शाळेची बस १५० फूट दरीत कोसळली; दोन विद्यार्थ्यांचा मृत्यू

नंदुरबार : जिल्ह्यातील अक्कलकुवा तालुक्यात विद्यार्थ्यांना घेऊन जाणाऱ्या बसचा भीषण अपघात झाला. देवगोई घाटातल्या अमलीबारी जवळ एक स्कूल बस १०० ते १५० फूट खोल दरीत कोसळली. बसमध्ये २० ते २५ विद्यार्थी होते. या दुर्घटनेत आतापर्यंत दोन विद्यार्थ्यांचा मृत्यू झाला असून जवळपास तीसहून अधिक विद्यार्थी जखमी झाले. घटनेनंतर स्थानिक नागरिकांकडून मदतीचे काम सुरू करण्यात आले. तसेच प्रशासन आणि पोलीस घटनास्थळी दाखल झाले. जखमींना तातडीने नंदुरबार जिल्हा रुग्णालयात हलविण्यात आले आहे. तर इतर जखमी विद्यार्थ्यांवर अक्कलकुवा ग्रामीण रुग्णालयातच उपचार सुरू आहेत.


नंदुरबार जिल्ह्यातल्या अक्कलकुवा आणि मोलगींला जोडणाऱ्या देवगोई घाटात चाळीसगाव तालुक्यातील मेहुनबारे येथील अनुदानित आश्रम शाळेच्या विद्यार्थ्यांना घेऊन जाणारी शालेय बस दरीत कोसळून अपघात झाला. दिवाळीच्या सुट्ट्यांमध्ये आपल्या गावाकडे आलेल्या आदिवासी विद्यार्थ्यांना आश्रमशाळेत नेण्यासाठी ही बस अक्कलकुव्याच्या मोलगी परिसरात आली होती.

Comments
Add Comment

नागपूर येथील भारतीय व्यवस्थापन संस्थेला इन्क्यूबेशन सेंटर म्हणून मान्यता

मुंबई: विदर्भातील नवउद्योग (स्टार्टअप) परिसंस्था अधिक सक्षम करण्याच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण पाऊल उचलत,

नमो शेतकरी महासन्मान निधीचा ८ वा हप्ता पुढील आठवड्यात शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार; कृषीमंत्र्यांनी दिली माहिती

मुंबई: राज्यातील लाखो शेतकऱ्यांना आर्थिक दिलासा देणारा महत्त्वपूर्ण निर्णय राज्य शासनाने घेतला असून, नमो

‘महाराष्ट्र धर्मस्वातंत्र्य विधेयक’ विधानपरिषदेत मंजूर

मुंबई: महाराष्ट्रात गेल्या काही काळापासून चर्चेत असलेले आणि अत्यंत कडक तरतुदी असलेले ‘महाराष्ट्र

सिंधुदुर्गच्या विकासाला बुस्टर; राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत १०० टक्के 'व्हिजीएफ'ला मंजुरी

मुंबई: सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या पर्यटनाला आणि अर्थव्यवस्थेला मोठी गती देणारा निर्णय मंगळवारी राज्य

नंदूरबार,छत्रपती संभाजीनगरमधील गैरव्यवहारासाठी 'एसआयटी स्थापन; महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांची विधान परिषदेत घोषणा

​मुंबई: नंदूरबार जिल्ह्यातील नवापूर येथील भूसंपादन गैरव्यवहार आणि छत्रपती संभाजीनगरमधील ब्रिजवाडी येथील ५४

रब्बी हंगामातील 'ई-पीक पाहणी'ला ३१ मार्चपर्यंत मुदतवाढ

- ४५ टक्के शेतकरी अजूनही प्रक्रियेबाहेर; महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांची घोषणा मुंबई : राज्यातील रब्बी