मुंबई महापालिका आयुक्तांच्या कार्यालयात उंदरांचा हैदोस

आयुक्तांचा कोट कुरतडला, भेटवस्तूंची केली नासधूस


मुंबई (खास प्रतिनिधी): मुंबईतील मूषकांचा त्रास दूर करण्याचा प्रयत्न मुंबई महापालिकेच्या कीटक नाशक विभागाच्या वतीने होत असला तरी सध्या महापालिका आयुक्त कार्यालयच उंदरांमुळे त्रस्त असल्याची माहिती समोर येत आहे. उंदरांचा हैदोस एवढा वाढला की त्यांनी आयुक्तांचा कोट कुरतडून टाकला आहे, तसेच भेट वस्तूतील चॉकलेटही खाऊन टाकली. त्यामुळे गुरुवारी रात्री उंदीर पकडण्यासाठी सापळे रचण्यात आले, या सापळ्यात जिवंत आणि मृत असे दहा ते बारा उंदीर आणि त्यांची पिल्लू अडकली गेली. मात्र, याठिकाणी आणखी काही मोठे उंदीर असण्याची शक्यता असून आणखी त्याठिकाणी सापळे रचण्यात आले. त्यामुळे शनिवारी किती उंदीर त्या सापळ्यात अडकतात याकडे उंदीर पकडणाऱ्या पथकाचे लक्ष आहे.


मुंबई महापालिका मुख्यालयातील जुन्या इमारतीत दुसऱ्या मजल्यावर महापालिका आयुक्त तथा प्रशासक डॉ. भूषण गगराणी यांचे कार्यालय असून या कार्यालयात मोठ्या प्रमाणात उंदरांचा त्रास असल्याच्या तक्रारी येत होत्या. परंतु, आता या उंदरांनी थेट आयुक्तांच्या वस्तूंची नासधूस करण्यास सुरुवात केली. मिळालेल्या माहितीनुसार, उंदरांनी आयुक्त कार्यालयातील काही चॉकलेटचे बॉक्स कुरतडून टाकले आहेत, तसेच त्यातील चॉकलेटही खाल्ले आहेत, शिवाय आयुक्तांचा कोटही कुरतडला असल्याची माहिती मिळत आहे.त्यामुळे उंदिर पकडणाऱ्या जाणकार अधिकाऱ्यांना पाचारण करून त्यांचा बंदोबस्त करण्याचे निर्देश देण्यात आले.



आयुक्तांच्या कार्यालयात उंदरांचा उच्छाद होत असल्याने त्यांना पकडण्यासाठी सापळे रचण्यात आले. या सापळ्यात शुक्रवारी १० ते १२ मेलेले उंदिर आणि ५ ते ६ जिवंत उंदिर हे अडकले गेले. परंतु अजूनही काही उंदिर त्याठिकाणी असण्याची शक्यता असल्याने आयुक्तांच्या कार्यालयात अजून काही सापळे रचण्यात आल्याची माहिती मिळत आहे.

Comments
Add Comment

महाविद्यालयीन शुल्कातील गैरप्रकारांची निवृत्त न्यायमूर्तींमार्फत चौकशी

उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांची विधानसभेत घोषणा; दोषींवर गुन्हे दाखल करण्याचे संकेत मुंबई :

'गॅस तुटवड्याविषयी सरकारने उपाययोजना कराव्यात'

मुंबई : आखाती देशांतील युद्धजन्य परिस्थितीमुळे देशासह राज्यात गॅसचा तुटवडा निर्माण झाल्याचे पडसाद बुधवारी

नागरिकांना विनासायास डिजिटल सेवा मिळण्यासाठी व्यापक धोरण तयार करा; माहिती तंत्रज्ञान मंत्री ॲड. आशिष शेलार यांचे निर्देश

मुंबई : राज्यातील सर्वसामान्य नागरिकांना शासकीय ई-सेवा आणि आधार संबंधित सेवा कोणत्याही अडथळ्याविना मिळाव्यात,

माजी सैनिक आणि भूमिहीनांच्या जमिनी वर्ग १ होणार, महसूलमंत्री बावनकुळेंची घोषणा

मुंबई : राज्यातील माजी सैनिक, भूमिहीन शेतकरी आणि शेतमजुरांना महाराष्ट्र शेत जमीन (सीलिंग) अधिनियमांतर्गत वाटप

प्रवासी आरक्षण सेवा इतके तास बंद राहणार

मुंबई : मुंबई प्रवासी आरक्षण प्रणाली (पीआरएस) दिनांक १२.०३.२०२६ रोजी २३.४५ वाजल्यापासून दिनांक १३.०३.२०२६ रोजी

एसटी प्रवाशांसाठी आनंदाची बातमी! महामंडळात १७,७४२ पदांची होणार जंगी भरती

परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांचे विधानपरिषदेत आश्वासन मुंबई : महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाचा (एसटी)