेष गाड्यांची घोषणा केली

Maharashtra Infrastructure : मुंबई आणि नागपूरसाठी मोठा निर्णय; दोन महत्त्वाच्या वाहतूक प्रकल्पांना राज्य सरकारची मंजुरी

राज्यातील वाहतूक व्यवस्था अधिक वेगवान आणि सुलभ करण्यासाठी राज्य सरकारने दोन महत्त्वाच्या पायाभूत सुविधा