बिहार निवडणुकीचा प्रचार संपला

दुसऱ्या टप्प्यासाठी १२२ जागांवर मंगळवारी मतदान


पाटणा : बिहार विधानसभा निवडणुकीचा उडालेला धुरळा आता बसला आहे. दुसऱ्या टप्प्यातील प्रचाराच्या तोफा थंडावल्या असून मतदानासाठी प्रशासनाची तयारी सुरू झाली आहे. ११ नोव्हेंबर रोजी २० जिल्ह्यांमधील १२२ विधानसभा जागांवर मतदान होणार आहे. रविवारी प्रचार संपला असून रात्रीच्या प्रचाराला आता वेग येणार आहे.


बिहार निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यात एकूण ३ कोटी ७० लाख मतदार आपला मतदानाचा हक्क बजावणार आहेत. यामध्ये १.९५ कोटी पुरुष आणि १.७४ कोटी महिला मतदारांचा समावेश आहे. एकूण १,३०२ उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आपले भविष्य आजमावत आहेत. निवडणूक शांततेत आणि भयमुक्त वातावरणात पार पडावी यासाठी प्रशासनाने अभूतपूर्व सुरक्षा व्यवस्था केली आहे. तब्बल ४ लाखांहून अधिक सुरक्षा जवान विविध मतदान केंद्रांवर तैनात करण्यात येणार आहेत. नेपाळची सीमा ११ नोव्हेंबरपर्यंत सील करण्यात आली आहे. पहिल्या टप्प्यात बिहारमध्ये ६५ टक्के मतदान झाले होते. या वाढीव मतदानामुळे दुसऱ्या टप्प्यातील उरलेल्या प्रचाराच्या सभांना गर्दी जमविण्यासाठी सर्वच पक्ष मेहनत घेत होते. हा वाढलेला टक्का कोणाच्या बाजूने जाणार असा प्रश्न सर्वांनाच सतावत आहे. १४ नोव्हेंबरला बिहार निवडणुकाचा निकाल लागणार आहे.


संवेदनशील मतदान केंद्रे आणि वेळेत बदल
दुसऱ्या टप्प्यासाठी एकूण ४५,३३९ मतदान केंद्रे उभारण्यात आली आहेत. यापैकी ४,१०९ केंद्रे संवेदनशील म्हणून घोषित करण्यात आली असून, त्यातील ४,००३ बूथ 'अतिसंवेदनशील' गटात मोडतात. नक्षलग्रस्त भागांचा विचार करून, कटरिया, बेलहर, चैनपूर, कुटुंबा, औरंगाबाद, शेरघाटी यांसारख्या विधानसभा क्षेत्रांमध्ये मतदान सायंकाळी ४ वाजेपर्यंतच चालणार आहे, तर इतर ठिकाणी मतदानाची वेळ सायंकाळी ५ वाजेपर्यंत निश्चित करण्यात आली आहे.

Comments
Add Comment

Street Dogs: भटक्या कुत्र्यांच्या हल्ल्यांवर सर्वोच्च न्यायालयाचा कडक निर्णय, खाऊ घालणाऱ्यांनाही जबाबदार ठरवणार

नवी दिल्ली: देशभरात रस्त्यावरील भटक्या कुत्र्यांचे हल्ल्याचे प्रकरण वाढताना दिसत आहेत यावर सर्वोच्च

Bhopal News: कारमध्ये अडकलेला दीड वर्षांचा चिमुकला,अन् आई वडील शॅापिंगला गेले,पुढे असं घडलं...

भोपाळ :मध्य प्रदेशातील छिंदवाडा शहरात संध्याकाळच्या सुमारास पाया खालची जमीन हलवणारी घटना घडली. पालकांच्या

Crime News: रात्री हलवा खाल्ला अन् सकाळी उठलेच नाही..तिघांचा मृत्यु,घडली विचीत्र घटना..!

चंदीगड : हरियाणातील फरिदाबादच्या सरूरपूर भागात एक भयंकर व पाय खालची जमीन हलवणारी घटना घडली आहे. एका कुटुंबातील

Madhya Pradesh News : मुस्लिम मुलीच्या पायावर पाय पडला अन्....मध्य प्रदेशात मारहाण, लाठीमार आणि महामार्गावर चक्काजाम

खरगोन : मध्य प्रदेशातील खरगोन जिल्ह्यात एका मुस्लिम मुलीच्या पायावर पाय पडण्यावरून झालेल्या वादाचे रूपांतर

Sabarimala Temple : सबरीमाला मंदिरात तूप विक्रीत लाखो रुपयांचा महाघोटाळा! केरळ उच्च न्यायालयाचे कठोर पाऊल; एका महिन्यात अहवाल सादर करण्याचे आदेश

तिरुअनंतपुरम : केरळमधील जगप्रसिद्ध सबरीमाला मंदिरात सोन्याच्या दरोड्यानंतर आता 'तूप घोटाळा' समोर आल्याने खळबळ

जर्मनीच्या कैदेत असलेल्या अरिहासाठी आईने ओलांडली भाषेची भिंत

लेकीला परत आणण्यासाठी आई-वडिलांचा ४० महिन्यांपासून लढा नवी दिल्ली : आपल्या काळजाच्या तुकड्याला, पाच वर्षांच्या