'वंदे भारत'ची दिवाळीत बक्कळ कमाई

पुणे (प्रतिनिधी) : जलद सेवेसाठी प्रसिद्ध असणाऱ्या 'वंदे भारत'ला दिवाळीमध्ये प्रवाशांकडून चांगला प्रतिसाद मिळाला. पुणे विभागातून धावणाऱ्या पुणे ते नागपूर (अजनी), पुणे ते कोल्हापूर आणि पुणे ते हुबळी या तीन वंदे भारत रेल्वे गाड्या आहेत.


दिवाळीमध्ये १७ ते २७ ऑक्टोबर या दहा दिवसांत या तीनही रेल्वे गाड्यांच्या एकूण ३० फेऱ्या झाल्या. २३ हजार ८११ प्रवाशांनी या सेवेचा लाभ घेतला. त्यातून रेल्वेला दोन कोटी ९४ लाख रुपयांचा महसूल मिळाला आहे. नागपूरला जाणाऱ्या वंदे भारत गाडीला सर्वाधिक प्रतिसाद मिळाला.


दिवाळीला प्रवाशांच्या सोयीसाठी पुणे विभागातून जास्तीच्या रेल्वे गाड्या सोडण्यात आल्या होत्या. मात्र, प्रवाशांना रेल्वेमध्ये जागा मिळणे कठीण झाले. ज्या गाड्यांचे तिकीट उपलब्ध होते, त्या गाड्यांना प्रवाशांनी प्राधान्य दिले. वंदे भारत एक्स्प्रेसचे तिकीट इतर एक्स्प्रेस गाड्यांच्या तुलनेत जास्त असूनही या गाड्यांना मोठा प्रतिसाद लाभला आहे.



कुठल्या वंदे भारतला जास्त प्रतिसाद लाभला?
अजनी (नागपूर) – पुणे वंदे भारतला सर्वाधिक ७ हजार ७२१ प्रवाशांनी प्रवास केला. त्यातून रेल्वेला १ कोटी ८ लाख ९१ हजार २५२ रुपये उत्पन्न मिळाले. पुणे-अजनी (नागपूर) वंदे भारतलाही ६ हजार ६६६ प्रवाशांनी प्रवास करीत ९१ लाख ७२ हजारांचे उत्पन्न गाठले. या गाडीला सरासरी १३० टक्के प्रवाशांची उपस्थिती होती. अन्य काळात या गाड्यांचे तिकीट दर जास्त असून, त्यामुळे प्रवाशांचा प्रतिसाद तुलनेने कमी असतो; मात्र दिवाळीच्या गर्दीमुळे प्रवाशांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली आहे.

Comments
Add Comment

नागपूर येथील भारतीय व्यवस्थापन संस्थेला इन्क्यूबेशन सेंटर म्हणून मान्यता

मुंबई: विदर्भातील नवउद्योग (स्टार्टअप) परिसंस्था अधिक सक्षम करण्याच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण पाऊल उचलत,

नमो शेतकरी महासन्मान निधीचा ८ वा हप्ता पुढील आठवड्यात शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार; कृषीमंत्र्यांनी दिली माहिती

मुंबई: राज्यातील लाखो शेतकऱ्यांना आर्थिक दिलासा देणारा महत्त्वपूर्ण निर्णय राज्य शासनाने घेतला असून, नमो

‘महाराष्ट्र धर्मस्वातंत्र्य विधेयक’ विधानपरिषदेत मंजूर

मुंबई: महाराष्ट्रात गेल्या काही काळापासून चर्चेत असलेले आणि अत्यंत कडक तरतुदी असलेले ‘महाराष्ट्र

सिंधुदुर्गच्या विकासाला बुस्टर; राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत १०० टक्के 'व्हिजीएफ'ला मंजुरी

मुंबई: सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या पर्यटनाला आणि अर्थव्यवस्थेला मोठी गती देणारा निर्णय मंगळवारी राज्य

नंदूरबार,छत्रपती संभाजीनगरमधील गैरव्यवहारासाठी 'एसआयटी स्थापन; महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांची विधान परिषदेत घोषणा

​मुंबई: नंदूरबार जिल्ह्यातील नवापूर येथील भूसंपादन गैरव्यवहार आणि छत्रपती संभाजीनगरमधील ब्रिजवाडी येथील ५४

रब्बी हंगामातील 'ई-पीक पाहणी'ला ३१ मार्चपर्यंत मुदतवाढ

- ४५ टक्के शेतकरी अजूनही प्रक्रियेबाहेर; महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांची घोषणा मुंबई : राज्यातील रब्बी