देशातील पहिला अत्याधुनिक एचपीसीएल रिफायनरी अंतिम टप्प्यात

या प्रकल्पामुळे बलोतरा आणि पाचपद्रा परिसराचा चेहरामोहरा बदलला


सीमा पवार बाडमेर : हिंदुस्तान पेट्रोकेमिकल्स (एचपीसीएल) आणि राजस्थान सरकार यांच्या संयुक्त विद्यमाने राजस्थानातील बाडमेर जवळ पाचपद्रा येथे अत्याधुनिक तेल शुद्धीकरण प्रकल्पाची उभारणी केली जात आहे. ४ हजार ८०० एकर जमिनीवर उभारण्यात येणाऱ्या या प्रकल्पाचे काम अंतिम टप्प्यात आले आहे.


बाडमेर जिल्ह्यातील पाचपद्रा येथे उभारण्यात येत असलेला एचपीसीएलचा राजस्थान रिफायनरी लिमिटेड (एचआरआरएल) हा देशातील पहिला अत्याधुनिक आणि भव्य तेल शुद्धीकरण प्रकल्प ठरणार आहे. ७८ हजार ४७९ कोटी रुपये खर्चाच्या या प्रकल्पात भारत सरकारची अंगीकृत असलेल्या एचपीसीएल कंपनीची ७४ टक्के तर राजस्थान सरकारची २६ टक्के भागीदारी आहे. या प्रकल्पामुळे ३५ हजार लोकांना थेट तर एक लाख लोकांना अप्रत्यक्षपणे रोजगार उपलब्ध होणार आहे. या तेल शुद्धीकरण प्रकल्पाची वार्षिक तेल शुद्धीकरण क्षमता ९ दशलक्ष मेट्रिक टन आहे. येथे बीएस-६ दर्जाचे पेट्रोल आणि डिझेल त्याचबरोबर नाफ्ता, प्लास्टिक व इतर पेट्रोकेमिकल पदार्थांची निर्मिती केली जाणार आहे. राजस्थानच्या औद्योगिक इतिहासातील ही सर्वात मोठी गुंतवणूक असून भविष्यात हा देशातील दुसऱ्या क्रमांकाचा तेल शुद्धीकरण प्रकल्प ठरणार आहे. प्रकल्पाच्या व्यवस्थापनासाठी अत्याधुनिक नियंत्रण व्यवस्था विकसित करण्यात आली असून सुरक्षेच्या सर्व निकषांसह येथे काम केले जात आहे. वाळवंटातील रत्न म्हणून ओळखल्या जाणाऱ्या HRRL रिफायनरीमध्ये आयातित कच्च्या तेलासह राजस्थान कच्च्या तेलावर प्रक्रिया करण्याची कल्पना आहे. डिझाइन क्रूड मिक्स राजस्थान क्रूडचे १.५ MMTPA + आयातित कच्च्या तेलाचे ७.५ MMTPA आहे आणि रिफायनरी १००% आयातित कच्च्या तेलावर प्रक्रिया करण्यासाठी देखील डिझाइन केलेली आहे. या प्रकल्पामुळे राजस्थानात रोजगाराच्या अनेक संधी निर्माण होणार असून स्थानिक उद्योग, वाहतूक आणि पायाभूत सुविधांना चालना मिळणार आहे.

Comments
Add Comment

Dadar-Ratnagiri passenger : दादर–रत्नागिरी पॅसेंजर रेल पुन्हा दादर स्थानकापर्यंत करा; खासदार रविंद्र वायकर यांची मागणी

- शक्य असल्यास ही रेल छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसपर्यंत विस्तारित करा - रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव

Bihar Stampede: बिहारच्या शीतला मंदिरातील चेंगराचेंगरी प्रकरणी पंतप्रधान आणि मुख्यमंत्र्यांकडून मदत जाहीर

नालंदा: बिहारमधील शीतला मंदिरात चेंगराचेंगरी झाली. या घटनेत आठ जणांचा मृत्यू झाला असून आठ जण जखमी झाले आहेत.

Bihar Stampede: बिहारच्या शीतला मंदिरात झालेल्या चेंगराचेंगरीत ८ जणांचा मृत्यू, ८ जण जखमी

मुंबई: बिहारमधील नालंदा येथे एक मोठी घटना घडली आहे. शीतला मंदिरात चेंगराचेंगरी झाली आहे. या घटनेत आठ जणांचा

CCTV Certification Rules: १ एप्रिलपासून अनेक चिनी सीसीटीव्ही कॅमेऱ्यांच्या विक्रीवर बंदी; ग्राहकांवर काय परिणाम होणार?

मुंबई: भारतातील सीसीटीव्ही बाजारपेठेत मोठे बदल होणार आहेत. भारत इंटरनेट-कनेक्टेड सीसीटीव्ही कॅमेऱ्यांसाठीचे

नितीश यांच्या विधान परिषद सदस्यपदाच्या राजीनाम्यानंतर राजकीय खळबळ; कोण होणार मुख्यमंत्री?

नवी दिल्ली: मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी आज विधान परिषद सदस्यपदाचा राजीनामा दिला. यापूर्वी ते राज्यसभेवर

Jobs Alert : १२ वी नंतर विमानतळावर करिअरची मोठी संधी; लाखोंचं पॅकेज आणि हाय-प्रोफाईल लाईफस्टाईल, जाणून घ्या सविस्तर

मुंबई : सध्याच्या काळात विमान वाहतूक (Aviation) क्षेत्र हे जगातील सर्वात वेगाने विकसित होणाऱ्या उद्योगांपैकी एक