देशातील पहिला अत्याधुनिक एचपीसीएल रिफायनरी अंतिम टप्प्यात

या प्रकल्पामुळे बलोतरा आणि पाचपद्रा परिसराचा चेहरामोहरा बदलला


सीमा पवार बाडमेर : हिंदुस्तान पेट्रोकेमिकल्स (एचपीसीएल) आणि राजस्थान सरकार यांच्या संयुक्त विद्यमाने राजस्थानातील बाडमेर जवळ पाचपद्रा येथे अत्याधुनिक तेल शुद्धीकरण प्रकल्पाची उभारणी केली जात आहे. ४ हजार ८०० एकर जमिनीवर उभारण्यात येणाऱ्या या प्रकल्पाचे काम अंतिम टप्प्यात आले आहे.


बाडमेर जिल्ह्यातील पाचपद्रा येथे उभारण्यात येत असलेला एचपीसीएलचा राजस्थान रिफायनरी लिमिटेड (एचआरआरएल) हा देशातील पहिला अत्याधुनिक आणि भव्य तेल शुद्धीकरण प्रकल्प ठरणार आहे. ७८ हजार ४७९ कोटी रुपये खर्चाच्या या प्रकल्पात भारत सरकारची अंगीकृत असलेल्या एचपीसीएल कंपनीची ७४ टक्के तर राजस्थान सरकारची २६ टक्के भागीदारी आहे. या प्रकल्पामुळे ३५ हजार लोकांना थेट तर एक लाख लोकांना अप्रत्यक्षपणे रोजगार उपलब्ध होणार आहे. या तेल शुद्धीकरण प्रकल्पाची वार्षिक तेल शुद्धीकरण क्षमता ९ दशलक्ष मेट्रिक टन आहे. येथे बीएस-६ दर्जाचे पेट्रोल आणि डिझेल त्याचबरोबर नाफ्ता, प्लास्टिक व इतर पेट्रोकेमिकल पदार्थांची निर्मिती केली जाणार आहे. राजस्थानच्या औद्योगिक इतिहासातील ही सर्वात मोठी गुंतवणूक असून भविष्यात हा देशातील दुसऱ्या क्रमांकाचा तेल शुद्धीकरण प्रकल्प ठरणार आहे. प्रकल्पाच्या व्यवस्थापनासाठी अत्याधुनिक नियंत्रण व्यवस्था विकसित करण्यात आली असून सुरक्षेच्या सर्व निकषांसह येथे काम केले जात आहे. वाळवंटातील रत्न म्हणून ओळखल्या जाणाऱ्या HRRL रिफायनरीमध्ये आयातित कच्च्या तेलासह राजस्थान कच्च्या तेलावर प्रक्रिया करण्याची कल्पना आहे. डिझाइन क्रूड मिक्स राजस्थान क्रूडचे १.५ MMTPA + आयातित कच्च्या तेलाचे ७.५ MMTPA आहे आणि रिफायनरी १००% आयातित कच्च्या तेलावर प्रक्रिया करण्यासाठी देखील डिझाइन केलेली आहे. या प्रकल्पामुळे राजस्थानात रोजगाराच्या अनेक संधी निर्माण होणार असून स्थानिक उद्योग, वाहतूक आणि पायाभूत सुविधांना चालना मिळणार आहे.

Comments
Add Comment

नाताळनिमित्त मोदींनी चर्चमध्ये जाऊन केली प्रार्थना

नवी दिल्ली : नाताळचे औचित्य साधून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिल्लीतील कॅथेड्रल चर्चला भेट दिली. मोदींनी

महामार्गावर मोठा अपघात, अवघ्या काही सेकंदात १७ जण होरपळले

चित्रदुर्ग : कर्नाटकमधील चित्रदुर्ग गुरुवारी पहाटे महामार्गावर मोठा अपघात झाला. अवघ्या काही सेकंदात १७ जणांचा

पॅन - आधार लिंक करण्यासाठी शेवटची संधी!

३१ डिसेंबरनंतर भरावा लागेल १००० रुपये दंड नवी दिल्ली : तुम्ही तुमचे आधार कार्ड आणि पॅन कार्ड अजूनही लिंक केले

भारताचे अंतराळवीर चंद्रावर जाणार

मुंबई : आर्यभट्ट या पहिल्या भारतीय उपग्रहाच्या प्रक्षेपणापासून ते चांद्रयान ३ मोहीमेपर्यंत भारताने उपग्रह,

दोन नव्या विमान कंपन्यांना केंद्र सरकारची मंजुरी

‘इंडिगो’च्या एकाधिकारशाहीला ब्रेक नवी दिल्ली : जेव्हा देशातील सर्वात मोठी विमान कंपनी इंडिगोची व्यवस्था

मुंबईत थर्टी फर्स्ट सेलिब्रेशन साठी 'फायर अलर्ट' जारी; हॉटेल्स, पब्स आणि मॉल्सची झाडाझडती सुरु

मुंबई : थर्टी फर्स्ट जवळ येतोय, नववर्षाच्या स्वागतासाठी मुंबई हळू हळू सज्ज होत असतानाच, मुंबईकरांच्या