'वंदे भारत'ची दिवाळीत बक्कळ कमाई

पुणे (प्रतिनिधी) : जलद सेवेसाठी प्रसिद्ध असणाऱ्या 'वंदे भारत'ला दिवाळीमध्ये प्रवाशांकडून चांगला प्रतिसाद मिळाला. पुणे विभागातून धावणाऱ्या पुणे ते नागपूर (अजनी), पुणे ते कोल्हापूर आणि पुणे ते हुबळी या तीन वंदे भारत रेल्वे गाड्या आहेत.


दिवाळीमध्ये १७ ते २७ ऑक्टोबर या दहा दिवसांत या तीनही रेल्वे गाड्यांच्या एकूण ३० फेऱ्या झाल्या. २३ हजार ८११ प्रवाशांनी या सेवेचा लाभ घेतला. त्यातून रेल्वेला दोन कोटी ९४ लाख रुपयांचा महसूल मिळाला आहे. नागपूरला जाणाऱ्या वंदे भारत गाडीला सर्वाधिक प्रतिसाद मिळाला.


दिवाळीला प्रवाशांच्या सोयीसाठी पुणे विभागातून जास्तीच्या रेल्वे गाड्या सोडण्यात आल्या होत्या. मात्र, प्रवाशांना रेल्वेमध्ये जागा मिळणे कठीण झाले. ज्या गाड्यांचे तिकीट उपलब्ध होते, त्या गाड्यांना प्रवाशांनी प्राधान्य दिले. वंदे भारत एक्स्प्रेसचे तिकीट इतर एक्स्प्रेस गाड्यांच्या तुलनेत जास्त असूनही या गाड्यांना मोठा प्रतिसाद लाभला आहे.



कुठल्या वंदे भारतला जास्त प्रतिसाद लाभला?
अजनी (नागपूर) – पुणे वंदे भारतला सर्वाधिक ७ हजार ७२१ प्रवाशांनी प्रवास केला. त्यातून रेल्वेला १ कोटी ८ लाख ९१ हजार २५२ रुपये उत्पन्न मिळाले. पुणे-अजनी (नागपूर) वंदे भारतलाही ६ हजार ६६६ प्रवाशांनी प्रवास करीत ९१ लाख ७२ हजारांचे उत्पन्न गाठले. या गाडीला सरासरी १३० टक्के प्रवाशांची उपस्थिती होती. अन्य काळात या गाड्यांचे तिकीट दर जास्त असून, त्यामुळे प्रवाशांचा प्रतिसाद तुलनेने कमी असतो; मात्र दिवाळीच्या गर्दीमुळे प्रवाशांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली आहे.

Comments
Add Comment

Ahilyanagar: लग्नाच्या आमिषाने तरुणीचे लैंगिक शोषण; श्रीरामपूरात गुन्हा दाखल

श्रीरामपूर: लग्नाचे आमिष दाखवून एका २३ वर्षीय तरुणीचे दीर्घकाळ लैंगिक शोषण केल्याप्रकरणी अक्षय विश्वनाथ गवळी

बालकांच्या कर्करोग उपचारांसाठी मुख्यमंत्री सहाय्यता कक्षाचा पुढाकार

मुंबई: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या विशेष पुढाकाराने मुख्यमंत्री सहाय्यता कक्ष, भारत पेट्रोलियम

Nitesh Rane: मंत्री नितेश राणेंच्या प्रमुख उपस्थितीत साजरा झाला राष्ट्रीय सागरी दिन

मुंबई: भारताच्या आर्थिक महासत्तेकडे होणाऱ्या वाटचालीत सागरी क्षेत्राचा वाटा मोलाचा असून, बंदरांच्या

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत कोयना महोत्सवाची यशस्वी सांगता

सातारा: राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय पर्यटन नकाशावर अग्रस्थानी नेण्याचा निर्धार व्यक्त करत पर्यटन, शेती आणि रोजगार

मुख्यमंत्र्यांच्या पाठबळामुळे ताडोबा व्याघ्र प्रकल्पातील पर्यावरणीय पुनरुज्जीवन प्रकल्पाला मिळाली चालना

मुंबई: जैवविविधतेने समृद्ध अशा ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्प परिसरातील जागेचे पर्यावरणीय पुनरुज्जीवन

‘पीएनजी’ क्षेत्रातील नागरिकांना ३० जूननंतर ‘एलपीजी’ गॅस पुरवठा बंद; पर्यायी इंधन म्हणून केरोसीनचे वाटप होणार

मुंबई: राज्यातील ज्या शहरी भागांमध्ये पाइपद्वारे गॅस (पीएनजी) जोडणीची सुविधा उपलब्ध आहे, तिथे नागरिकांनी पीएनजी